शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासक मंडळासाठी काँग्रेसच्या दोन याद्या

By admin | Updated: August 8, 2014 00:14 IST

विधानसभा निवडणुकीची वेध लागल्यामुळे बाजार समितीवर प्रशासक मंडळ निवडण्यालाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. संभाव्य राजकीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून ही निवड केली जात आहे.

नेर : विधानसभा निवडणुकीची वेध लागल्यामुळे बाजार समितीवर प्रशासक मंडळ निवडण्यालाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. संभाव्य राजकीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून ही निवड केली जात आहे. काँग्रेसमध्ये या बाबत एकमत नसल्याचे स्पष्ट झाले असून दोन स्वतंत्र याद्या प्रशासक मंडळाच्या नियुक्तीसाठी देण्यात आल्या आहे. बाजार समितीच्या प्रशासक मंडळावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या गृह मतदारसंघातच वाद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. माजी मंत्री संजय देशमुख यांनी आपल्या समर्थकांची यादी सादर केल्याने काँग्रेसचे अधिकृत प्रशासक मंडळ म्हणून कुणाची निवड करायची, हा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसला एकूण नऊ तर राष्ट्रवादीला सहा संचालक नियुक्त करायचे आहे. माजी मंत्र्याच्या यादीमध्ये इर्शाद खा साहेब, बंडू देशमुख, नितीन बोकडे, अरुण राऊत यांची नावे आहेत. यापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून नऊ सदस्यांची नावे पाठविण्यात आली होती. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा फायदा उठविण्याची संधी शिवसेनेने हेरली असून त्यांच्याकडूनही १३ सदस्यांच्या नावाची यादी देण्यात आली आहे. या तिन्ही यादी जिल्हा उपनिबंधक कक्षातून पडताळणीसाठी सहाय्यक उपनिबंधकाकडे पाठविण्यात आल्या आहे. सुरुवातीला काँग्रेसकडून पाठविण्यात आलेल्या यादीतील नऊ नावांपैकी पाच सदस्य अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासक मंडळ निवडण्यावरूनच कलह सुरू असताना बाजार समितीचे कामकाज मात्र खोळंबलेले आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने काँग्रेसचा प्रत्येक गट प्रशासक मंडळासाठी प्रतिष्ठा पणाला लावून आहे. यात शिवसेनेनही उडी घेतल्याने प्रशासक मंडळ निवडीची प्रक्रिया आणखीनच किचकट झालेली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या गृह मतदारसंघातच काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याच दिसून येते. शिवसेनेचे आव्हान उभे असतानाही या मतदारसंघात काँग्रेसने पक्षबांधणी केली नाही. उलट नेत्यांकडूनच गटबाजी जोपासण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. प्रशासक मंडळाच्या नियुक्तीतही दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊ नये यावरून स्थानिक पातळीवर किती टोकाचे मतभेद आहे हे दिसून येते. राज्याच्या काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला स्वत:च्या मतदारसंघातीलच घडी बसविता आली नसल्याचे स्पष्ट होते. या सर्व बाबी शिवसेनेच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून मतदारसंघातील सत्ता काँग्रेसला हस्तगत करता आली नाही. ही दुफळी अशीच कायम राहिल्यास याचे हे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सहन करावे लागतील. हे सांगण्यासाठी कोण्या जोतिषाची गरज नाही. (तालुका प्रतिनिधी)