शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी तालुक्यात संततधार

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या दडीने करपणारी पिके आता टवटवीत दिसू लागली आहे.

वणी : गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या दडीने करपणारी पिके आता टवटवीत दिसू लागली आहे. या संततधार पावसाने या चारही तालुक्यातील नदी, नाले, ओढे, लघु व मध्यम प्रकल्पही प्रथमताच भरले आहेत. यावर्षी सुरूवातीच्या मृग नक्षत्रापासून पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत आणि कोरड्या दुष्काळात सापडले. कपाशीची वाढच खुंटल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. या कोरड्या दुष्काळातच यंदा शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी कपाशीची सीतादही करीत होते. व्यापारीही त्याचवेळी कापूस खरेदी सुरु करीत होते. मात्र यावर्षी दसऱ्याला कापूस निघणे अवघड झाले आहे.अत्यंत निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना पोळ्याच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे. पोळ्याच्या दिवशी सोमवारी सायंकाळी हजेरी लावली. त्यानंतर गेले चार दिवस सतत पाऊस कोसळत आहे. शनिवारी आणि रविवारी तर दमदार पाऊस झाला. वणी तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी तब्बल ८0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर रविवार सकाळपासून आज सोमवार सकाळपर्यंत पुन्हा ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वणी तालुक्यात यावर्षी आजपर्यंत ५८३ मिलीमीटर पऊस झाला. मागीलवर्षी याच काळात तब्बल एक हजार ३५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, हे विशेष.पोळ्यापासून पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी खरीप पिकांना लाभ झाला आहे. मात्र कपाशीची वाढ खुंटल्याने कपाशीचे पीक अद्याप संकटात आहे. शेतकऱ्यांची आशा सोयाबिनवर टिकून आहे. दरवर्षी दसऱ्यापासून कापूस वेचणीला सुरूवात होते. सीतादहीचा कापूस उच्च प्रतीचा असल्याने त्याला दरही चांगले मिळतात. त्यातूनच शेतकरी दसरा, दिवाळी सण साजरे करतात. तथापि यावर्षी पावसाच्या विलंबाने विजयादशमीला सीतादही होणे अवघड झाले आहे. पावसाच्या दडीने उत्पन्नातही घट येण्याची शक्यता कायमच आहे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील नदी, नाले, ओढे, लघु व मध्यम प्रकल्प भरले. मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प आणि पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण भरले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)