शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

अवकाळी पावसाने गावरान आंब्याचा मेवा संपविला; मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरातवर भिस्त

By रूपेश उत्तरवार | Updated: May 5, 2023 17:34 IST

Yawatmal News मार्चपासून सुरू असलेल्या अवकाळीने विदर्भ आणि मराठवाड्यातील गावरान आंबा पूर्णत: गळून पडला आहे. यामुळे मे अखेरीस बाजारपेठेत दाखल होणाऱ्या गावरान आंब्याची चवही चाखता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

रुपेश उत्तरवार

यवतमाळ : अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. मार्चपासून सुरू असलेल्या अवकाळीने विदर्भ आणि मराठवाड्यातील गावरान आंबा पूर्णत: गळून पडला आहे. यामुळे मे अखेरीस बाजारपेठेत दाखल होणाऱ्या गावरान आंब्याची चवही चाखता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

भर उन्हाळ्यात संकरित आंबा आणि आंब्याच्या काही जाती बाजारात आहेत. कोकण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधून राज्यभरात येणारा हा आंबा सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. त्यातही मध्य प्रदेशातून आलेल्या लालबाग आणि बैगनपल्ली आंबा जास्त आहे. या आंब्याचे ५० रुपये किलोच्या घरात भाव आहेत. तर केसर आणि इतर आंब्याचे दर १०० ते १२० रुपये किलोच्या घरात आहेत. हापूस आंब्याचे दर यावर्षी ७०० ते २००० रुपये पेटीपर्यंत आहेत.

गावरान आंब्याच्या जातीचे जतनच नाही

मे महिन्यात गावरान आंबा बाजारात विकायला येतो. लाडू, खोबऱ्या, घोटी, शेवळ्या, लाल्या अशा नानाविध जातीत हा आंबा प्रत्येक गावात वेगळ्या नावाने विकला जातो. हापूस आंब्यापेक्षाही त्याची वेगळी चव असते; मात्र या आम्रवृक्षाचे जतन झालेले नाही. आंबा परिपक्व होऊन पिकण्याच्या अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यात हा आंबा पडला. आता झाडाला आंबाही शिल्लक राहिलेला नाही. यामुळे यावर्षी गावरान आंब्याची चव चाखायला मिळणार नाही अशी अवस्था आहे.

रसाळीची संकल्पना परप्रांतीय आंब्यावर

गावखेड्यातील शेतशिवारात शेत तिथे गावरान आंबा दिसतो. अनेक ठिकाणी तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने असंख्य आंब्याची झाडे दिसतात. उन्हाळ्यात गावखेड्यात गेल्यावर रसाळी म्हणजे रसाचा बेत असलेले जेवण हमखास मिळते; मात्र या आंब्याच्या झाडांवर कुऱ्हाड चालली. राहिलेले वृक्ष अवकाळी पावसाने गारद झाले. यामुळे गावात यावर्षी पाहुणे आले तर परराज्यातून आलेल्या आंब्यावरच पाहुणचार करावा लागणार आहे.

खास लोणच्याचा आंबा दुरापास्त

एक पाऊस आल्यानंतर लोणच्याचा आंबा उतरविला जातो; मात्र अवकाळी पाऊस आणि वादळाने फळ शिल्लकच राहिले नाही. यामुळे मान्सूननंतर उतरविला जाणारा लोणच्याचा आंबा मिळणार नाही, अशी स्थिती आहे.

राज्यभरातून आंब्याची बुकिंग करण्यात येते. यावर्षी विविध जातीचे आंबे बुक केले; परंतु वादळाने आंबे गळाले. आता या ठिकाणावरून आंबा मिळेलच अशी शाश्वती नाही.

श्याम लापसेटवार, व्यापारी

टॅग्स :Mangoआंबा