शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

स्वाध्यायपुस्तिका वापराविना रद्दीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 21:56 IST

समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या स्वाध्याय पुस्तिका आणि पुस्तके वापराशिवाय रद्दीत जात आहे. मागील २७ मार्च रोजी यवतमाळ शहरात वर्ग ८ च्या इतिहास-नागरिकशास्त्र विषयाच्या हजारो सिलबंद स्वाध्याय पुस्तिका प्लेट निर्मिती कारखान्याकडे नेणारे वाहन आढळल्याने या अभियानाला गालबोट लागले आहे.

ठळक मुद्देतक्रार नोंदविण्याचे आवाहन : समग्र शिक्षा अभियानाला लागले गालबोट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या स्वाध्याय पुस्तिका आणि पुस्तके वापराशिवाय रद्दीत जात आहे. मागील २७ मार्च रोजी यवतमाळ शहरात वर्ग ८ च्या इतिहास-नागरिकशास्त्र विषयाच्या हजारो सिलबंद स्वाध्याय पुस्तिका प्लेट निर्मिती कारखान्याकडे नेणारे वाहन आढळल्याने या अभियानाला गालबोट लागले आहे.राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यात स्वयंअध्ययनावर भर दिल्याने २०१० पासून पाठ्यपुस्तक मंडळाने सर्वविषयाच्या पुस्तिका विद्यार्थ्यांना देण्याची भूमिका घेतली. मात्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा गोरखधंदा सुरू असल्याचे सेंटर फॉर अवेअरनेसचे संचालक प्रा.डॉ.प्रदीप राऊत यांनी म्हटले आहे. शिवाय शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांच्याकडेही तक्रार केली आहे.यवतमाळ येथील एका प्रसिद्ध भंगार व्यावसायिकाकडून वाहतूक करताना सात ते आठ क्विंटल स्वाध्याय पुस्तिकांचा अवैध साठा येथील अशोक नगरातील एका लघु उद्योजकाकडे नेताना आढळला. जिल्ह्यात वितरीत झालेल्या सर्व विषयांच्या स्वाध्याय पुस्तिकांच्या वितरणाची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. राऊत यांनी केली आहे.स्वाध्याय पुस्तिकांचे मुद्रण करताना मंडळाने ७० जीएसएम क्रिमवोव्ह कागद वापरला. असा कागद कागदी प्लेटांसाठी उपयोगात आणला जातो. २०१६ मध्ये एक लाख ६० हजार तर २०१०-१५ मध्ये १० लाखापेक्षा अधिक पाच कोटींच्या पुस्तकांची छपाई कोल्हापूर येथून करून घेतली. मात्र विद्यार्थ्यांना या पुस्तिका पुरविल्या नाही. या पुस्तिका रद्दीत विकल्या गेल्याने सर्वशिक्षा अभियानाचा बोजवारा उडाला. ज्या पाल्यांना २०१० पासून पुस्तिका प्राप्त झाल्या नाही. त्यांच्या पालकांनी सेंटर फॉर अवेअरनेस व यंत्रणांकडे तक्रार नोंदविण्यास पुढे यावे, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.जाणीवपूर्वक वितरण थांबविले, पुस्तिकेपासून पालक अनभिज्ञसर्वशिक्षा अभियानांतर्गत स्वाध्याय पुस्तिका मोफत मिळतात याची माहिती अनेकांना नाही. याचाच फायदा घेत स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप जाणीवपूर्वक रखडून ठेवले जाते. साठवणूक स्थळी पुस्तिकांची गर्दी वाढल्याचे निमित्त करून रद्दीत विल्हेवाट लावण्यात येते. यामध्ये गैरप्रकार होते. दरम्यान, स्वाध्याय पुस्तिका विल्हेवाट प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तक्रारीतील नावे व स्थळ पाहून सीसीटीव्ही फुटेजची तत्काळ नोंद घेतली नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांच्या दोन पत्रानुसार कायदेशीर तक्रार दाखल केली नाही. शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी पोलीस महासंचालक व आयुक्तांमार्फत कारवाई करावी, अशी मागणी डॉ. राऊत यांनी केली.

टॅग्स :Educationशिक्षण