शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दोन उपमुख्यमंत्री चालतात, तर दोन उपसरपंचही करा; गावगाड्यातही उलथापालथीचे संकेत

By अविनाश साबापुरे | Updated: July 14, 2023 18:31 IST

Yawatmal News राज्याच्या राजकारणातील या सोयीच्या समीकरणाचे परिणाम आता गावपातळीवरही होण्याची शक्यता दिसू लागली आहे. अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायतींमध्ये दोन-दोन उपसरपंच का नेमण्यात येऊ नये, असा आवाज उठू लागला आहे. 

अविनाश साबापुरे

यवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून सत्तेचे समीकरण जुळवित असताना मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री पद देण्याचाही प्रघात सुरू झाला आहे. आता तर जोडतोडीचे राजकारण करताना चक्क दोन-दोन उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. परंतु, राज्याच्या राजकारणातील या सोयीच्या समीकरणाचे परिणाम आता गावपातळीवरही होण्याची शक्यता दिसू लागली आहे. अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायतींमध्ये दोन-दोन उपसरपंच का नेमण्यात येऊ नये, असा आवाज उठू लागला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता उलथवून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने खुर्ची काबिज केली. त्यात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर बसविण्यात आले. पण वर्षभरातच या युतीमध्ये राष्ट्रवादीमधील अजित पवार गट सामील झाला. त्यामुळे सत्तेचे तिहेरी वाटप झाले आणि आणखी एक उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. या घडामोडींबाबत खेड्यापाड्यातील जनता मात्र अतिशय सजगपणे लक्ष ठेवून आहे. त्यामुळेच आता ग्रामपंचायतीमध्येही दोन उपसरपंच नेमण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. 

एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ही राज्याचा कारभार अधिक सक्षमपणे चालविण्यासाठी केलेली सोय आहे की, तीन पक्षातील असंतुष्टांना शांत करण्याची तजवीज आहे, हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे. परंतु, सत्तेत अशा पद्धतीने अनेकांना वाटा मिळू शकतो, हे समजल्याने ग्रामपंचायत सदस्यांमध्येही उपसरपंच पद पटकावण्याची खुमखुमी आता जागृत झाली आहे. एक सरपंच आणि दोन उपसरपंच झाल्यास गावातील विकासकामे झपाट्याने मार्गी लागतील, असेही दावे केले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात त्यातही राज्यस्तरावरील राजकारणाचाच वास आहे. अनेक गावांमध्ये सरपंच एका पॅनलचा आणि बहुसंख्य सदस्य दुसऱ्या पॅनलचे आहेत. तेथे नाईलाजाने डोक्यावर बसलेल्या सरपंचाला नामोहरम करण्यासाठी दोन उपसरपंच नेमण्याची खेळी खेळली जात आहे. विशेष म्हणजे दोन उपसरपंच नेमण्याची तरतूद करावी, अशी मागणी काही संघटनांनी लेखी स्वरुपात प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे रवानाही केली आहे.

संविधानात तरतूद आहे का?संविधानाच्या अनुच्छेद १६३ (१) मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या रचनेसंदर्भात व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रिमंडळाचे नेतृत्व हे मुख्यमंत्री करीत असतात. तर अनुच्छेद १६४ च्या उपकलम १ नुसार राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल हे इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. परंतु, या दोन्ही अनुच्छेदामध्ये उपमुख्यमंत्र्यांबाबत कोणताही उल्लेख नाही. त्यामुळेच उपमुख्यमंत्र्यांचा दर्जा हा इतर कॅबिनेट मंत्र्यांएवढाच असतो. त्यांचे पगार आणि भत्तेही सारखेच आहेत. परंतु, उपसरपंच हे पद तसे नाही. बहुतांश गावांमध्ये सरपंचापेक्षा उपसरपंचच ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार पाहात आहेत. अशा ठिकाणी दोन उपसरपंच झाल्यास कारभाराचा गाडा मध्येच फेल पडण्याची दाट शक्यता आहे.

सरपंच थेट निवडता, मुख्यमंत्री का नाही?ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पूर्वी सदस्यांची निवडणूक आटोपल्यानंतर त्या सदस्यांमधून सरपंच निवडला जात होता. परंतु अलिकडील काही दिवसात ही पद्धती बदलली. आता सदस्यांप्रमाणे सरपंच देखिल थेट जनतेतूनच निवडला जातो. हीच पद्धती मुख्यमंत्री पदासाठी का अवलंबली जात नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दोन उपसरपंच निवडीचे परिपत्रक काढाबेलोरा : सर्व ग्रामपंचायतींमध्ये दोन उपसरपंच निवडीची तरतूद करण्यात यावी व त्याबाबतचे परिपत्रक काढून अंमलबजावणी करावी, अशी मागणी तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय आडे यांनी केली. त्यासाठी त्यांनी पुसदचे एसडीओ एस. कार्तिकेयन यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनही पाठविले. दोन उपसरपंच केल्यामुळे गावातील विविध गटांनाही विकासप्रक्रियेत सहभागी होता येईल, असे आडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Politicsराजकारण