शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मारेगावात दर्जाहीन कामांचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:14 IST

शहराच्या विकासासाठी आलेल्या कोट्यवधींच्या निधीची नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने उधळपट्टी सुरू असून विकासकामाच्या नावावर थातुरमातूर कामे करून हा निधी हडप होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. या विकासकामात कंत्राटदार व प्रशासनाचे साटेलोटे असल्याचाही आरोप आहे.

ठळक मुद्देथातुरमातूर कामे : कामाच्या गुणवत्तेवरून ओरड, जनतेच्या पैशाची उधळपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शहराच्या विकासासाठी आलेल्या कोट्यवधींच्या निधीची नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने उधळपट्टी सुरू असून विकासकामाच्या नावावर थातुरमातूर कामे करून हा निधी हडप होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. या विकासकामात कंत्राटदार व प्रशासनाचे साटेलोटे असल्याचाही आरोप आहे.मारेगाव शहरातील ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळताच शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी नगरपंचायत प्रशासनाला प्राप्त झाला. या पैशातून शहरातील विकासकामांना नगरपंचायत प्रशासनाने सुरूवात केली. नगरपंचायत प्रशासनाने सुरूवातीच्या काळात कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले. परंतु हळूहळू गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत भराभर कामे उरकवून निधी उचलण्याचा सपाटाच सुरू केला आहे. आज शहरातील अनेक वॉर्डात खासगी कंत्राटदार व बांधकाम विभागाअंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. यासंदर्भात कंत्राटदारांना विचारणा केल्यास ‘तुमच्याने जे होते ते करून घ्या’ अशा प्रकारचे उद्धट व अरेरावीची भाषा जनतेसोबत वापरली जाते.वॉर्ड क्रमांक एकमधील नगरसेवक उमा देवगडे यांनी आपल्या वॉर्डातील बोगस कामाबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता, त्यांनाही तसेच उत्तर देण्यात आले. शहरातील प्रत्येक कामाची तक्रार नगरपंचायतीकडे होत असताना नगरपंचायत प्रशासन जतनेच्या तक्रारीची दखलच घेत नाही. उलट कंत्राटदारावर कोणतीही कारवाई न करता त्यांची बिले अदा केली जात आहे.आता तर शहरातील अनेक कामे ज्या कंत्राटदाराला देण्यात आली तो ती कामे न करता दुसऱ्याकडून कामे करून घेऊन बिले काढत आहे. गेल्या दोन महिन्यापासून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रजेवर आहेत. त्यामुळे प्रभारावरच सर्व कामे सुरू आहे. प्रशासन व कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. याकडे आता वरीष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष देण्याची गरज आहे.अनावश्यक ठिकाणी कामेशहरातील अनेक वॉर्डातील नागरिक रस्ते आणि नाली बांधकामाची मागणी करीत असताना त्याकडे दुर्लक्ष करून ज्याठिकाणी रस्ता व नालीची आवश्यकता नाही, अशा ठिकाणी थातुरमातूर कामे करून केवळ बिले काढली जात आहे.कार्यालयीन कामेही खोळंबलीनगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे दीर्घ रजेवर गेल्याने आणि प्रभारी मुख्याधिकारी येत असल्याने जनतेची अनेक महत्वाची कामे होत नाही. नागरिक कामासाठी नगरपंचायत कार्यालयात गेल्यावर अर्धेअधीक कर्मचारी गैरहजर असतात. जे कर्मचारी उपस्थित राहतात, ते ‘साहेब नाही त्यामुळे तुमची कामे होणार नाही’ असे उत्तर देतात. त्यामुळे नागरिक कमालिचे हैराण झाले आहेत.