शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

पाटाळा येथे वर्धा नदीत वाहन कोसळून दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:36 IST

पाण्याचे पाऊच घेऊन वणीकडे येणारा टाटा एस (छोटा हाथी) वाहन पाटाळा पुलावरून वर्धा नदीत कोसळल्याने चालकासह दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देएक गंभीर जखमी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पाण्याचे पाऊच घेऊन वणीकडे येणारा टाटा एस (छोटा हाथी) वाहन पाटाळा पुलावरून वर्धा नदीत कोसळल्याने चालकासह दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली.मक्की नासीर चिनी (१९) व चालक संजय लोणारे (२६) दोघेही राहणार वणी अशी मृतांची नावे आहेत. येथील रमीजराजा अख्तर चिनी याचा कोल्ड्रींक्स व मिनरल वॉटर विकण्याचा व्यवसाय आहे. सोमवारी १९ फेब्रुवारीला रमीजराजा, त्याचा भाऊ मक्की नासीर चिनी व चालक संजय लोणारे हे तिघेजण टाटा एस (क्र.एम.एच.२९-ए.टी.०२०५) या वाहनाने पाणी पाऊच आणण्यासाठी वर्धा येथे गेले होते. वाहनात पाणी पाऊच भरून वणीकडे येत होते. मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास पाटाळा पुलावर चालक लोणारे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट नदीत कोसळले. रमीजराजा ट्रॉलीत बसून असल्याने तो नदीच्या प्रवाहात फेकल्या गेला, तर मक्की नासीर चिनी व संजय लोणारे हे दोघे केबिनमध्ये असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाला. रमीजराजा हा गंभीर जखमी झाला.घटनेची महिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन गावकºयांच्या मदतीने रमीजराजाला बाहेर काढले. याप्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.‘तो’ पूल धोकादायकवणी-वरोरा मार्गावरील वर्धा नदीवरील पाटाळा पूल अपघात प्रवणस्थळ म्हणूनच ओळखले जाते. आतापर्यंत या पुलावर अनेक अपघात झाले आहे. परंतु बांधकाम विभागाकडून अपघात होऊ नये म्हणून कोणतीही उपाययोजना केली नाही. परिणामी पुन्हा दोन तरुणांना जीव गमवावा लागला.

टॅग्स :Accidentअपघात