शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपाच्या लाटेतही काँग्रेसला दोन लालदिवे

By admin | Updated: March 23, 2017 00:03 IST

जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सर्वत्र भाजपाचे साम्राज्य आहे, नोटाबंदीनंतरही भाजपाची लाट कायम आहे.

सत्तेची लॉटरी : आधी विधानपरिषद, आता जिल्हा परिषद यवतमाळ : जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सर्वत्र भाजपाचे साम्राज्य आहे, नोटाबंदीनंतरही भाजपाची लाट कायम आहे. मात्र या लाटेतही काँग्रेस पक्षाने आपली घोडदौड कायम ठेवत दोन लालदिवे मिळविले आहेत. पहिला लालदिवा हा विधान परिषद उपसभापती पदाच्या निमित्ताने तर दुसरा आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निमित्ताने काँग्रेसला मिळाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश भाजपाला पोषक वातावरण आहे. सत्तेतही भाजपाचा सहभाग अधिक आहे. सात पैकी पाच आमदार भाजपाकडे आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपा सांभाळत आहेत. याशिवाय केंद्रीय गृहराज्यमंत्री, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्षपद, अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निमित्ताने राज्याचे गृहराज्यमंत्रीपद भाजपाकडे आहे. अलिकडेच झालेल्या नगरपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपाने चांगले यश मिळविले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपा चार वरून चौपट वाढ करीत १८ जागांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात एकूणच सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेला पोषक असे वातावरण असताना काँग्रेसने प्रचंड गटबाजी असूनही आपला सत्तेचा लालदिवा पूर्णत: विझू दिलेला नाही. राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आहे. एकेकाळी पाच आमदार असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचा एकही सदस्य नाही. असे असताना जिल्ह्यात काँग्रेसने माणिकराव ठाकरे यांच्या रुपाने विधान परिषदेचे उपसभापतीपद अर्थात लालदिवा खेचून आणला. त्याचाच प्रत्यय मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला आला. जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक २० जागा सेनेकडे व त्या खालोखाल १८ जागा भाजपाकडे असताना काँग्रेसने अवघ्या ११ सदस्यांच्या बळावर अध्यक्षपद मिळवित लालदिवा आपल्याकडे खेचून घेतला. या सत्तेसाठी राष्ट्रवादी व भाजपाचे पाठबळ असले तरी ‘ज्याच्याकडे अध्यक्षपद त्याची सत्ता’ या समीकरणानुसार यवतमाळ जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्याचे स्पष्ट आहे. भाजपा-सेना युती होईल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागेल, असेच बहुतांश चित्र होते. मात्र भाजपा-सेनेतील वाद वाढत गेला आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला. माधुरी आडे यांच्या रुपाने मिळालेले अध्यक्षपद जिल्ह्यात काँग्रेससाठी जणू लॉटरीच ठरले आहे. भाजपाच्या साम्राज्यातही काँग्रेसकडे दोन लालदिवे असल्याने पक्षाचे वजन वाढल्याचे मानले जाते. काँग्रेसची ही कामगिरी जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात चर्चेचा विषय ठरली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) जिल्ह्याची राजकीय शिस्त बिघडली महाराष्ट्राच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याचे वेगळे वजन होते. राज्याचे मुख्यमंत्रीपद एक तपापेक्षा अधिक काळ जिल्ह्याकडे होते. सर्वच प्रमुख पक्षातील नेत्यांमध्ये आपसी राजकीय समन्वय होता. पक्षाची ध्येय धोरणे, विचारधारेला वैयक्तिक स्वार्थापेक्षा अधिक महत्व दिले जात होते. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनुभवी नेत्यांच्या शब्दाला किंमत होती, अन्य पक्षांमध्येही या नेत्यांचा शब्द टाळला जात नव्हता. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला एकवेगळीच शिस्त लागली होती. परंतु गेल्या पाच-सहा वर्षांपासून जिल्ह्याची ही राजकीय शिस्त पूर्णत: बिघडली असून त्याला व्यावसायिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रत्येकच निवडणुकीत पैशाच्या बळावर खरेदी-विक्रीच्या बाता व कृती केली जात आहे. कधी काळी ज्यांचा शब्द सर्वच पक्षात प्रमाण होता ते नेतेही आता या व्यावसायिक राजकारणाचा एक भाग बनत असल्याचे पाहून जुन्या राजकारण्यांमध्ये खंत व्यक्त केली जात आहे.