शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

भीषण अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

रात्रीची वेळ असल्याने अपघातग्रस्ताना मदत मिळण्यास विलंब झाला. जखमी गाडीच्या काचा फोडून बाहेर निघाले. मात्र उर्वरित दोघांना मदत न मिळाल्यामुळे त्यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. सकाळी ५ वाजता पांढरकवडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना आदिलाबाद येथे रवाना केले.

ठळक मुद्देदोघे जखमी : राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्याने चालकाचे सुटले नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कपाटणबोरी : नागपूरहून हैदराबादकडे सुसाट वेगाने निघालेल्या जॅग्वार गाडीला पिंपळखुटीनजीक राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन त्यात दोनजण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास पिंपळखुटी रेल्वे पुलाजवळ घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून रस्त्याच्या बाजुला २० फूट खोल असलेल्या शेतात फेकले गेले.योगेश गुप्ता (३७) रा.चप्पलबाजार हैद्राबाद (तेलंगणा), पटाली किशोरकुमार क्रिष्णाचार्य (३६) रा.चारमिनार, सिटीकॉलेजजवळ हैद्राबाद अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये चालक विकास अग्रवाल (४०) व योगेश अग्रवाल (३५) दोघेही रा.हैद्राबाद यांचा समावेश आहे. हे सर्वजण नागपुरहून (टी.एस.१२-इ.सी.९७१९) क्रमांकाच्या जॅग्वार कारने हैद्राबादकडे जात होते. दरम्यान, पिंपळखुटीजवळ असलेल्या एका खड्ड्यात वाहन आदळल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व ही कार ५०० मीटर दूर रस्त्याच्या बाजुला जाऊन आदळली. चालक व त्याच्या बाजुला बसलेला युवक सीटबेल्ट लावून असल्यामुळे त्यांना किरकोळ मार लागला. मात्र मागील सीटवर बसून असलेल्या योगेश गुप्ता व पटाली क्रिष्णाचार्य या दोघांचाही मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने अपघातग्रस्ताना मदत मिळण्यास विलंब झाला. जखमी गाडीच्या काचा फोडून बाहेर निघाले. मात्र उर्वरित दोघांना मदत न मिळाल्यामुळे त्यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. सकाळी ५ वाजता पांढरकवडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना आदिलाबाद येथे रवाना केले. एपीआय विनोद झळके, जमादार रंगलाल पवार, क्षीरसागर, चव्हाण, उघडे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. राष्ट्रीय महामार्गावर अजुनही काही ठिकाणचे काम बाकी असून येथील केवळ २० फुटाचे काम बाकी आहे. या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत असूनही राजपथ कंपनी सदर रस्त्याचे काम का करित नाही, असा सवाल पिंपळखुटीवासींयानी उपस्थित केला आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी संतप्त गावकऱ्यांनी काही काळ रस्ता रोखून ठेवला होता. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Accidentअपघात