शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

बंदी भागातील विविध प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By admin | Updated: January 7, 2017 00:39 IST

तालुक्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ४२ गावांच्या समस्या स्वातंत्र्यानंतरही अद्याप सुटल्या नाही.

मोरचंडी जंगलात उपोषण : स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्याचे जीणे उमरखेड : तालुक्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ४२ गावांच्या समस्या स्वातंत्र्यानंतरही अद्याप सुटल्या नाही. आतापर्यंत अनेक आंदोलने करूनही कुणी फारसे लक्ष दिले नाही. आता गत तीन दिवसांपासून बंदी भागातील मोरचंडी जंगलात आमरण उपोषण सुरू केल्याने बंदी भागाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात ४२ गावे आहेत. या गावात ३० हजारांपेक्षा अधिक नागरिक राहतात. इंग्रजांच्या काळापासून ही मंडळी उपेक्षिताचे जीणं जगत आहे. देश स्वातंत्र झाल्यानंतर या भागातील समस्या सुटतील, रस्ते, पाणी, वीज होईल, अशी अपेक्षित होती. परंतु अद्यापही एकही समस्या सुटली नाही. उलट पैनगंगा अभयारण्य झाल्यानंतर येथील समस्यात वाढ झाली. पैनगंगा अभयारण्याचे जाचक नियम विकासाच्या आड येत आहे. डांबरी रस्त्यांवरून वन्य प्राण्यांना चालताना त्रास होतो म्हणून या भागात डांबरी रस्ते केले जात नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांचा जीव माणसाच्या जीवापेक्षा मोठा आहे का असा सवाल या भागातील करतात. शिक्षण, आरोग्य आदी समस्याही कायम आहे. या भागातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा आंदोलने केली. मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. परंतु अद्यापही या भागातील नागरिकांंना न्याय मिळाला नाही. मोरचंडी ते एकंबा या दोन किलोमीटर रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत काम मंजूर झाले आहे. खडीकरण व मजबुतीकरणासाठी २७ लाख रुपये मंजूर होते. त्यातून करण्यात आलेले काम अत्यंत थातूरमातूर झाले आहे. आता या रस्त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता पुन्हा बंदी भागातील समस्या घेऊन मोरचंडी जंगलात नागरिक उपोषणाला बसले आहे. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. आता तीन दिवस झाले तरी अद्यापपर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जेवली, थेरडी, जवराळा, गाडीबोरी, डोंगरगाव, मोरचंडी, सोनदाबी, पिंपळगाव, खरबी या गावातील नागरिक येथे येत आहे.(शहर प्रतिनिधी)