शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाटाळा येथे वर्धा नदीत वाहन कोसळून दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:36 IST

पाण्याचे पाऊच घेऊन वणीकडे येणारा टाटा एस (छोटा हाथी) वाहन पाटाळा पुलावरून वर्धा नदीत कोसळल्याने चालकासह दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देएक गंभीर जखमी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पाण्याचे पाऊच घेऊन वणीकडे येणारा टाटा एस (छोटा हाथी) वाहन पाटाळा पुलावरून वर्धा नदीत कोसळल्याने चालकासह दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली.मक्की नासीर चिनी (१९) व चालक संजय लोणारे (२६) दोघेही राहणार वणी अशी मृतांची नावे आहेत. येथील रमीजराजा अख्तर चिनी याचा कोल्ड्रींक्स व मिनरल वॉटर विकण्याचा व्यवसाय आहे. सोमवारी १९ फेब्रुवारीला रमीजराजा, त्याचा भाऊ मक्की नासीर चिनी व चालक संजय लोणारे हे तिघेजण टाटा एस (क्र.एम.एच.२९-ए.टी.०२०५) या वाहनाने पाणी पाऊच आणण्यासाठी वर्धा येथे गेले होते. वाहनात पाणी पाऊच भरून वणीकडे येत होते. मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास पाटाळा पुलावर चालक लोणारे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट नदीत कोसळले. रमीजराजा ट्रॉलीत बसून असल्याने तो नदीच्या प्रवाहात फेकल्या गेला, तर मक्की नासीर चिनी व संजय लोणारे हे दोघे केबिनमध्ये असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाला. रमीजराजा हा गंभीर जखमी झाला.घटनेची महिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन गावकºयांच्या मदतीने रमीजराजाला बाहेर काढले. याप्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.‘तो’ पूल धोकादायकवणी-वरोरा मार्गावरील वर्धा नदीवरील पाटाळा पूल अपघात प्रवणस्थळ म्हणूनच ओळखले जाते. आतापर्यंत या पुलावर अनेक अपघात झाले आहे. परंतु बांधकाम विभागाकडून अपघात होऊ नये म्हणून कोणतीही उपाययोजना केली नाही. परिणामी पुन्हा दोन तरुणांना जीव गमवावा लागला.

टॅग्स :Accidentअपघात