शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी स्थितीचा आढावा

By admin | Updated: April 20, 2015 00:05 IST

जिल्ह्यात वातावरणातील अनियमीततेमुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

अधिकाऱ्यांना निर्देश : सिंचन सुविधेसह कृषी पंप वीज जोडणीचा अनुशेष दूर करण्याचा आदेशयवतमाळ : जिल्ह्यात वातावरणातील अनियमीततेमुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. खरीप, रबी या दोन्ही हंगामातील प्रमुख पिके उद्ध्वस्त झाली. याच स्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार मदन येरावार, संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा. राजु तोडसाम, राजु नजरधने, डॉ. अशोक उईके आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या सिंचन सुविधेत अधिकाधिक वाढ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना वीज जोडणी देण्याकरिता व्यापक मोहीम राबविण्याचे निर्देश अहीर यांनी दिले. वीज जोडण्या, विद्युत पुरवठा, सिंचन प्रकल्पाची दुरूस्ती ही कामे समाधानकारक नसल्याने केंद्रीय राज्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रधानमंत्री ग्रामीण सिंचन योजना प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना केल्या. जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणीही १०० टक्के लक्ष उराशी बाळगूनच केली जावी असे सांगितले. जिल्ह्यातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, वीज आणि सिंचनासारख्या सुविधा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी समपर्क पर्याय आहे. सरकारच्या सिंचनविषयक योजनांमध्ये कार्यरत एजन्सीज व ठेकेदारांकडून निश्चित कालावधीत पूर्ण करून घेण्यात यावी ही कामे उपयुक्त ठरतील व योग्य ठिकाणीत व्हावी याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, तालुकास्तरावर विकासकामांचा निधी वितरित करताना समतोल पाळण्यात आला नाही अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी समान निधी उपलब्ध करून देण्याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी असे हंसराज अहीर यांनी सांगितले. सर्व विकासकामांच्या देखरेखीसाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करावी असेही सांगण्यात आले. बैठकीत उपस्थित आमदारांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधले. अकाली पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. या नुकसानीचा वस्तूनिष्ठ सर्वे करण्यात यावा, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा निधी तातडीने देण्यात यावा अशा सूचना अहीर यांनी दिल्या. (कार्यालय प्रतिनिधी)