शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पांढरकवडा तालुक्यात तुरीवर अज्ञात रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:55 IST

तालुक्यात कापूस, सोयाबीनवर आलेल्या विविध रोगाने शेतकरी अगोदरच चिंतेत असताना आता तुरीच्या पिकावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे.

ठळक मुद्देशेतकºयांपुढे संकट : कापूस, सोयाबीनवरही रोंगाचे अतिक्रमण, उत्पादन घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यात कापूस, सोयाबीनवर आलेल्या विविध रोगाने शेतकरी अगोदरच चिंतेत असताना आता तुरीच्या पिकावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे.जिल्ह्यात २२ शेतकरी, शेतमजुर किटनाशक फवारणीमुळे मृत्यूमुखी पडले. या घटनानंतर कृषी सेवा केंद्र संचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. किटकनाशक विक्रीला बंदी केल्यामुळे तुरीवर फवारणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. दररोज तापमानात होणारा बदल हा तुरीवर आलेल्या रोगाला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोयाबीनचे पीक शेतकºयांच्या हातून गेले आहे. कपाशीच्या पिकांचीही हीच परिस्थिती आहे. कापूस हाती येत आहे. परंतु कापसाला भाव नाही. शेतकºयांना आपला सोन्यासारखा कापूस कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकºयांचा कुणीही वाली नाही. कापसाला भाव मिळत नाही. कवडीमोल भावात कापूस विकावा लागतो म्हणून बºयाच शेतकºयांनी सोयाबीनची लागवड केली. परंतु निसर्गाने दगा दिला आणि पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाले.लागवडीचाही खर्च निघाला नाही. अशीच एकंदर तालुक्यात परिस्थिती आहे. काही शेतकºयांनी तर सोयाबीनचे पिकच्या पीक मोडून टाकले. कापूस, सोयाबीन पिकामुळे शेतकरी तोट्यात जाऊन कर्जबाजारी झाला असल्याने तो अतिशय चिंतेत आहे. शेतकºयांची परिस्थिती अशी बिकट झाली असताना शासनाकडून यावर कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने शेतकºयांमध्ये चिड व्यक्त केली जात आहे. आश्वासने देऊन शेतकºयांची बोळवण केली जात आहे. प्रत्यक्षात या शेतकºयांच्या हाती काहीही मिळत नाही. सोयाबीनचे पीक गेले, तुरीचे पीक सलाईनवर आहे. त्यामुळे हे पीकदेखिल शेतकºयांच्या हातून जाण्याची चिन्हे आहे. रबीचा हंगामही तोट्या जाण्याची शक्यता आहे. जमिनीती ओलावा नाही, नद्या नाल्यांना पाणी नाही. त्यामुळे रबी पिकांना फटका बसणार आहे.