शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू विद्यार्थिनींचा आठवीनंतर शिक्षणाचा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 10:25 IST

यवतमाळ : ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुला-मुलीला सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे, असा कायदा असताना उर्दू भाषिक ५३ हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग शासनाने बंद करून ठेवला आहे.

ठळक मुद्देआरटीईचे शासनाकडूनच उल्लंघनशिक्षणमंत्र्यांनी आशा दाखवून केला भ्रमनिरास

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुला-मुलीला सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे, असा कायदा असताना उर्दू भाषिक ५३ हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग शासनाने बंद करून ठेवला आहे. संपूर्ण प्राथमिक शिक्षण उर्दू माध्यमातून घेतलेल्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी तब्बल १०-१२ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. गंभीर म्हणजे, शेकडो मुलींना ही पायपीट शक्य होत नसल्याने त्यांना आठवीनंतर शिक्षणच थांबवावे लागत आहे.विशेष म्हणजे, सात वर्षांपूर्वी उर्दू शिक्षकांनी ही बाब लक्षात आणून दिल्यावरही सरकारने कुठलीही कार्यवाही केलेली नाही. विशेषत: मुस्लीम समाजातील विद्यार्थिनींना घराजवळ शाळा असल्यास शिक्षण घेणे सोपे जाते. मात्र, नववी आणि दहावीचे शिक्षण उर्दूतून उपलब्ध नसल्याने अशा मुलींचे शिक्षण अपूर्ण राहात आहे.सध्या राज्यात उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळांची संख्या २ हजार ६७५ इतकी आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या १७४६, नगरपरिषदेच्या २८३ आणि महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या ६४६ शाळा आहेत. या शाळांमध्ये सध्या १४ हजार ५५ शिक्षक कार्यरत आहेत. मुस्लीम लोकसंख्येच्या तुलनेत या शाळांची आणि तेथील शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यातही या शाळा केवळ पहिली ते पाचवी किंवा पहिली ते आठवीपर्यंतच आहेत. मुस्लीम कुटुंबातील विद्यार्थिनी या शाळांमधून उर्दू माध्यमातून प्राथमिक शिक्षण पूर्ण करतात. त्यापुढे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांना उर्दू माध्यमाची शाळा गावात उपलब्धच नाही. मुले परगावात जाऊन शिकतात, मात्र हजारो मुलींना आठवीपुढे शिकताच येत नाही. तर काही जणी गावातील मराठी माध्यमाच्या शाळेत शिकण्याचा प्रयत्न करतात. मात्र पाया उर्दूचा असल्याने त्या दहावीत अनुत्तीर्ण होतात किंवा अत्यल्प गुणांनी उत्तीर्ण होतात. त्यामुळे उर्दूच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांना नववी आणि दहावीचा वर्ग जोडावा, अशी मागणी सात वर्षांपूर्वी केली. २०१७ मध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी असे वर्ग विनाअट जोडण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, वर्ष उलटूनही त्यावर अंमलबजावणी झालेली नाही.

मंत्र्यांनी शब्द पाळला नाही- गफ्फारमहाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने शिक्षकदिनी निवेदन देऊन शिक्षणमंत्र्यांना आश्वासनाची आठवण करून दिली. परंतु, त्यावर मंत्र्यांकडून एका शब्दाचाही दिलासा मिळाला नाही, अशी खंत संघटनेचे राज्याध्यक्ष एम. एम. गफ्फार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.१८० उर्दू शाळा केल्या बंदमुळातच राज्यात जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळा कमी आहेत. त्यात आता प्राथमिक शाळाही बंद केल्या जात आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात उर्दू शाळांचे प्रमाण नगण्य असले तरी कोकण आणि पश्चिम विदर्भात तर या शाळा औषधालाही नाहीत. त्यातच २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात शासनाने कमी पटाच्या १४१३ शाळा समायोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यात उर्दू माध्यमाच्या तब्बल १८० प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे माध्यमिकचा रस्ता बंद असताना आता प्राथमिक शिक्षणाचे दारही बंद केले जात आहे, असा आरोप गफ्फार यांनी केला.