शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
6
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
7
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
8
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
9
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
10
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
11
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
12
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
13
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
14
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
15
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
16
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
17
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
19
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
20
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

अत्यावश्यक दूरध्वनी बंद

By admin | Updated: April 5, 2015 00:04 IST

येथील ग्रामीण रूग्णालय आणि पोलीस ठाण्यातील दूरध्वनी गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडले.

नागरिकांची तारांबळ : रूग्णालय, ठाण्याशी संपर्क साधणे कठीणवणी : येथील ग्रामीण रूग्णालय आणि पोलीस ठाण्यातील दूरध्वनी गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडले. त्यामुळे रूग्ण, त्यांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांना या दोनही ठिकाणी संपर्क साधणे कठीण झाले.वणीत ग्रामीण रूग्णालय आहे. या रूग्णालयावरच तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा सर्व भार आहे. या तालुक्यात वाहनांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे दररोज किरकोळ आणि मोठे अपघात घडत असतात. त्यात अनेक जखमी होतात. त्यांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. अन्यथा अपघातात काहींचा जीव जाण्याचा धोका असतो. मात्र येथील ग्रामीण रूग्णालयातील दूरध्वनीच ठप्प पडल्याने या रूग्णालयाशी संपर्क साधणे अपघातातील जखमी अथवा त्यांच्या नातेवार्इंना कठीण झाले आहे. हीच गत पोलीस ठाण्याची आहे. येथील पोलीस ठाण्यातील दूरध्वनीही गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यावर दूरध्वनी केल्यास रिंग जाते. मात्र पलिकडे कुणीही दूरध्वनीच उचलत नाही. त्यामुळे गंभीर अपघात, चोरी, अथवा एखाद्या गंभीर घटनेबाबत पोलिसांशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. पोलीस ठाण्याच्या २२५0७८ या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी जनतेने काय करावे, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.ग्रामीण रूग्णालयातील २२५४५४ क्रमांकाचा दूरध्वनीही गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडला आहे. त्यावर रिंग केल्यास लगेच संपर्क तुटून जातो. त्यामुळे या रूग्णालयाशी तातडीने संपर्क कसा साधावा, असा प्रश्न रूग्ण, त्यांचे नातेवाईक यांना पडला आहे. रूग्णालय आणि पोलीस ठाणे हे दोनही अत्यंत महत्त्वाचे कार्यालय आहे. मात्र तेथीलच दूरध्वनी बंद असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. सामान्य नागरिकांकडे या दोनही कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांचे भ्रमणध्वनी क्रमांक नाहीत. त्यांनी नेमका कुठे संपर्क साधावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)अपघाताची माहिती देण्यास विलंबशनिवारी परिसरात जवळपास तीन अपघात झाले. या अपघाताची माहिती देतानाही काहींची तारांबळ उडाली. त्यांनी पोलीस ठाणे आणि ग्रामीण रूग्णलयाचा क्रमांक डायल केला. मात्र त्यांना पलिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी अपघातातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यास वेळ लागला. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. अपघाताची माहिती देण्यासही विलंब झाला. या अपघातात प्राणहानी झाली असती, किंवा मोठा अपघात असता, तर बिकट प्रसंग निर्माण झाला असता.