शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

प्रशासक मंडळासाठी काँग्रेसच्या दोन याद्या

By admin | Updated: August 8, 2014 00:14 IST

विधानसभा निवडणुकीची वेध लागल्यामुळे बाजार समितीवर प्रशासक मंडळ निवडण्यालाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. संभाव्य राजकीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून ही निवड केली जात आहे.

नेर : विधानसभा निवडणुकीची वेध लागल्यामुळे बाजार समितीवर प्रशासक मंडळ निवडण्यालाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. संभाव्य राजकीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून ही निवड केली जात आहे. काँग्रेसमध्ये या बाबत एकमत नसल्याचे स्पष्ट झाले असून दोन स्वतंत्र याद्या प्रशासक मंडळाच्या नियुक्तीसाठी देण्यात आल्या आहे. बाजार समितीच्या प्रशासक मंडळावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या गृह मतदारसंघातच वाद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. माजी मंत्री संजय देशमुख यांनी आपल्या समर्थकांची यादी सादर केल्याने काँग्रेसचे अधिकृत प्रशासक मंडळ म्हणून कुणाची निवड करायची, हा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसला एकूण नऊ तर राष्ट्रवादीला सहा संचालक नियुक्त करायचे आहे. माजी मंत्र्याच्या यादीमध्ये इर्शाद खा साहेब, बंडू देशमुख, नितीन बोकडे, अरुण राऊत यांची नावे आहेत. यापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून नऊ सदस्यांची नावे पाठविण्यात आली होती. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा फायदा उठविण्याची संधी शिवसेनेने हेरली असून त्यांच्याकडूनही १३ सदस्यांच्या नावाची यादी देण्यात आली आहे. या तिन्ही यादी जिल्हा उपनिबंधक कक्षातून पडताळणीसाठी सहाय्यक उपनिबंधकाकडे पाठविण्यात आल्या आहे. सुरुवातीला काँग्रेसकडून पाठविण्यात आलेल्या यादीतील नऊ नावांपैकी पाच सदस्य अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासक मंडळ निवडण्यावरूनच कलह सुरू असताना बाजार समितीचे कामकाज मात्र खोळंबलेले आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने काँग्रेसचा प्रत्येक गट प्रशासक मंडळासाठी प्रतिष्ठा पणाला लावून आहे. यात शिवसेनेनही उडी घेतल्याने प्रशासक मंडळ निवडीची प्रक्रिया आणखीनच किचकट झालेली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या गृह मतदारसंघातच काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याच दिसून येते. शिवसेनेचे आव्हान उभे असतानाही या मतदारसंघात काँग्रेसने पक्षबांधणी केली नाही. उलट नेत्यांकडूनच गटबाजी जोपासण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. प्रशासक मंडळाच्या नियुक्तीतही दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊ नये यावरून स्थानिक पातळीवर किती टोकाचे मतभेद आहे हे दिसून येते. राज्याच्या काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला स्वत:च्या मतदारसंघातीलच घडी बसविता आली नसल्याचे स्पष्ट होते. या सर्व बाबी शिवसेनेच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून मतदारसंघातील सत्ता काँग्रेसला हस्तगत करता आली नाही. ही दुफळी अशीच कायम राहिल्यास याचे हे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सहन करावे लागतील. हे सांगण्यासाठी कोण्या जोतिषाची गरज नाही. (तालुका प्रतिनिधी)