शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी स्थितीचा आढावा

By admin | Updated: April 20, 2015 00:05 IST

जिल्ह्यात वातावरणातील अनियमीततेमुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

अधिकाऱ्यांना निर्देश : सिंचन सुविधेसह कृषी पंप वीज जोडणीचा अनुशेष दूर करण्याचा आदेशयवतमाळ : जिल्ह्यात वातावरणातील अनियमीततेमुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. खरीप, रबी या दोन्ही हंगामातील प्रमुख पिके उद्ध्वस्त झाली. याच स्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार मदन येरावार, संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा. राजु तोडसाम, राजु नजरधने, डॉ. अशोक उईके आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या सिंचन सुविधेत अधिकाधिक वाढ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना वीज जोडणी देण्याकरिता व्यापक मोहीम राबविण्याचे निर्देश अहीर यांनी दिले. वीज जोडण्या, विद्युत पुरवठा, सिंचन प्रकल्पाची दुरूस्ती ही कामे समाधानकारक नसल्याने केंद्रीय राज्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रधानमंत्री ग्रामीण सिंचन योजना प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना केल्या. जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणीही १०० टक्के लक्ष उराशी बाळगूनच केली जावी असे सांगितले. जिल्ह्यातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, वीज आणि सिंचनासारख्या सुविधा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी समपर्क पर्याय आहे. सरकारच्या सिंचनविषयक योजनांमध्ये कार्यरत एजन्सीज व ठेकेदारांकडून निश्चित कालावधीत पूर्ण करून घेण्यात यावी ही कामे उपयुक्त ठरतील व योग्य ठिकाणीत व्हावी याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, तालुकास्तरावर विकासकामांचा निधी वितरित करताना समतोल पाळण्यात आला नाही अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी समान निधी उपलब्ध करून देण्याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी असे हंसराज अहीर यांनी सांगितले. सर्व विकासकामांच्या देखरेखीसाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करावी असेही सांगण्यात आले. बैठकीत उपस्थित आमदारांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधले. अकाली पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. या नुकसानीचा वस्तूनिष्ठ सर्वे करण्यात यावा, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा निधी तातडीने देण्यात यावा अशा सूचना अहीर यांनी दिल्या. (कार्यालय प्रतिनिधी)