शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
2
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
3
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
4
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
5
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
6
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
7
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
8
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
9
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
10
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
11
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
12
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
13
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
15
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
16
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
17
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
18
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
19
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
20
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

बदलत्या हवामानामुळे शेतकरी अडचणीत

By admin | Updated: January 3, 2015 23:10 IST

निसर्गाची अवकृपा तसेच अन्य गोष्टींमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे़ प्रदूषणामुळे राजूर भागातील शेतजमीन नापिक झालेली आहे़ ही शेतजमीन मानवी कृत्यामुळे नापिक झालेली

नांदेपेरा : निसर्गाची अवकृपा तसेच अन्य गोष्टींमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे़ प्रदूषणामुळे राजूर भागातील शेतजमीन नापिक झालेली आहे़ ही शेतजमीन मानवी कृत्यामुळे नापिक झालेली असतानाच आता निसर्गाने देखील शेतकऱ्यांवर अवकृपा केली. सततच्या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ढगाळ वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी आदी आजारांत वाढ झाली आहे़ बदलत्या हवामानाचा सर्वच क्षेत्रावर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे़ हवामानाच्या अनिश्चिततेमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे़ खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दिलेला दगा, तसेच रबी हंगामात सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले उत्पादनही गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, अवेळी पावसामुळे शेती व्यवसायाला फटका बसत आहे़ आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसामुळे पुन्हा आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे़ ढगाळ वातावरण व पावसामुळे तूर, हरभरा, गहू यासह अन्य पिकांना फटका बसला आहे़ रोगट हवामानामुळे पिके खराब व्हायला सुरूवात झाली आहे़ ढगाळ हवामानामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावली आहे. सूर्याचे दर्शन् दुर्लभ झाले आहेत. त्यामुळे पिकावर रोगराई वाढण्याचा धोका वाढला. अकाली पडणाऱ्या पावसामुळे तूर, गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे़ (वार्ताहर)