शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानामुळे शेतकरी अडचणीत

By admin | Updated: January 3, 2015 23:10 IST

निसर्गाची अवकृपा तसेच अन्य गोष्टींमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे़ प्रदूषणामुळे राजूर भागातील शेतजमीन नापिक झालेली आहे़ ही शेतजमीन मानवी कृत्यामुळे नापिक झालेली

नांदेपेरा : निसर्गाची अवकृपा तसेच अन्य गोष्टींमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे़ प्रदूषणामुळे राजूर भागातील शेतजमीन नापिक झालेली आहे़ ही शेतजमीन मानवी कृत्यामुळे नापिक झालेली असतानाच आता निसर्गाने देखील शेतकऱ्यांवर अवकृपा केली. सततच्या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ढगाळ वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी आदी आजारांत वाढ झाली आहे़ बदलत्या हवामानाचा सर्वच क्षेत्रावर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे़ हवामानाच्या अनिश्चिततेमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे़ खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दिलेला दगा, तसेच रबी हंगामात सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले उत्पादनही गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, अवेळी पावसामुळे शेती व्यवसायाला फटका बसत आहे़ आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसामुळे पुन्हा आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे़ ढगाळ वातावरण व पावसामुळे तूर, हरभरा, गहू यासह अन्य पिकांना फटका बसला आहे़ रोगट हवामानामुळे पिके खराब व्हायला सुरूवात झाली आहे़ ढगाळ हवामानामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावली आहे. सूर्याचे दर्शन् दुर्लभ झाले आहेत. त्यामुळे पिकावर रोगराई वाढण्याचा धोका वाढला. अकाली पडणाऱ्या पावसामुळे तूर, गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे़ (वार्ताहर)