शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

१६ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे आरोग्य प्रशासनापुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST

जिल्ह्यात राज्य शासनाने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या धोरणानुसार सध्या २१ लाख नागरिकांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. आजपर्यंत पाच लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण आरोग्य यंत्रणेला पूर्ण करता आले नाही. 

ठळक मुद्दे३२ हजार लस जिल्ह्याकडे वळती : १६४ केंद्रांची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्याचे आव्हान आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. यानंतरही जिल्ह्याला पाहिजे त्या प्रमाणात लस उपलब्ध झाली नाही. यामुळे आतापर्यंत केवळ २२ टक्के लसीकरण जिल्ह्याला पूर्ण करता आले आहे. अद्यापही ७८ टक्के लसीकरण बाकी आहे. या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून १६४ केंद्रांची निर्मिती करण्यात आली. आता लस उपलब्ध झाली तरच लसीकरण पुढे नेता येणार आहे. १६ लाख नागरिकांना लस देण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे आहे. जिल्ह्यात राज्य शासनाने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या धोरणानुसार सध्या २१ लाख नागरिकांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. आजपर्यंत पाच लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण आरोग्य यंत्रणेला पूर्ण करता आले नाही. दर आठवड्याला ४० ते ५० हजार लस उपलब्ध झाली, तर लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, दर आठवड्याला १८ ते २० हजार लस जिल्ह्याला उपलब्ध होत आहे. त्यातही कोव्हॅक्सिनचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. यामुळे अनेकांना लसीकरण करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. या आठवड्यात प्रथमच ३२ हजार लस जिल्ह्याकरिता पाठविण्यात आली आहे. याच पद्धतीने लस पाठविण्याची तसदी आरोग्य मंत्रालयाने घेतली तरच जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी ३० ते ४४ वयोगटांतील लसीकरणाची मोहीम दहा केंद्रांवर हाती घेण्यात आली होती. आता मंगळवारपासून १८ ते ४० आणि त्यापुढील सर्वच वयोगटाचे लसीकरण करण्याच्या सूचना धडकल्या आहेत.  नवीन सूचनेनुसार जिल्ह्यातील १६४ केंद्रांवर लसीकरण मोहीम पुढील काही दिवसांत राबविली जाणार आहे. मंगळवारपासूनच जिल्ह्यातील केंद्रांवर गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  

दुर्गम भागात अजूनही गैरसमज - जिल्ह्यातील दुर्गम भागात लस घेण्यासाठी नागरिक अजूनही पुढे येत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या भागातील नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी आरोग्य यंत्रणेने विविध मोहीम हाती घेतल्या आहे. जाणीवजागृती करण्याचे काम राबविले जात आहे. मात्र, त्याला पाहिजे तसे यश अजूनही मिळाले नसल्याचे दिसून येते. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या