शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

जिल्हा परिषदेत काढले प्रशासनाचे वाभाडे

By admin | Updated: June 13, 2015 02:31 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने विरोधकाकडून प्रशासनाला कोंडीत पकडले जाते.

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने विरोधकाकडून प्रशासनाला कोंडीत पकडले जाते. मात्र शुक्रवारी झालेल्या सभेत सत्ताधारी सदस्यांनीच विशेष करून राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोधकाची भूमिका बजावली. प्रत्येक मुद्यावर अधिकाऱ्यांना कोंडीत पकडून चांगला घाम फोडला.जिल्हा परिषदेतील अडीच वर्षाच्या काळात ययाती नाईक यांनी अपवादानेच युक्तिवाद केला. मात्र शुक्रवारच्या सभेत त्यांनी थेट सीईओ डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनाच लक्ष्य केले. सीईओंच्या पुसद दौऱ्यावरून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी अमोल राठोड यांनी देऊळगाव येथेच सर्वाधिक ४८ घरकूल का मंजूर केले, कमी गुण असलेल्यांना घरकूल दिले तर अधिक गुण असलेल्या लाभार्थ्यांना डावलले, असा आरोप केला. घरकुलाचे वाटप आर्थिक देवाण-घेवाणीतून होत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. या शिवाय कृषी विभागाच्या विशेष घटक योजनेचे लाभार्थी निवडसुद्धा पैशांनी केली जाते. सधन कुटुंबातील तीन व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात आला. अशी अनेक उदाहरणे असल्याचे त्यांनी सभागृहासमोर मांडले. यावर कृषी विकास अधिकाऱ्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. हरियाली योजनेतील अपहाराचेही चौकशी करतो, असे सांगून कोणतीच कारवाई झाली नसल्याचे राठोड यांनी निदर्शनास आणून दिले.ययाती नाईक यांनी जिल्हा परिषदेकडून पुरविण्यात आलेल्या माहितीवरच आक्षेप घेतला. कुठलेही सही शिक्के नसलेले दस्तावेज पुरविण्यात आले, हे खरे मानायचे का, असा प्रश्न उपस्थित केला. याच सुरात सूर मिसळून बोलताना ढाणकीचे सदस्य वसंत चंद्रे यांची जीभ घसरली. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावही निर्माण झाला होता. प्रवीण देशमुख आणि राकेश नेमवार यांनी हिंदी पदविका असलेल्या ग्रामसेवकांच्या नियुक्तीचा प्रश्न उपस्थित केला. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यावर कोणती कारवाई केली, असा जाब विचारण्यात आला. त्याचेही समर्पक उत्तर प्रशासनाकडे नव्हते. शिक्षण विभागाच्या मुद्यावरून पुन्हा सदस्य चांगलेच संतापले. (कार्यालय प्रतिनिधी)