शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

खरेदी-विक्री संघांचा अघोषित बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:04 IST

मूग, उडीद, सोयाबीन या शेतमाल खरेदीसाठी हमी केंद्र उघडायचे आहे. परंतु जिल्हाभरातून यासाठी एकही प्रस्ताव अद्याप दाखल झाला नसून खरेदी-विक्री संघांनी अघोषित बहिष्कार घातल्याचे चित्र पहायला मिळत आहे. प्रस्तावच न आल्याने ही खरेदी होणार कशी याचा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेतमाल खरेदी : हमी केंद्राचा एकही प्रस्ताव नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मूग, उडीद, सोयाबीन या शेतमाल खरेदीसाठी हमी केंद्र उघडायचे आहे. परंतु जिल्हाभरातून यासाठी एकही प्रस्ताव अद्याप दाखल झाला नसून खरेदी-विक्री संघांनी अघोषित बहिष्कार घातल्याचे चित्र पहायला मिळत आहे. प्रस्तावच न आल्याने ही खरेदी होणार कशी याचा पेच निर्माण झाला आहे.हमीदरानुसार शेतमालाची खरेदी करण्यासाठी ही केंद्रे सुरू केली जातात. यावर्षीच्या खरीप हंगामातील शेतमाल खरेदी करण्यासाठीसुद्धा जिल्ह्यात हमी केंद्र उघडले जाणार आहे. त्याकरिता मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यातून प्रस्ताव बोलावले. मात्र ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातून एकही प्रस्ताव आला नाही. परिणामी जिल्ह्यात हमी केंद्र सुरू होणार किंवा नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमाल बाजारात येताच शेतमालाचे दर पडतात. त्याचाच प्रत्यय यावर्षीही शेतकऱ्यांना येत आहे.सध्या सोयाबीन, मूग आणि उडीदाचे दर हमीदराच्या खाली गेले आहे. यामुळे शेतकरी हमी केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी तयार आहेत. त्याकरिता प्रारंभी शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. त्यानुसार शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणीची सुरूवात केली आहे. मात्र हे हमी केंद्र अद्याप सुरू झाले नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहे. गतवर्षी १६ केंद्रांवर खरेदी विक्री संघाने शेतमालाची हमी दराने खरेदी केली होती. यावर्षी खरेदी विक्री संघांकडून खरेदीचा कुठलाही प्रस्ताव आला नाही.शेतमाल उत्पादक कंपनी, सहकारी संस्थांना हमी केंद्र सुरू करून शेतमाल खरेदी करता येतो. यातील शेतमाल उत्पादक कंपनीला किमान १० लाख रूपयांची ठेव सक्तीची करण्यात आली. इतर सस्थांना ही अट शिथील आहे. तथापि हमी केंद्रांसंदर्भात अद्यापही प्रस्ताव दाखल झाले नाही. यामुळे यावर्षी केंद्र उघडणार किंवा नाही, असा प्रश्न जिल्हाभरातील शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे.गतवर्षीचे चुकारे अद्याप बाकीचगतवर्षी खरेदी करण्यात आलेल्या तूर आणि हरभºयाचे चुकारे अद्यापही शेतकºयांना मिळाले नाही. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यात यावर्षी अद्याप हमी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतमाल विकावा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यात शेतकरी भरडले जात आहे.हमी केंद्र उघडण्याबाबत जिल्हाभरातून प्रस्ताव मागितले गेले आहे. मात्र आजतागायत एकही प्रस्ताव खरेदी-विक्री संघाकडून फेडरेशनला प्राप्त झालेला नाही.- बाळकृष्ण गावंडे,जिल्हा मार्केटिंग अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन, यवतमाळ