शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

कृषी फिडरवर अघोषित भारनियमन कायमच

By admin | Updated: September 17, 2015 03:11 IST

कृषी फिडरवर महिनाभर २४ तास सलग वीज पुरवठा देण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले असून आजही जिल्ह्यात तब्बल १६ तासांचे भारनियमन होत आहे.

शेतकरी हवालदिल : ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले यवतमाळ : कृषी फिडरवर महिनाभर २४ तास सलग वीज पुरवठा देण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले असून आजही जिल्ह्यात तब्बल १६ तासांचे भारनियमन होत आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यातून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस असला तरी पीक स्थिती उत्तम आहे. हवा तेव्हा आणि हवा तसा पाऊस कोसळल्याने सोयाबीन आणि कपाशीचे पीक चांगलेच बहरले आहे. मात्र गत महिनाभरापासून पावसाने दडी मारली. उन्ह उन्हाळ्यासारखे तापत आहे. अशा स्थितीत पिकांना पाणी देण्याची गरज आहे. मात्र कृषी फिडरवर अनियमित वीज पुरवठा होत असल्याने ओलित करणे अशक्य झाले. याबाबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना माहिती दिली. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. त्यानुसार पालकमंत्री राठोड यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची मुंबईत भेट घेऊन जिल्ह्यातील विजेची समस्या सांगितली. त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी महिनाभर २४ तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र हा शब्द पाळलाच गेला नाही. आजही कृषी फिडरवर तब्बल १६ तासांचे अघोषित भारनियमन होत आहे. शेतकरी आक्रमक झाले असून गावागावातील शेतकरी आता वीज वितरणवर धडकत आहे. वीज वितरणमध्ये तक्रारींचा पाऊस पडत आहे. परंतु त्यानंतरही भारनियमन जैसे थेच आहे. जिल्ह्यात तीन दिवस दिवसा आणि इतर दिवस रात्री वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक आजही कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे होणाऱ्या पिकांची नुकसानभरपाई कोण देणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. (शहर वार्ताहर)