शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

अवकाळी पावसाने गावरान आंब्याचा मेवा संपविला; मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरातवर भिस्त

By रूपेश उत्तरवार | Updated: May 5, 2023 17:34 IST

Yawatmal News मार्चपासून सुरू असलेल्या अवकाळीने विदर्भ आणि मराठवाड्यातील गावरान आंबा पूर्णत: गळून पडला आहे. यामुळे मे अखेरीस बाजारपेठेत दाखल होणाऱ्या गावरान आंब्याची चवही चाखता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

रुपेश उत्तरवार

यवतमाळ : अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. मार्चपासून सुरू असलेल्या अवकाळीने विदर्भ आणि मराठवाड्यातील गावरान आंबा पूर्णत: गळून पडला आहे. यामुळे मे अखेरीस बाजारपेठेत दाखल होणाऱ्या गावरान आंब्याची चवही चाखता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

भर उन्हाळ्यात संकरित आंबा आणि आंब्याच्या काही जाती बाजारात आहेत. कोकण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधून राज्यभरात येणारा हा आंबा सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. त्यातही मध्य प्रदेशातून आलेल्या लालबाग आणि बैगनपल्ली आंबा जास्त आहे. या आंब्याचे ५० रुपये किलोच्या घरात भाव आहेत. तर केसर आणि इतर आंब्याचे दर १०० ते १२० रुपये किलोच्या घरात आहेत. हापूस आंब्याचे दर यावर्षी ७०० ते २००० रुपये पेटीपर्यंत आहेत.

गावरान आंब्याच्या जातीचे जतनच नाही

मे महिन्यात गावरान आंबा बाजारात विकायला येतो. लाडू, खोबऱ्या, घोटी, शेवळ्या, लाल्या अशा नानाविध जातीत हा आंबा प्रत्येक गावात वेगळ्या नावाने विकला जातो. हापूस आंब्यापेक्षाही त्याची वेगळी चव असते; मात्र या आम्रवृक्षाचे जतन झालेले नाही. आंबा परिपक्व होऊन पिकण्याच्या अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यात हा आंबा पडला. आता झाडाला आंबाही शिल्लक राहिलेला नाही. यामुळे यावर्षी गावरान आंब्याची चव चाखायला मिळणार नाही अशी अवस्था आहे.

रसाळीची संकल्पना परप्रांतीय आंब्यावर

गावखेड्यातील शेतशिवारात शेत तिथे गावरान आंबा दिसतो. अनेक ठिकाणी तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने असंख्य आंब्याची झाडे दिसतात. उन्हाळ्यात गावखेड्यात गेल्यावर रसाळी म्हणजे रसाचा बेत असलेले जेवण हमखास मिळते; मात्र या आंब्याच्या झाडांवर कुऱ्हाड चालली. राहिलेले वृक्ष अवकाळी पावसाने गारद झाले. यामुळे गावात यावर्षी पाहुणे आले तर परराज्यातून आलेल्या आंब्यावरच पाहुणचार करावा लागणार आहे.

खास लोणच्याचा आंबा दुरापास्त

एक पाऊस आल्यानंतर लोणच्याचा आंबा उतरविला जातो; मात्र अवकाळी पाऊस आणि वादळाने फळ शिल्लकच राहिले नाही. यामुळे मान्सूननंतर उतरविला जाणारा लोणच्याचा आंबा मिळणार नाही, अशी स्थिती आहे.

राज्यभरातून आंब्याची बुकिंग करण्यात येते. यावर्षी विविध जातीचे आंबे बुक केले; परंतु वादळाने आंबे गळाले. आता या ठिकाणावरून आंबा मिळेलच अशी शाश्वती नाही.

श्याम लापसेटवार, व्यापारी

टॅग्स :Mangoआंबा