शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

मारेगावात दर्जाहीन कामांचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:14 IST

शहराच्या विकासासाठी आलेल्या कोट्यवधींच्या निधीची नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने उधळपट्टी सुरू असून विकासकामाच्या नावावर थातुरमातूर कामे करून हा निधी हडप होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. या विकासकामात कंत्राटदार व प्रशासनाचे साटेलोटे असल्याचाही आरोप आहे.

ठळक मुद्देथातुरमातूर कामे : कामाच्या गुणवत्तेवरून ओरड, जनतेच्या पैशाची उधळपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शहराच्या विकासासाठी आलेल्या कोट्यवधींच्या निधीची नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने उधळपट्टी सुरू असून विकासकामाच्या नावावर थातुरमातूर कामे करून हा निधी हडप होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. या विकासकामात कंत्राटदार व प्रशासनाचे साटेलोटे असल्याचाही आरोप आहे.मारेगाव शहरातील ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळताच शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी नगरपंचायत प्रशासनाला प्राप्त झाला. या पैशातून शहरातील विकासकामांना नगरपंचायत प्रशासनाने सुरूवात केली. नगरपंचायत प्रशासनाने सुरूवातीच्या काळात कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले. परंतु हळूहळू गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत भराभर कामे उरकवून निधी उचलण्याचा सपाटाच सुरू केला आहे. आज शहरातील अनेक वॉर्डात खासगी कंत्राटदार व बांधकाम विभागाअंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. यासंदर्भात कंत्राटदारांना विचारणा केल्यास ‘तुमच्याने जे होते ते करून घ्या’ अशा प्रकारचे उद्धट व अरेरावीची भाषा जनतेसोबत वापरली जाते.वॉर्ड क्रमांक एकमधील नगरसेवक उमा देवगडे यांनी आपल्या वॉर्डातील बोगस कामाबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता, त्यांनाही तसेच उत्तर देण्यात आले. शहरातील प्रत्येक कामाची तक्रार नगरपंचायतीकडे होत असताना नगरपंचायत प्रशासन जतनेच्या तक्रारीची दखलच घेत नाही. उलट कंत्राटदारावर कोणतीही कारवाई न करता त्यांची बिले अदा केली जात आहे.आता तर शहरातील अनेक कामे ज्या कंत्राटदाराला देण्यात आली तो ती कामे न करता दुसऱ्याकडून कामे करून घेऊन बिले काढत आहे. गेल्या दोन महिन्यापासून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रजेवर आहेत. त्यामुळे प्रभारावरच सर्व कामे सुरू आहे. प्रशासन व कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. याकडे आता वरीष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष देण्याची गरज आहे.अनावश्यक ठिकाणी कामेशहरातील अनेक वॉर्डातील नागरिक रस्ते आणि नाली बांधकामाची मागणी करीत असताना त्याकडे दुर्लक्ष करून ज्याठिकाणी रस्ता व नालीची आवश्यकता नाही, अशा ठिकाणी थातुरमातूर कामे करून केवळ बिले काढली जात आहे.कार्यालयीन कामेही खोळंबलीनगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे दीर्घ रजेवर गेल्याने आणि प्रभारी मुख्याधिकारी येत असल्याने जनतेची अनेक महत्वाची कामे होत नाही. नागरिक कामासाठी नगरपंचायत कार्यालयात गेल्यावर अर्धेअधीक कर्मचारी गैरहजर असतात. जे कर्मचारी उपस्थित राहतात, ते ‘साहेब नाही त्यामुळे तुमची कामे होणार नाही’ असे उत्तर देतात. त्यामुळे नागरिक कमालिचे हैराण झाले आहेत.