शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

संतांची शिकवण खऱ्या अर्थाने समजून घ्या

By admin | Updated: September 5, 2016 01:03 IST

सध्याच्या आधुनिक काळात समाजाला ज्ञानवर्धित संगणक समजले पण संत तुकोबाराय, संत कबीर, संत तुकडोजी महाराज ...

रफीक पारनेर : जमात-ए-इस्लामी हिंदची पुसदमध्ये पत्रपरिषदपुसद : सध्याच्या आधुनिक काळात समाजाला ज्ञानवर्धित संगणक समजले पण संत तुकोबाराय, संत कबीर, संत तुकडोजी महाराज आणि मोहम्मद पैगंबरांनी शिकवलेल्या जीवनाचा उद्देश खऱ्या अर्थाने समजला नसल्याने आजची युवा पिढी भरकटल्याची खंत अहमदनगर येथील डॉ. मोहम्मद रफिक पारनेर यांनी व्यक्त केली. जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे देशव्यापी अभियान शांती व मानवता या नावाने राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाजी महाराज, संत तुकोबाराय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, संत कबीर व मोहम्मद पैगंबरांनी कोण्या एका धर्मासाठी नव्हे तर चराचर सृष्टीतील मानव जातीच्या विश्वाच्या कल्याणासाठी आदर्श कुटुंब व्यवस्था घडवण्यासाठी संदेश यावेळी त्यांनी पत्रपरिषदेतून दिला. आज समाजात सद्भावना वृद्धींगत करण्याची गरज आहे. नव्या पिढीला मार्गदर्शनाची गरज आहे, अशी अपेक्षा विचारवंत डॉ. रफीक पारनेर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला जमाते इस्लामी हिंदचे जिल्हा अध्यक्ष अ. हकीम शेख, तालुकाध्यक्ष काजीम दाद खान, संयोजक अलियार खान, प्रमुख वहीद खान, नुरुल्लाह खान, शेख नईम उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)