शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कृषी फिडरवर अघोषित भारनियमन कायमच

By admin | Updated: September 17, 2015 03:11 IST

कृषी फिडरवर महिनाभर २४ तास सलग वीज पुरवठा देण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले असून आजही जिल्ह्यात तब्बल १६ तासांचे भारनियमन होत आहे.

शेतकरी हवालदिल : ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले यवतमाळ : कृषी फिडरवर महिनाभर २४ तास सलग वीज पुरवठा देण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले असून आजही जिल्ह्यात तब्बल १६ तासांचे भारनियमन होत आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यातून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस असला तरी पीक स्थिती उत्तम आहे. हवा तेव्हा आणि हवा तसा पाऊस कोसळल्याने सोयाबीन आणि कपाशीचे पीक चांगलेच बहरले आहे. मात्र गत महिनाभरापासून पावसाने दडी मारली. उन्ह उन्हाळ्यासारखे तापत आहे. अशा स्थितीत पिकांना पाणी देण्याची गरज आहे. मात्र कृषी फिडरवर अनियमित वीज पुरवठा होत असल्याने ओलित करणे अशक्य झाले. याबाबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना माहिती दिली. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. त्यानुसार पालकमंत्री राठोड यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची मुंबईत भेट घेऊन जिल्ह्यातील विजेची समस्या सांगितली. त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी महिनाभर २४ तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र हा शब्द पाळलाच गेला नाही. आजही कृषी फिडरवर तब्बल १६ तासांचे अघोषित भारनियमन होत आहे. शेतकरी आक्रमक झाले असून गावागावातील शेतकरी आता वीज वितरणवर धडकत आहे. वीज वितरणमध्ये तक्रारींचा पाऊस पडत आहे. परंतु त्यानंतरही भारनियमन जैसे थेच आहे. जिल्ह्यात तीन दिवस दिवसा आणि इतर दिवस रात्री वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक आजही कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे होणाऱ्या पिकांची नुकसानभरपाई कोण देणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. (शहर वार्ताहर)