शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

कृषी फिडरवर अघोषित भारनियमन कायमच

By admin | Updated: September 17, 2015 03:11 IST

कृषी फिडरवर महिनाभर २४ तास सलग वीज पुरवठा देण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले असून आजही जिल्ह्यात तब्बल १६ तासांचे भारनियमन होत आहे.

शेतकरी हवालदिल : ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले यवतमाळ : कृषी फिडरवर महिनाभर २४ तास सलग वीज पुरवठा देण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले असून आजही जिल्ह्यात तब्बल १६ तासांचे भारनियमन होत आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यातून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस असला तरी पीक स्थिती उत्तम आहे. हवा तेव्हा आणि हवा तसा पाऊस कोसळल्याने सोयाबीन आणि कपाशीचे पीक चांगलेच बहरले आहे. मात्र गत महिनाभरापासून पावसाने दडी मारली. उन्ह उन्हाळ्यासारखे तापत आहे. अशा स्थितीत पिकांना पाणी देण्याची गरज आहे. मात्र कृषी फिडरवर अनियमित वीज पुरवठा होत असल्याने ओलित करणे अशक्य झाले. याबाबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना माहिती दिली. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. त्यानुसार पालकमंत्री राठोड यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची मुंबईत भेट घेऊन जिल्ह्यातील विजेची समस्या सांगितली. त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी महिनाभर २४ तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र हा शब्द पाळलाच गेला नाही. आजही कृषी फिडरवर तब्बल १६ तासांचे अघोषित भारनियमन होत आहे. शेतकरी आक्रमक झाले असून गावागावातील शेतकरी आता वीज वितरणवर धडकत आहे. वीज वितरणमध्ये तक्रारींचा पाऊस पडत आहे. परंतु त्यानंतरही भारनियमन जैसे थेच आहे. जिल्ह्यात तीन दिवस दिवसा आणि इतर दिवस रात्री वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक आजही कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे होणाऱ्या पिकांची नुकसानभरपाई कोण देणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. (शहर वार्ताहर)