शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

अत्यावश्यक दूरध्वनी बंद

By admin | Updated: April 5, 2015 00:04 IST

येथील ग्रामीण रूग्णालय आणि पोलीस ठाण्यातील दूरध्वनी गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडले.

नागरिकांची तारांबळ : रूग्णालय, ठाण्याशी संपर्क साधणे कठीणवणी : येथील ग्रामीण रूग्णालय आणि पोलीस ठाण्यातील दूरध्वनी गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडले. त्यामुळे रूग्ण, त्यांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांना या दोनही ठिकाणी संपर्क साधणे कठीण झाले.वणीत ग्रामीण रूग्णालय आहे. या रूग्णालयावरच तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा सर्व भार आहे. या तालुक्यात वाहनांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे दररोज किरकोळ आणि मोठे अपघात घडत असतात. त्यात अनेक जखमी होतात. त्यांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. अन्यथा अपघातात काहींचा जीव जाण्याचा धोका असतो. मात्र येथील ग्रामीण रूग्णालयातील दूरध्वनीच ठप्प पडल्याने या रूग्णालयाशी संपर्क साधणे अपघातातील जखमी अथवा त्यांच्या नातेवार्इंना कठीण झाले आहे. हीच गत पोलीस ठाण्याची आहे. येथील पोलीस ठाण्यातील दूरध्वनीही गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यावर दूरध्वनी केल्यास रिंग जाते. मात्र पलिकडे कुणीही दूरध्वनीच उचलत नाही. त्यामुळे गंभीर अपघात, चोरी, अथवा एखाद्या गंभीर घटनेबाबत पोलिसांशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. पोलीस ठाण्याच्या २२५0७८ या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी जनतेने काय करावे, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.ग्रामीण रूग्णालयातील २२५४५४ क्रमांकाचा दूरध्वनीही गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडला आहे. त्यावर रिंग केल्यास लगेच संपर्क तुटून जातो. त्यामुळे या रूग्णालयाशी तातडीने संपर्क कसा साधावा, असा प्रश्न रूग्ण, त्यांचे नातेवाईक यांना पडला आहे. रूग्णालय आणि पोलीस ठाणे हे दोनही अत्यंत महत्त्वाचे कार्यालय आहे. मात्र तेथीलच दूरध्वनी बंद असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. सामान्य नागरिकांकडे या दोनही कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांचे भ्रमणध्वनी क्रमांक नाहीत. त्यांनी नेमका कुठे संपर्क साधावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)अपघाताची माहिती देण्यास विलंबशनिवारी परिसरात जवळपास तीन अपघात झाले. या अपघाताची माहिती देतानाही काहींची तारांबळ उडाली. त्यांनी पोलीस ठाणे आणि ग्रामीण रूग्णलयाचा क्रमांक डायल केला. मात्र त्यांना पलिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी अपघातातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यास वेळ लागला. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. अपघाताची माहिती देण्यासही विलंब झाला. या अपघातात प्राणहानी झाली असती, किंवा मोठा अपघात असता, तर बिकट प्रसंग निर्माण झाला असता.