शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 22:00 IST

यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एक ते दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी होत आहे. सोयाबीन आणि तूर पिकाचीही अवस्था बिकट असून यावर्षी उत्पादन अर्ध्यावर होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउत्पादन अर्ध्यावर : सोयाबीन, कापूस, तुरीला अल्प पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एक ते दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी होत आहे. सोयाबीन आणि तूर पिकाचीही अवस्था बिकट असून यावर्षी उत्पादन अर्ध्यावर होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच चांगला पाऊस पडल्याने पिकांची वाढ समाधानकारक झाली. मात्र दसरा सणाच्या पूर्वी एखादा मोठा पावसाचा ठोक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक होता. मात्र तो न आल्याने आता कपाशीची झाडे सुकू लागली आहेत. पाऊस चांगला झाल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांना तीन ते चारवेळा कापसाचा वेचा करावा लागतो. मात्र यंदा पावसाने कापूस उत्पादकांचे सारे गणितच बिघडवून टाकले आहे.मागील वर्षी बोंडअळीच्या प्रकोपाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उद्वीग्न होऊन आपल्या शेतातील हिरव्यागार कपाशीवर नांगर फिरवून पीक उद्ध्वस्त केले. मात्र त्यातूनही स्वत:ला सावरत शेतकऱ्यांनी यावर्षी हंगामाची तयारी केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अगदी वेळेवर पावसाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र नंतर गरजेच्यावेळी पावसाने पुन्हा दडी मारली. परिणामी अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मात्र पावसाने साथ दिल्याने शेतकरी सावरला. शेतात हिरवीगार पिके डोलू लागली. बोंडअळीचे संकट फारसे न आल्याने शेतकरी आनंदी होता. गरज होती ती एका मोठ्या पावसाची. मात्र परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांना दगा दिला. या भागात परतीचा पाऊसदेखील हवा तसा कोसळला नाही. त्यामुळे शेतातील ओल कमी होऊन आता कपाशीची झाडे सुकू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी केवळ एकच वेचा केला. त्यांचे उत्पादन अर्ध्यावर आले. एकीकडे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे मात्र वणी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंबंधाने सरकारने अद्यापही पाऊल न उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. दिवाळीच्या सणामुळे शेतकऱ्यांनी व्यापारी मागेल त्या भावात कापसाची विक्री केली. सोयाबीन, तुरीचेदेखील तेच हाल झालेत. अनेक शिवारे आता पिकांअभावी ओस दिसू लागली आहे. ओलित करणाºया शेतकऱ्यांत बोंडअळीची भीती अद्यापही आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती