शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

पांढरकवडा तालुक्यात तुरीवर अज्ञात रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:55 IST

तालुक्यात कापूस, सोयाबीनवर आलेल्या विविध रोगाने शेतकरी अगोदरच चिंतेत असताना आता तुरीच्या पिकावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे.

ठळक मुद्देशेतकºयांपुढे संकट : कापूस, सोयाबीनवरही रोंगाचे अतिक्रमण, उत्पादन घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यात कापूस, सोयाबीनवर आलेल्या विविध रोगाने शेतकरी अगोदरच चिंतेत असताना आता तुरीच्या पिकावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे.जिल्ह्यात २२ शेतकरी, शेतमजुर किटनाशक फवारणीमुळे मृत्यूमुखी पडले. या घटनानंतर कृषी सेवा केंद्र संचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. किटकनाशक विक्रीला बंदी केल्यामुळे तुरीवर फवारणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. दररोज तापमानात होणारा बदल हा तुरीवर आलेल्या रोगाला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोयाबीनचे पीक शेतकºयांच्या हातून गेले आहे. कपाशीच्या पिकांचीही हीच परिस्थिती आहे. कापूस हाती येत आहे. परंतु कापसाला भाव नाही. शेतकºयांना आपला सोन्यासारखा कापूस कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकºयांचा कुणीही वाली नाही. कापसाला भाव मिळत नाही. कवडीमोल भावात कापूस विकावा लागतो म्हणून बºयाच शेतकºयांनी सोयाबीनची लागवड केली. परंतु निसर्गाने दगा दिला आणि पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाले.लागवडीचाही खर्च निघाला नाही. अशीच एकंदर तालुक्यात परिस्थिती आहे. काही शेतकºयांनी तर सोयाबीनचे पिकच्या पीक मोडून टाकले. कापूस, सोयाबीन पिकामुळे शेतकरी तोट्यात जाऊन कर्जबाजारी झाला असल्याने तो अतिशय चिंतेत आहे. शेतकºयांची परिस्थिती अशी बिकट झाली असताना शासनाकडून यावर कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने शेतकºयांमध्ये चिड व्यक्त केली जात आहे. आश्वासने देऊन शेतकºयांची बोळवण केली जात आहे. प्रत्यक्षात या शेतकºयांच्या हाती काहीही मिळत नाही. सोयाबीनचे पीक गेले, तुरीचे पीक सलाईनवर आहे. त्यामुळे हे पीकदेखिल शेतकºयांच्या हातून जाण्याची चिन्हे आहे. रबीचा हंगामही तोट्या जाण्याची शक्यता आहे. जमिनीती ओलावा नाही, नद्या नाल्यांना पाणी नाही. त्यामुळे रबी पिकांना फटका बसणार आहे.