शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वणीत सीसीआयचे पारडे रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 21:46 IST

शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयला ‘खो’ देत वणी परिसरातील कापूस उत्पादकांनी आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देकेवळ ७९ क्विंटल खरेदी : व्यापाºयांनी खरेदी केला ७० हजार क्विंटल कापूस

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयला ‘खो’ देत वणी परिसरातील कापूस उत्पादकांनी आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकणे सुरू केले आहे. परिणामी सीसीआयचे पारडे अद्यापही रिकामेच आहे. गेल्या १२ दिवसांत सीसीआयने केवळ ७९ क्विंटल कापूस खरेदी केला. याउलट येथील महावीर अ‍ॅग्रीकेअर या खासगी बाजार समितीत व्यापाºयांनी गेल्या १२ दिवसांत ७० हजार क्विंटल कापूस खरेदी करीत विक्रम केला.शासनाने यंदा कापसाला प्रतिक्विंटल चार हजार ३२० रुपये हमीभाव जाहीर केला. या उलट खासगी व्यापाºयांनी कापूस विक्री हंगामाच्या प्रारंभापासूनच चढ्या भावाने कापूस खरेदी सुरू केली. वणीत चार हजार ५५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कापसाचा भाव वधारला. त्यातच सीसीआयची कापूस खरेदी किचकट आणि भावही कमी असल्याने या भागातील शेतकºयांनी यावेळी खासगी व्यापाºयांनाच कापूस विकणे पसंत केले. सीसीआयने वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० आॅक्टोंबरला कापूस खरेदीचा मुहूर्त साधला. मात्र पहिल्या दिवशी दुपारनंतर उद्घाटनाला केवळ दोन वाहनात भरलेला कापूस विक्रीसाठी पोहचला. ही दोनही वाहने मिळून सीसीआयने हमीभावाने १६ क्विंटल ४५ किलो कापूस खरेदी केला. सीसीआयची खरेदी अतिशय धिम्यागतीने सुरू आहे. मागील १२ दिवसांत सीसीआयला केवळ ७९ क्विंटल कापूस खरेदी करता आला. शासनाची कापूस उत्पादकांप्रतीची उदासिनताच याला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.खासगी व्यापाºयांकडून मात्र शेतकºयांची सर्रास लूटपांढरकवडा : येथील खासगी बाजार समितीत कापसाची खरेदी सुरू असून याठिकाणी खासगी व्यापाºयांकडून शेतकºयांची प्रचंड लूट सुरू आहे. खासगी व्यापाºयांचीच बाजार समिती असल्यामुळे हे व्यापारी प्रति क्विंटलमागे २०० ते ३०० रूपयांची शेतकºयांची सर्रास लूट करीत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी व्यापाºयांनी कापूस खरेदी न करता आपल्या खासगी बाजार समितीत कापूस खरेदी करणे सुरू केले आहे. कोणाचेही नियंत्रण नसलेल्या या खासगी बाजार समितीत व्यापारी मनमानी करीत आहेत. लिलावाच्या वेळी एक भाव तर गंजीवर कापूस खाली करताना दुसरा भाव, असा प्रकार सर्रास सुरू आहे. याशिवाय आद्रतेच्या नावाने कट्टीदेखिल घेतल्या जात आहे. शेतकºयांची एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट सुरू असतानाही या गंभीर बाबीकडे कुणाचेही लक्ष जात नाही. क्विंटलमागे १५० ते २०० रूपये भाव गंजी खाली करताना हे व्यापारी देत असल्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. कापसाचा पहिला वेचा हा अतिशय चांगला कापूस असून या आद्रतेच्या नावावर हे व्यापारी शेतकºयांची लूट करीत असताना राजकीय नेते, शेतकरी नेते मात्र मुग गीळून आहेत. खासगी व्यापारी हमी भावानसेुद्धा कापूस खरेदी करीत नसून त्यांची मनमानी सुरू आहे. त्यामुळे कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाची कापूस खरेदी त्वरित सुरू होणे आवश्यक आहे.