शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

वसंत साखर कारखान्याला मिळणार जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:59 IST

पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना दिवंगत माजी मुख्यमत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने असल्यामुळे तो विक्री होणार नाही, तसेच लवकरच पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांची ग्वाही : ऊस उत्पादकांना अखेर दिलासा, बँक अधिकाºयांची घेणार बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना दिवंगत माजी मुख्यमत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने असल्यामुळे तो विक्री होणार नाही, तसेच लवकरच पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात तत्काळ सहकारमंत्री व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘वसंत’ सहकारी साखर कारखाना अत्यंत अडचणीत सापडला आहे. या कारखान्याला वाचविण्यासाठी बुधवारी वसंतच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसंतच्या जीवदानाचे संकेत दिले. उमरखेड तालुक्याची कामधेनू असलेला व सहकार तत्वावर चालणारा विदर्भातील एकमेव कारखाना गेल्या एक वर्षापासून बंद आहे. गेल्या ३५ महिन्यांपासून कामगाराचे वेतन थकले आहे. इतराचेही कोट्यवधींचे देणे थकले आहे. नुकतीच जिल्हा बँकेने थकबाकीपोटी कारखान्याची स्थावर मालमत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.या सर्व घडामोडीनंतर आमदार राजेंद्र नजरधने यांच्या पुढाकाराने जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला तत्काळ मुंबई जाण्याचा निर्णय वसंतचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव माने, उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, विनोद जिल्हेवार, संचालक शिवाजीराव देशमुख, विजय जाधव आदींनी घेतला. या शिष्टमंडळाने प्रथम बुधवारी दुपारी २ वाजता सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेतली. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी वसंत कारखाना सुरू करण्यासंबधी आणि तो बँकेने विक्री काढू नये याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली. मुख्यमंत्र्यांनी ‘वंसत’ची विक्री होणार नाही, तो वाचविण्यासाठी तत्काळ शासन व बँक यांची बैठक घेण्याची ग्वाही दिली.हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने असल्यामुळे कारखान्याची विक्री होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे अ‍ॅड. माधवराव माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Vasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना