शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
4
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
5
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
6
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
7
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
8
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
9
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
10
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
11
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
12
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
13
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
14
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
15
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
16
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
17
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
18
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
19
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
20
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांकडे अडीच कोटी थकीत

By admin | Updated: April 13, 2016 02:48 IST

थकबाकीसाठी नागरिकांना कायम वेठीस धरणाऱ्या जीवन प्राधिकरणाच्या घशाला शासकीय कार्यालयांनीच कोरड आणली आहे.

जीवन प्राधिकरण पेचात : एसपी कार्यालयाकडे दीड कोटी तर सार्वजनिक बांधकामकडे ७७ लाख यवतमाळ : थकबाकीसाठी नागरिकांना कायम वेठीस धरणाऱ्या जीवन प्राधिकरणाच्या घशाला शासकीय कार्यालयांनीच कोरड आणली आहे. शहरातील विविध शासकीय कार्यालयांकडे पाणी बिलाचे तब्बल २ कोटी ६५ लाख ६७ हजार ५४० रुपये थकीत आहे. मात्र वसुलीची कोणतीही सोय नसल्याने विनंतीशिवाय दुसरा पर्यायच जीवन प्राधिकरणाकडे नाही. सामान्य नागरिकांकडे पाण्याचे बिल थकल्यास चौथ्या महिन्यात नळ कनेक्शन कापण्याची कारवाई जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येते. पाणी बिल भरावे म्हणून जाहीर नोटीस बजावली जाते. याशिवाय अनेक प्रकाराची कारवाई केली जाते. मात्र याच विभागाची शहरातील विविध शासकीय कार्यालयाने मोठी रक्कम थकविली आहे. मात्र वसुलीसाठी दाळ शिजत नसल्याचे दिसत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या जीवन प्राधिकरणला निधीची नितांत गरज आहे. शुध्दीकरण प्लान्ट चालविण्यासाठी सुध्दा पैश्याची मारमार असते. अशा स्थितीत शासकीय कार्यालयांनी थकविलेली रक्कम त्वरीत अदा करावी, अशा आशयाचे पत्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सर्व कार्यालयांच्या विभाग प्रमुखांना दिले आहेत. शिस्तीच्या खात्यानेच सर्वाधिक पाणी बिल थकविले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एक कोटी ४५ लाख ७४ हजार ९९६ रुपयांचे बिल भरावे असे पत्र देण्यात आले आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ७७ लाख १७ हजार, जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे १२ लाख ८१ हजार ७७१, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे ३ लाख ७६ हजार, लोहारा ग्रामपंचायतीकडे २४ लाख ३ हजार, उमरसरा ग्रामपंचायतीकडे ७८ हजार ३३०, बीएसएनएल कार्यालयाकडे १ लाख ३५ हजार रुपये बिल थकीत आहे. आता वसुलीसाठी प्रयत्न केले जात आहे. दरवर्षीच या कार्यालय प्रमुखांना पत्र देऊन पाणी बिलाची मागणी केली जाते. मात्र आजपर्यंत कधीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तसेच जीवन प्राधिकरणकडूनही कधी या कार्यालयांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात नाही. (कार्यालय प्रतिनिधी) खासगी थकीतदारांचीही यादी लांबलचक खासगी ग्राहकांकडेही मोठी रक्कम थकीत आहे. वसुलीसाठी आवश्यक ती यंत्रणा प्राधिकरणाकडे नाही. स्वत: बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांच्या भरवश्यावर या विभागाचा गाडा चालतो. दोन वर्षांपूर्वीपर्यंत प्राधिकरणाने निर्भय योजना जाहीर केली होती. या अंतर्गत वसुलीचा मोठा आकडा गाठता आला. शासकीय कार्यालयांनीही या मोहिमेत सहभागी होत बिलाचा भरणा केला. यावर्षी मात्र योजना राबविली नाही. खासगी थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी आणखी यंत्रणा आवश्यक असल्याचे प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे.