शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शिक्षकांना आता २० टक्के पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 10:48 IST

एक तपापेक्षा अधिक काळ विनावेतन ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर यावर्षीच्या दिवाळीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हाती २० टक्के पगार पडणार आहे.

ठळक मुद्दे१२ वर्षांनंतर मोबदलादिवाळीपूर्वी वेतन देण्याचे आदेश

विनोद ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एक तपापेक्षा अधिक काळ विनावेतन ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर यावर्षीच्या दिवाळीला शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हाती २० टक्के पगार पडणार आहे. तसे पत्र शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकांना पाठविले आहे.१५ वर्षांपूर्वी राज्यात हजारो कायम विनाअनुदानित शाळांची खैरात वाटली गेली. भविष्यात केव्हा तरी वेतन सुरू होईल या आशेने लाखो शिक्षक व कर्मचाºयांनी या शाळांमध्ये नोकरी पत्करली. सतत संघर्ष केल्यानंतर शासनाने कायम अनुदानित मधला कायम शब्द काढून घेतला. त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. शासनाने या विनाअनुदानित शाळांना काही निकष लावून त्यांची अनुदानासाठी पात्रता तपासण्याचे ठरविले. सर्व शाळांची निकषानुसार तपासणी करण्यात आली. मात्र या निकषात फारच थोड्या शाळा पात्र ठरल्या. अशा शाळांना तीन वर्षांपूर्वी शासनाने २० टक्के अनुदान सुरू केले. मात्र बहुसंख्य शाळा अनुदानापासून वंचित राहिल्या. त्यामुळे सुटलेल्या शाळांतील शिक्षकांच्या तोंडचे पाणी पळाले. मग अशा शाळांतील शिक्षक व कर्मचाºयांनी कृती समिती तयार करून लढा उभारला. निकषातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी रेटून धरली. शासनानेही दोन पावले माघार घेऊन जाचक अटी शिथील केल्या. मग अशा उर्वरित शाळा १ व २ जुलै २०१७ च्या शासन निर्णयान्वये २० टक्के अनुदानास पात्र ठरविण्यात आल्या. मात्र वर्ष लोटूनही या शाळांतील शिक्षक व कर्मचारी यांचे वेतन काढण्याचे आदेश निघाले नाही. तेव्हा कृती समितीने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. शिक्षक व पदवीधर आमदारांनी शिक्षकांची बाजू शासनाला पटवून दिली. तेव्हा शासनाने दखल घेऊन या शिक्षकांना न्याय दिला. संचालकांनी सर्व शिक्षणाधिकारी व वेतनपथक अधीक्षकांना पत्र पाठवून शाळांची तपासणी करून दिवाळीपूर्वी वेतन अदा करण्याची कार्यवाही करण्यास सुचविले आहे.शाळांना हवे १०० टक्के अनुदानविनाअनुदानित शाळा निकषांमध्ये पात्र ठरल्यास पाचव्या वर्षी २० टक्के अनुदान व नवव्या वर्षी १०० टक्के अनुदान देण्याची तरतूद केली होती. मात्र या शाळांना १२-१५ वर्षे होऊनही त्यांची २० टक्के अनुदानातच बोळवण केली जात आहे. पुढचा ४० टक्केचा टप्पासुद्धा अजून शिक्षकांना मिळाला नाही. पात्र शाळांना १०० टक्के वेतन अनुदान सुरू करावे, अशी शिक्षकांची आर्त मागणी आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक