शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नव्या जिल्हाधिकाऱ्यांचे दोन दिवस ‘मिटिंग सेशन’

By admin | Updated: May 25, 2015 02:23 IST

जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे हातात घेतली. तेव्हापासूनच कामाचा धडाका सुरू केला आहे

यवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे हातात घेतली. तेव्हापासूनच कामाचा धडाका सुरू केला आहे. स्वागत व सत्कार सोहळ््याची औपचारिकता आटोपताच त्यांनी आपल्या कार्यशैलीची छाप सोडली आहे. अधिनस्थ कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश देऊन प्रशासनाची दिशा काय राहील हे पहिल्याच भेटीत सांगितले. चौथा शनिवार आणि रविवार या सलग सुटीच्या दिवसांचा फायदा घेऊन जिल्हाधिकारी सिंह यांनी ‘मिटिंग सेशन’ आयोजित केले. जिल्हाधिकाऱ्यांना यवतमाळ जिल्हा नवीन असून, याचा अभ्यास करण्यात फार वेळ न घालविता अधिनस्थ सर्वच यंत्रणेंचा आढावा घेणे सुरू केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीची सुरूवात ही पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातून झाली. शिवाय खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक सार्वजनिक केल्याने सर्वसामान्यांसाठी जिल्हाधिकारी उपलब्ध राहतील हे त्यांनी दाखवून दिले. थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करता येत असल्याने आपसूकच शासकीय यंत्रणेवर याचा सकारात्मक परिणाम झाला. नियमात बसणारी कामे थांबवून ठेवल्यास आपली खैर नाही हे हेरून अनेकांनी अडवणुकीचे धोरण बाजुला सारले आहे. गेल्या काही दिवसात महसूल यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाला आलेली मरगळ झटकण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी शनिवारी सकाळी ७.३० वाजतापासून रात्री १०.३० पर्यंत बैठका घेतल्या. यात जिल्हा बँकर्स समिती, नगरपरिषद मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, आत्मा समितीची बैठक घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी १० वाजतापासूनच सायंकाळपर्यंत विविध विभागाच्या बैठकी बोलाविल्या. यात शेतकरी आत्महत्या, रोजगार हमी योजना, पुनर्वसन, पाणीटंचाई आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा आढावा अशा बैठका घेण्यात आल्या. अधिनस्थ यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी त्यांच्यात चेतना निर्माण करण्याची गरज आहे. वेळकाढू कर्मचाऱ्यांना ठिकाणावर आणण्यासाठी वेगळ््या पद्धतीचा अवलंबही केला जाईल अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी दिली होती. त्यानुसारच प्रशासनाला गतिमान करण्याच्या हालचाली सुरू आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांना १ तारखेला वेतनकर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत १ तारखेलाच वेतन देण्यात यावे अशी सूचना जिल्हा कोषागार अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी केली. ३० तारखेला पगारबिल सादर झाल्यास ते शक्य होणार नाही असे कोषागार अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पगार बिल वेळेत सादर करण्याच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील असेही सचिंद्रप्रताप सिंह यांनी सांगितले.