शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

दरडीखाली तीन घरे गाडली

By admin | Updated: June 23, 2015 00:24 IST

दाभोळमधील दुर्घटना : पाचजण अडकले, एकाचा मृतदेह सापडला, ढिगारा उपसण्याचे काम सुरू

चौकशीचे आदेश : दारव्हा येथे दोन कंपन्यांचा साठा सील सुरेंद्र राऊत यवतमाळ शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांना प्रलोभने देऊन सुमार दर्जाचे बियाणे माथी मारणाऱ्या कंपन्या आता जिल्हा प्रशासनाच्या निशाण्यावर आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहे. त्यानुसार दारव्हा येथे कृषी विभागाने केलेल्या कारवाईत दोन कंपन्यांचा साठा सील करण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या तोंंडावर दरवर्षी बियाणे कंपन्या शेतकऱ्यांना विविध प्रलोभने देऊन आपला माल त्यांच्या माथी मारतात. बियाणे खरेदीवर आकर्षक आॅफर दिली जाते. कूपन मिळाल्यास भेट वस्तू मिळणार, मोबाईल रिचार्ज मिळणार अशी एक ना अनेक प्रलोभने दाखवितात. मुळात हा प्रकार लकी ड्रॉ पद्धतीत मोडणारा आहे. परंतु कोणतीही परवानगी न घेता कंपन्या आपले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. उत्पन्नाची हमी तर नेहमीच दिली जाते. या कंपन्या निवडणूक प्रचाराला लाजवेल अशा पद्धतीने जाहिराती करून बियाण्यांची विक्री करतात. यातून अनेकदा शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारले जाण्याची शक्यता असते. जिल्ह्यात अलिकडच्या काळात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. वरिष्ठांपर्यंत तक्रार करूनही उपयोग झाला नाही.दारव्हा तालुक्यात २०१३ मध्ये बोगस बियाण्यांचे प्रकरण चांगलेच गाजले. नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्याने कृषी आयुक्तापर्यंत धाव घेतली. परंतु उपयोग झाला नाही. नुकसानीचा मोबदला मिळालाच नाही. दोन वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणात बियाणे कंपन्यांनी प्रलोभने देण्याचा आधार घेतला आहे. कूपन मिळालेल्या शेतकऱ्याला त्या कुपनावर बियाणे खरेदीची सक्ती केली जाते. एखादे गिफ्ट हॅम्पर लागल्याचे सांगून ठराविक रक्कम जमा करा आणि गिफ्ट घेऊन जा अशा आॅफर दिल्या जात आहे. यामुळे आर्थिक संकटात असलेला शेतकरी छोट्या फायद्यासाठी मोठे नुकसान करून घेत आहे. याबाबत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे ई-मेलवर तक्रार आली. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बियाण्यांचा साठा तपासण्याचे निर्देश जिल्हा कृषी विकास अधिकारी आणि कृषी अधीक्षकांना दिले आहे. याच आदेशावरून दारव्हा तालुक्यात जे.के. सिडस्चे कपाशी वाण ८८६६ आणि राशी सिडस्चा साठा सील केला आहे. या कंपन्यांनी लकी ड्रॉची अधिकृत परवानगी घेतली आहे काय याची तपासणी केली जात आहे. त्याच प्रमाणे इतर कोणत्या बियाणे कंपन्यांनी तशी आॅफर शेतकऱ्यांपुढे ठेवली आहे याचीही चौकशी केली जाणार आहे. यातून शेतकऱ्यांना प्रलोभने देणाऱ्या बियाणे कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे.दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल दारव्हा तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे ई-मेलवरून थेट तक्रार केली. यात विविध कंपन्या आपले बियाणे विकण्यासाठी कशी प्रलोभने देत आहेत. याची माहिती दिली. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले असून यामुळे प्रलोभने देणाऱ्या बियाणे कंपन्यांच्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.तक्रारीच्या सत्यतेची पडताळणी करणे सुरू आहे. सर्व उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारीसुद्धा बियाण्यांची चौकशी करीत आहे. दोषी कंपन्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल.- दत्तात्रेय गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ