शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
4
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
5
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
6
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
7
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
8
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
9
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
10
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
11
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
12
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
13
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
14
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
15
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
16
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
17
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
18
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
19
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
20
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...

१६ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे आरोग्य प्रशासनापुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST

जिल्ह्यात राज्य शासनाने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या धोरणानुसार सध्या २१ लाख नागरिकांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. आजपर्यंत पाच लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण आरोग्य यंत्रणेला पूर्ण करता आले नाही. 

ठळक मुद्दे३२ हजार लस जिल्ह्याकडे वळती : १६४ केंद्रांची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्याचे आव्हान आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. यानंतरही जिल्ह्याला पाहिजे त्या प्रमाणात लस उपलब्ध झाली नाही. यामुळे आतापर्यंत केवळ २२ टक्के लसीकरण जिल्ह्याला पूर्ण करता आले आहे. अद्यापही ७८ टक्के लसीकरण बाकी आहे. या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून १६४ केंद्रांची निर्मिती करण्यात आली. आता लस उपलब्ध झाली तरच लसीकरण पुढे नेता येणार आहे. १६ लाख नागरिकांना लस देण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे आहे. जिल्ह्यात राज्य शासनाने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या धोरणानुसार सध्या २१ लाख नागरिकांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. आजपर्यंत पाच लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण आरोग्य यंत्रणेला पूर्ण करता आले नाही. दर आठवड्याला ४० ते ५० हजार लस उपलब्ध झाली, तर लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, दर आठवड्याला १८ ते २० हजार लस जिल्ह्याला उपलब्ध होत आहे. त्यातही कोव्हॅक्सिनचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. यामुळे अनेकांना लसीकरण करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. या आठवड्यात प्रथमच ३२ हजार लस जिल्ह्याकरिता पाठविण्यात आली आहे. याच पद्धतीने लस पाठविण्याची तसदी आरोग्य मंत्रालयाने घेतली तरच जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी ३० ते ४४ वयोगटांतील लसीकरणाची मोहीम दहा केंद्रांवर हाती घेण्यात आली होती. आता मंगळवारपासून १८ ते ४० आणि त्यापुढील सर्वच वयोगटाचे लसीकरण करण्याच्या सूचना धडकल्या आहेत.  नवीन सूचनेनुसार जिल्ह्यातील १६४ केंद्रांवर लसीकरण मोहीम पुढील काही दिवसांत राबविली जाणार आहे. मंगळवारपासूनच जिल्ह्यातील केंद्रांवर गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  

दुर्गम भागात अजूनही गैरसमज - जिल्ह्यातील दुर्गम भागात लस घेण्यासाठी नागरिक अजूनही पुढे येत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या भागातील नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी आरोग्य यंत्रणेने विविध मोहीम हाती घेतल्या आहे. जाणीवजागृती करण्याचे काम राबविले जात आहे. मात्र, त्याला पाहिजे तसे यश अजूनही मिळाले नसल्याचे दिसून येते. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या