कळंब : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कळंब तालुक्यातील वंडली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी खाऊसाठी जमा केलेले पैसे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाला मदत करण्याचा संकल्प केला.शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करु नये, सक्षम नागरिकांनी समाजातील कष्टकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीतून केले. तसेच ‘जय जवान जय किसान’, ‘एक के बिना देश बेजान’ असा संदेश दिला. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या अंतकरणातून निघालेली ‘आर्त हाक चिमुकल्यांची, करु नका होळी आयुष्याची’ हे एैकुन गावातील नागरीकही अक्षरश: हेलाऊन गेले. अशा अनेक घोष वाक्यातून शेतकरी व नागरीकांचे प्रबोधन करण्यात आहे. विद्यार्थ्यांनी गोळा केलेली ५ हजार १ रुपयाचा निधी आत्महत्याग्रस्त कुंंटूबाला मदत म्हणून जिल्हाधिकारी यांचेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक सरपंच ज्ञानेश्वर होरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय अंदुरकर, गटशिक्षणाधिकारी गणेश गायानर, विस्तार अधिकारी नितीनचंद्र डाखोरे, केंद्र प्रमुख जयवंत डूबे, मुख्याध्यापक गिरीधर ससनकर यांनी केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्याचे काम शिक्षक स्मिता ढोले, शाम कामटकर, प्रसेनजित पाटील, गीता वरघणे, मनोज गायकवाड, सुनिल पारीसे आदींनी केली. (तालुका प्रतिनिधी)
आत्महत्याग्रस्त कुटुंबांना वंडलीच्या विद्यार्थ्यांची मदत
By admin | Updated: March 27, 2015 01:40 IST