सोनखास : शेतात गंजी लावून असलेला दोन लाख रुपयांचा हरभरा जाळल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजता घडली. संजय रामनाथजी माने (रा. उत्तरवाढोणा) यांच्या सोनखास शिवारातील शेतात हा प्रकार घडला. संजय माने यांनी यावर्षी आठ एकरात हरभरा घेतला होता. आठ दिवसांपूर्वी कापणी करून गंजी शेतात एका ठिकाणी लावून ठेवली होती. रात्री अचानक गंजी पेटल्याची बाब लगतच्या शेतकऱ्यांना लक्षात आली. त्यांनी संजय माने यांना कळविले. मात्र हरभरा विझविण्यासाठी कुठलेही साधन उपलब्ध झाले नाही. संपूर्ण गंजी जळून खाक झाली. जवळपास ५० क्ंिवटल हरभरा माने यांना होणार होता. याची किंमत जवळपास दोन लाख रुपये मिळाली असती. जोपासणा करून घेतलेला हरभरा घरात येत असतानाच आगीचा भक्ष्यस्थानी सापडला. या घटनेची तक्रार लाडखेड पोलीस ठाणे तसेच नेर तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. (वार्ताहर)
दोन लाखांचा हरभरा जाळला
By admin | Updated: February 24, 2016 02:44 IST