शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 22:00 IST

यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एक ते दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी होत आहे. सोयाबीन आणि तूर पिकाचीही अवस्था बिकट असून यावर्षी उत्पादन अर्ध्यावर होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउत्पादन अर्ध्यावर : सोयाबीन, कापूस, तुरीला अल्प पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एक ते दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी होत आहे. सोयाबीन आणि तूर पिकाचीही अवस्था बिकट असून यावर्षी उत्पादन अर्ध्यावर होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच चांगला पाऊस पडल्याने पिकांची वाढ समाधानकारक झाली. मात्र दसरा सणाच्या पूर्वी एखादा मोठा पावसाचा ठोक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक होता. मात्र तो न आल्याने आता कपाशीची झाडे सुकू लागली आहेत. पाऊस चांगला झाल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांना तीन ते चारवेळा कापसाचा वेचा करावा लागतो. मात्र यंदा पावसाने कापूस उत्पादकांचे सारे गणितच बिघडवून टाकले आहे.मागील वर्षी बोंडअळीच्या प्रकोपाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उद्वीग्न होऊन आपल्या शेतातील हिरव्यागार कपाशीवर नांगर फिरवून पीक उद्ध्वस्त केले. मात्र त्यातूनही स्वत:ला सावरत शेतकऱ्यांनी यावर्षी हंगामाची तयारी केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अगदी वेळेवर पावसाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र नंतर गरजेच्यावेळी पावसाने पुन्हा दडी मारली. परिणामी अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मात्र पावसाने साथ दिल्याने शेतकरी सावरला. शेतात हिरवीगार पिके डोलू लागली. बोंडअळीचे संकट फारसे न आल्याने शेतकरी आनंदी होता. गरज होती ती एका मोठ्या पावसाची. मात्र परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांना दगा दिला. या भागात परतीचा पाऊसदेखील हवा तसा कोसळला नाही. त्यामुळे शेतातील ओल कमी होऊन आता कपाशीची झाडे सुकू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी केवळ एकच वेचा केला. त्यांचे उत्पादन अर्ध्यावर आले. एकीकडे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे मात्र वणी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंबंधाने सरकारने अद्यापही पाऊल न उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. दिवाळीच्या सणामुळे शेतकऱ्यांनी व्यापारी मागेल त्या भावात कापसाची विक्री केली. सोयाबीन, तुरीचेदेखील तेच हाल झालेत. अनेक शिवारे आता पिकांअभावी ओस दिसू लागली आहे. ओलित करणाºया शेतकऱ्यांत बोंडअळीची भीती अद्यापही आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती