शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तालुक्यात कोरोना सावटात बेरोजगार युवकांवर आले गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

आधुनिक काळात युवकांचा कल ऑनलाईन पद्धतीकडे वाढला आहे. एका हातात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल युवक फिरताना दिसत आहे. मात्र त्यांच्याकडे आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शासन त्यांना रोजगार देऊ शकत नाही. यामुळे अनेक तरुणांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. यातूनच काही युवक व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र शहर व तालुक्यात दिसून येत आहे.

ठळक मुद्देहातांना कामच नाही । पदवी, पदव्युत्तर रिकामे, शेतकरी व नागरिकही आले संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : कोरोनाच्या सावटात तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांवर गंडांतर आले आहे. हाताला काम मिळत नसल्याने युवक हताश होत आहे. याशिवाय शेतकरी आणि सामान्य नागरिकही कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झाले आहे.आधुनिक काळात युवकांचा कल ऑनलाईन पद्धतीकडे वाढला आहे. एका हातात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल युवक फिरताना दिसत आहे. मात्र त्यांच्याकडे आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शासन त्यांना रोजगार देऊ शकत नाही. यामुळे अनेक तरुणांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. यातूनच काही युवक व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र शहर व तालुक्यात दिसून येत आहे. शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या आपल्या आई, वडिलांना सहकार्य करण्याची भरपूर इच्छा आहे. मात्र ऑनलाईन व्यवस्थेमुळे व्यापार ठप्प पडत आहे. याच ऑनलाईनमुळे स्थानिक रोजगार हिरावले जात आहे. परिणामी आर्थिक उत्पन्नाचे मार्ग हळूहळू बंद होत आहे.शासन ऑनलाईन व कॅशलेस व्यवहारांवर भर देत आहे. एक प्रकारे ऑनलाईन आणि कॅशलेस व्यवहार करण्याची सक्ती केली जात आहे. याकडे युवक आकर्षित होत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शासनाची नोकर भरती ठप्प पडली आहे. त्यामुळे युवक बेरोजगार आहे. खासगी शाळांवर कार्यरत युवा शिक्षक तुटपुंजा मानधनावर काम करीत आहे. शासकीय नोकरीची अपेक्षा फोल ठरत आहे. यामुळे युवकांचा हिरमोड होत आहे. परिणामी वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक युवक विविध मोर्चा, धरणे, आंदोलन आदींमध्ये गुरफटत आहे.चौकाचौकात सुशिक्षित बेरोजगारांचे घोळके दिसून येत आहे. यातून चिडीमारीचे प्रमाण वाढत आहे. युवकांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या पालकांचा जीव कासावीस होत आहे. कोरोनाच्या सावटात ही समस्या आणखी बिकट झाली आहे. आधीच बेरोजगार असलेल्या युवकांमध्ये आता नवीन बेरोजगारांची भर पडत आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प पडल्याने तेसुद्धा बेरोजगार झाले आहे.साखर कारखाना तीन वर्षांपासून बंदचतालुक्यासाठी कामधेनू ठरलेला पोफाळीचा वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. या कारखान्यावर अनेकांची उपजीविका चालत होती. कारखाना बंद असल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील किमान १०० युवक रोजगाराच्या शोधात आहे. लोकप्रतिनिधी आणि शासन उदासीन असल्याने युवक, शेतकरी, व्यावसायिक सर्वच त्रस्त आहे.