शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वसंतराव नाईक यांची हरित प्रेरणा देणारी सायकल

By admin | Updated: July 1, 2016 02:34 IST

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतीनिष्ठ शेतकरी परशराम भागडे यांना बक्षीस म्हणून तब्बल ४८ वर्षापूर्वी सायकल दिली होती.

आपुलकीचे बक्षीस : ४८ वर्षांपासून जपल्या स्मृतीमुकेश इंगोले  दारव्हाहरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतीनिष्ठ शेतकरी परशराम भागडे यांना बक्षीस म्हणून तब्बल ४८ वर्षापूर्वी सायकल दिली होती. या सायकलीवरून दारव्हा तालुक्यात परशराम भागडे यांनी हरितक्रांतीची प्रेरणा शेतकऱ्यांमध्ये निर्माण केली. आज ही सायकल त्यांच्या मुलाने गत ४८ वर्षापासून आपुलकीचा ठेवा म्हणून जपून ठेवली आहे. वसंतराव नाईक आणि शेती हे समीकरणच झाले होते. कृषीक्रांती करून वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढले. शेतकरी, शेतमजुरांवर ते भरभरुन प्रेम करायचे, १९६६ साली अवर्षणामुळे राज्यात भीषण स्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हिंमत देण्यासाठी राज्यभर दौरे केले. त्यांची तळमळ पाहून अनेक शेतकरी प्रभावित झाले होते. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. दारव्हा तालुक्यातील शेलोडी येथील शेतकरी परशराम बळीराम भागडे हेही नाईकांच्या विचारांनी प्रेरित झाले होते. आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून भरघोस उत्पादन घेत होते. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १५ आॅगस्ट १९६८ रोजी महाराष्ट्र शासनाने शेतीनिष्ठ पुरस्काराने भागडे यांचा गौरव केला. तत्कालीन राज्यपाल पी.व्ही. चेरियन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. दारव्हा तालुक्यातून पहिला बहुमान भागडे यांना मिळाल्याने वसंतरावांनी त्यांचे कौतुक केले. एवढेच नाही तर परशराम भागडे यांना वसंतराव नाईक यांनी सायकल बक्षीस म्हणून दिली. शेतकऱ्याला मिळालेली ती सायकल त्या काळी अनेकांना बळ देणारी ठरली. परशराम भागडे याच सायकलवरून गावागावात जाऊन शेतकऱ्यांमध्ये हरितक्रांतीची बिजे रोवत होती. काही काळानंतर परशराम भागडे यांचा मृत्यू झाला. परंतु ही अनमोल ठेव त्यांचे पूत्र विलास भागडे यांनी मोठ्या निष्ठेने जपली आहे. आजही ही सायकल त्यांच्या घरी आदराने ठेवलेली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी ही सायकल आजही शेलोडी येथील शेतकऱ्यांना प्रेरणा देते.