शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

वणीत सीसीआयचे पारडे रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 21:46 IST

शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयला ‘खो’ देत वणी परिसरातील कापूस उत्पादकांनी आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देकेवळ ७९ क्विंटल खरेदी : व्यापाºयांनी खरेदी केला ७० हजार क्विंटल कापूस

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयला ‘खो’ देत वणी परिसरातील कापूस उत्पादकांनी आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकणे सुरू केले आहे. परिणामी सीसीआयचे पारडे अद्यापही रिकामेच आहे. गेल्या १२ दिवसांत सीसीआयने केवळ ७९ क्विंटल कापूस खरेदी केला. याउलट येथील महावीर अ‍ॅग्रीकेअर या खासगी बाजार समितीत व्यापाºयांनी गेल्या १२ दिवसांत ७० हजार क्विंटल कापूस खरेदी करीत विक्रम केला.शासनाने यंदा कापसाला प्रतिक्विंटल चार हजार ३२० रुपये हमीभाव जाहीर केला. या उलट खासगी व्यापाºयांनी कापूस विक्री हंगामाच्या प्रारंभापासूनच चढ्या भावाने कापूस खरेदी सुरू केली. वणीत चार हजार ५५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कापसाचा भाव वधारला. त्यातच सीसीआयची कापूस खरेदी किचकट आणि भावही कमी असल्याने या भागातील शेतकºयांनी यावेळी खासगी व्यापाºयांनाच कापूस विकणे पसंत केले. सीसीआयने वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० आॅक्टोंबरला कापूस खरेदीचा मुहूर्त साधला. मात्र पहिल्या दिवशी दुपारनंतर उद्घाटनाला केवळ दोन वाहनात भरलेला कापूस विक्रीसाठी पोहचला. ही दोनही वाहने मिळून सीसीआयने हमीभावाने १६ क्विंटल ४५ किलो कापूस खरेदी केला. सीसीआयची खरेदी अतिशय धिम्यागतीने सुरू आहे. मागील १२ दिवसांत सीसीआयला केवळ ७९ क्विंटल कापूस खरेदी करता आला. शासनाची कापूस उत्पादकांप्रतीची उदासिनताच याला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.खासगी व्यापाºयांकडून मात्र शेतकºयांची सर्रास लूटपांढरकवडा : येथील खासगी बाजार समितीत कापसाची खरेदी सुरू असून याठिकाणी खासगी व्यापाºयांकडून शेतकºयांची प्रचंड लूट सुरू आहे. खासगी व्यापाºयांचीच बाजार समिती असल्यामुळे हे व्यापारी प्रति क्विंटलमागे २०० ते ३०० रूपयांची शेतकºयांची सर्रास लूट करीत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी व्यापाºयांनी कापूस खरेदी न करता आपल्या खासगी बाजार समितीत कापूस खरेदी करणे सुरू केले आहे. कोणाचेही नियंत्रण नसलेल्या या खासगी बाजार समितीत व्यापारी मनमानी करीत आहेत. लिलावाच्या वेळी एक भाव तर गंजीवर कापूस खाली करताना दुसरा भाव, असा प्रकार सर्रास सुरू आहे. याशिवाय आद्रतेच्या नावाने कट्टीदेखिल घेतल्या जात आहे. शेतकºयांची एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट सुरू असतानाही या गंभीर बाबीकडे कुणाचेही लक्ष जात नाही. क्विंटलमागे १५० ते २०० रूपये भाव गंजी खाली करताना हे व्यापारी देत असल्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. कापसाचा पहिला वेचा हा अतिशय चांगला कापूस असून या आद्रतेच्या नावावर हे व्यापारी शेतकºयांची लूट करीत असताना राजकीय नेते, शेतकरी नेते मात्र मुग गीळून आहेत. खासगी व्यापारी हमी भावानसेुद्धा कापूस खरेदी करीत नसून त्यांची मनमानी सुरू आहे. त्यामुळे कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाची कापूस खरेदी त्वरित सुरू होणे आवश्यक आहे.