शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अव्वाच्या सव्वा वीजबिलाच्या दोन हजार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:01 IST

२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रिडींग करून वीज वितरण कंपनीला कळवावे असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचला नाही. अनेकांना हे रिडींग करायचे कसे याचा अंदाजच आला नाही. यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे बिल जून अखेर ग्राहकांना मिळाले.

ठळक मुद्देमहावितरणची सारवासारव : यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसदमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीने तीन महिन्याचे बिल एकाच वेळेस पाठविले. या बिलामध्ये विजेचे वाढीव युनिट दर लागून आले. यामुळे ग्राहकांना जबर शॉक बसला आहे. यवतमाळ, पांढरकवडा या दोन विभागातून दोन हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पुसदचा आकडा आणखी मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे.२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रिडींग करून वीज वितरण कंपनीला कळवावे असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचला नाही. अनेकांना हे रिडींग करायचे कसे याचा अंदाजच आला नाही. यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे बिल जून अखेर ग्राहकांना मिळाले.या बिलामध्ये वीज कंपनीच्या वाढीव रिडींग युनिटचा समावेश आहे. याशिवाय सर्व युनिट एकत्र झाल्याने त्याचे बिल वाढून आले, असा आरोप करीत ग्राहकांनी वीज कंपनी कार्यालयावर गत आठ ते दहा दिवसांपासून गराडा घातला आहे. दररोज शेकडो तक्रारी वीज कंपनी कार्यालयाकडे येत आहे. जे बिल ५०० ते हजार रुपयाचे होते, ते बिल ग्राहकांना आठ ते दहा हजारांच्या घरात मिळाले आहे.वीज बिलाच्या वाढीव दराने सर्वसामान्य ग्राहक चकित झाले आहे. यातून त्यांनी वीज कंपनी गाठत बिल दुरुस्त करण्याची मागणी कंपनीकडे केली आहे. कंपनीने ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेत कुठलेही बिल रिडींग पेक्षा जास्त नाही हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिल कमी होणार नाही, मात्र बिलाचे एकूण मूल्य दोन हप्त्यात विभागून देण्याबाबत कंपनी तयार आहे. प्रत्यक्षात ग्राहकाने ही वीज वापरली नव्हती, असे म्हणत ग्राहकांनी आम्हाला वाढीव बिल थोपविण्यात आल्याचा आरोप केला आहे.कोरोना काळात गर्दी नियंत्रित करण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहे. मात्र वीज कंपनी कार्यालयात एक खिडकी योजनेने प्रचंड गर्दी वाढली आहे.यातून कोरोना सारखा आजार पसरण्याचाही धोका आहे. कंपनीने ग्राहकांना सुविधा मिळावी यासाठी तक्रार जाणून घेण्याच्या जादा खिडक्या उघडाव्या अशी मागणी ग्राहक करीत आहे. वीज कंपनी यावर काय निर्णय घेते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :electricityवीज