शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

बंदी भागातील विविध प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By admin | Updated: January 7, 2017 00:39 IST

तालुक्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ४२ गावांच्या समस्या स्वातंत्र्यानंतरही अद्याप सुटल्या नाही.

मोरचंडी जंगलात उपोषण : स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्याचे जीणे उमरखेड : तालुक्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ४२ गावांच्या समस्या स्वातंत्र्यानंतरही अद्याप सुटल्या नाही. आतापर्यंत अनेक आंदोलने करूनही कुणी फारसे लक्ष दिले नाही. आता गत तीन दिवसांपासून बंदी भागातील मोरचंडी जंगलात आमरण उपोषण सुरू केल्याने बंदी भागाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात ४२ गावे आहेत. या गावात ३० हजारांपेक्षा अधिक नागरिक राहतात. इंग्रजांच्या काळापासून ही मंडळी उपेक्षिताचे जीणं जगत आहे. देश स्वातंत्र झाल्यानंतर या भागातील समस्या सुटतील, रस्ते, पाणी, वीज होईल, अशी अपेक्षित होती. परंतु अद्यापही एकही समस्या सुटली नाही. उलट पैनगंगा अभयारण्य झाल्यानंतर येथील समस्यात वाढ झाली. पैनगंगा अभयारण्याचे जाचक नियम विकासाच्या आड येत आहे. डांबरी रस्त्यांवरून वन्य प्राण्यांना चालताना त्रास होतो म्हणून या भागात डांबरी रस्ते केले जात नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांचा जीव माणसाच्या जीवापेक्षा मोठा आहे का असा सवाल या भागातील करतात. शिक्षण, आरोग्य आदी समस्याही कायम आहे. या भागातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा आंदोलने केली. मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. परंतु अद्यापही या भागातील नागरिकांंना न्याय मिळाला नाही. मोरचंडी ते एकंबा या दोन किलोमीटर रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत काम मंजूर झाले आहे. खडीकरण व मजबुतीकरणासाठी २७ लाख रुपये मंजूर होते. त्यातून करण्यात आलेले काम अत्यंत थातूरमातूर झाले आहे. आता या रस्त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता पुन्हा बंदी भागातील समस्या घेऊन मोरचंडी जंगलात नागरिक उपोषणाला बसले आहे. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. आता तीन दिवस झाले तरी अद्यापपर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जेवली, थेरडी, जवराळा, गाडीबोरी, डोंगरगाव, मोरचंडी, सोनदाबी, पिंपळगाव, खरबी या गावातील नागरिक येथे येत आहे.(शहर प्रतिनिधी)