शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

सुसाट वाहनाने ठोकरल्याने दुभाजकावर गप्पा मारत बसलेल्या दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST

घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. पोलीसही पोहोचले. वाहन चालक कुणाल देवराव नाखले याला ताब्यात घेण्यात आले. हा चालक दारू पिऊन असल्याचे आढळले. प्रवीण बनसोड व दिनेश निकोडे हे दोघेही मित्र सुस्वभावी होते. ते रोज रात्री नित्य नेमाणे फिरायला जात होते. मात्र, गुरुवारी ते बराच उशीर होऊनही परत न आल्याने कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवीण बनसोडे हा झेरॉक्स सेंटर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : रात्रीचे जेवण आटोपून फिरायला गेलेल्या दोन युवकांंना भरधाव वाहनाने चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजता येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर घडली. प्रवीण श्रीराम बनसोड (४०) आणि दिनेश जयराम निकोडे (४२) दोघेही रा.इंदिरानगर राळेगाव अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही गुरुवारी रात्री फिरून आल्यानंतर रस्त्यावरील दुभाजकावर गोष्टी सांगत बसले होते. त्यावेळी सुसाट वेगात आलेले वाहन (एमएच-३४-एए-७८४८) त्या दुभाजकावर धडकले. त्यात या दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. पोलीसही पोहोचले. वाहन चालक कुणाल देवराव नाखले याला ताब्यात घेण्यात आले. हा चालक दारू पिऊन असल्याचे आढळले. प्रवीण बनसोड व दिनेश निकोडे हे दोघेही मित्र सुस्वभावी होते. ते रोज रात्री नित्य नेमाणे फिरायला जात होते. मात्र, गुरुवारी ते बराच उशीर होऊनही परत न आल्याने कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवीण बनसोडे हा झेरॉक्स सेंटर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. कर्ता मुलगा गेल्याने त्याची आई सुशीला, भाऊ योगेश, पत्नी प्रीती, मुली स्पर्शिका व प्रियांशी हे कुटुंब उघड्यावर आले आहे, तर दिनेश निकोडे याच्यामागे पत्नी वनिता, मुलगा किरण, तुषार असा संसार आहे. 

महामार्ग ठरला मृत्यूचा सापळा - शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग सतत अपघातांना निमंत्रण देणारा सापळा ठरत आहे. यापूर्वीही येथे अनेक मृत्यू झाले. चारपदरी रोड असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याचे रुंदीकरण होऊ दिले नाही, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान, व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या प्रकाराचा निषेध नोंदविला. -सहायक पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांनी वाहन चालक कुणाल नाखले याच्यावर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असल्याने तेथे वाहनांची वर्दळ वाढली आहे. शहरातील अंतर्गत वाहतुकीचाही त्यावर भार वाढला आहे. मात्र या महामार्गावर पायदळ फिरणाऱ्यांनी काळजी घेण्याचे गरज निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघात