शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक दूरध्वनी बंद

By admin | Updated: April 5, 2015 00:04 IST

येथील ग्रामीण रूग्णालय आणि पोलीस ठाण्यातील दूरध्वनी गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडले.

नागरिकांची तारांबळ : रूग्णालय, ठाण्याशी संपर्क साधणे कठीणवणी : येथील ग्रामीण रूग्णालय आणि पोलीस ठाण्यातील दूरध्वनी गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडले. त्यामुळे रूग्ण, त्यांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांना या दोनही ठिकाणी संपर्क साधणे कठीण झाले.वणीत ग्रामीण रूग्णालय आहे. या रूग्णालयावरच तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा सर्व भार आहे. या तालुक्यात वाहनांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे दररोज किरकोळ आणि मोठे अपघात घडत असतात. त्यात अनेक जखमी होतात. त्यांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. अन्यथा अपघातात काहींचा जीव जाण्याचा धोका असतो. मात्र येथील ग्रामीण रूग्णालयातील दूरध्वनीच ठप्प पडल्याने या रूग्णालयाशी संपर्क साधणे अपघातातील जखमी अथवा त्यांच्या नातेवार्इंना कठीण झाले आहे. हीच गत पोलीस ठाण्याची आहे. येथील पोलीस ठाण्यातील दूरध्वनीही गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यावर दूरध्वनी केल्यास रिंग जाते. मात्र पलिकडे कुणीही दूरध्वनीच उचलत नाही. त्यामुळे गंभीर अपघात, चोरी, अथवा एखाद्या गंभीर घटनेबाबत पोलिसांशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. पोलीस ठाण्याच्या २२५0७८ या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी जनतेने काय करावे, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.ग्रामीण रूग्णालयातील २२५४५४ क्रमांकाचा दूरध्वनीही गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडला आहे. त्यावर रिंग केल्यास लगेच संपर्क तुटून जातो. त्यामुळे या रूग्णालयाशी तातडीने संपर्क कसा साधावा, असा प्रश्न रूग्ण, त्यांचे नातेवाईक यांना पडला आहे. रूग्णालय आणि पोलीस ठाणे हे दोनही अत्यंत महत्त्वाचे कार्यालय आहे. मात्र तेथीलच दूरध्वनी बंद असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. सामान्य नागरिकांकडे या दोनही कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांचे भ्रमणध्वनी क्रमांक नाहीत. त्यांनी नेमका कुठे संपर्क साधावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)अपघाताची माहिती देण्यास विलंबशनिवारी परिसरात जवळपास तीन अपघात झाले. या अपघाताची माहिती देतानाही काहींची तारांबळ उडाली. त्यांनी पोलीस ठाणे आणि ग्रामीण रूग्णलयाचा क्रमांक डायल केला. मात्र त्यांना पलिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी अपघातातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यास वेळ लागला. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. अपघाताची माहिती देण्यासही विलंब झाला. या अपघातात प्राणहानी झाली असती, किंवा मोठा अपघात असता, तर बिकट प्रसंग निर्माण झाला असता.