शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 22:00 IST

यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एक ते दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी होत आहे. सोयाबीन आणि तूर पिकाचीही अवस्था बिकट असून यावर्षी उत्पादन अर्ध्यावर होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउत्पादन अर्ध्यावर : सोयाबीन, कापूस, तुरीला अल्प पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एक ते दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी होत आहे. सोयाबीन आणि तूर पिकाचीही अवस्था बिकट असून यावर्षी उत्पादन अर्ध्यावर होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच चांगला पाऊस पडल्याने पिकांची वाढ समाधानकारक झाली. मात्र दसरा सणाच्या पूर्वी एखादा मोठा पावसाचा ठोक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक होता. मात्र तो न आल्याने आता कपाशीची झाडे सुकू लागली आहेत. पाऊस चांगला झाल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांना तीन ते चारवेळा कापसाचा वेचा करावा लागतो. मात्र यंदा पावसाने कापूस उत्पादकांचे सारे गणितच बिघडवून टाकले आहे.मागील वर्षी बोंडअळीच्या प्रकोपाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उद्वीग्न होऊन आपल्या शेतातील हिरव्यागार कपाशीवर नांगर फिरवून पीक उद्ध्वस्त केले. मात्र त्यातूनही स्वत:ला सावरत शेतकऱ्यांनी यावर्षी हंगामाची तयारी केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अगदी वेळेवर पावसाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र नंतर गरजेच्यावेळी पावसाने पुन्हा दडी मारली. परिणामी अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मात्र पावसाने साथ दिल्याने शेतकरी सावरला. शेतात हिरवीगार पिके डोलू लागली. बोंडअळीचे संकट फारसे न आल्याने शेतकरी आनंदी होता. गरज होती ती एका मोठ्या पावसाची. मात्र परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांना दगा दिला. या भागात परतीचा पाऊसदेखील हवा तसा कोसळला नाही. त्यामुळे शेतातील ओल कमी होऊन आता कपाशीची झाडे सुकू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी केवळ एकच वेचा केला. त्यांचे उत्पादन अर्ध्यावर आले. एकीकडे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे मात्र वणी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंबंधाने सरकारने अद्यापही पाऊल न उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. दिवाळीच्या सणामुळे शेतकऱ्यांनी व्यापारी मागेल त्या भावात कापसाची विक्री केली. सोयाबीन, तुरीचेदेखील तेच हाल झालेत. अनेक शिवारे आता पिकांअभावी ओस दिसू लागली आहे. ओलित करणाºया शेतकऱ्यांत बोंडअळीची भीती अद्यापही आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती