शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

जलयुक्त शिवारचे चार कोटी वळविले

By admin | Updated: April 6, 2016 02:28 IST

राज्याचे मुख्यमंत्री जलयुक्त शिवारबाबत गंभीर असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र ‘डीपीसी’च्या लेटलतिफ कारभारामुळे तब्बल चार कोटी रुपयांचा...

‘डीपीसी’चा लेटलतिफ कारभार : जिल्हा परिषद, वन विभागाला लाभ यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री जलयुक्त शिवारबाबत गंभीर असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र ‘डीपीसी’च्या लेटलतिफ कारभारामुळे तब्बल चार कोटी रुपयांचा निधी परत पाठविण्याची वेळ कृषी विभागावर आली आहे. अखेरच्या क्षणी सारवासारव करीत हा निधी परत जाऊ नये म्हणून जिल्हा परिषद आणि वन खात्याला वळविण्यात आला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार हे मिशन म्हणून हाती घेतले. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे सिंचन सुविधांचा अभाव हे प्रमुख कारण अनेक अभ्यास गटांच्या पाहणीत पुढे आल्यानंतर युती सरकारने सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. शेतकरी आत्महत्येमुळे जगाच्या नकाशावर झळकलेल्या यवतमाळ जिल्ह्यात हे अभियान गांभीर्याने राबविणे अपेक्षित आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारसाठी यवतमाळ जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मुख्यमंत्री गंभीर असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधी त्याबाबत तेवढी दक्षता बाळगत नसल्याचे कृषी विभागाच्या डीपीसीला परत द्याव्या लागलेल्या निधीवरून सिद्ध झाले. जिल्हा नियोजन समितीने जलयुक्त शिवारसाठी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला चार कोटी रुपये दिले. त्यातून सिमेंट नाला बांध व नाला खोलीकरण ही कामे घ्यायची होती. परंतु या कामांसाठी अनुक्रमे तीन व दोन महिन्यांचा अवधी लागत असल्याने आणि वेळ कमी असल्याने अखेर कृषी विभागाने चार कोटींचा हा निधी जिल्हा नियोजन समितीला परत करण्याचा निर्णय घेतला. या विभागाने हा निधी परत केला नसता तर कदाचित तो व्यपगत (लॅप्स) झाला असता. मुळात कृषी खात्याला हा निधी देताना विलंब झाला. जिल्हा नियोजन समितीने फेब्रुवारीमध्ये जलयुक्त शिवारसाठी कृषी खात्याला हा निधी दिला. मुळात हा निधी देतानाच बराच उशिर झाला होता. त्यानंतर निविदा प्रक्रिया तेवढ्याच विलंबाने झाली. फेरनिविदेची वेळ आली. अखेर मार्चपूर्वी कामे पूर्ण होऊन निधी खर्च करणे शक्य नसल्याचे लक्षात येताच कृषी अधीक्षक कार्यालयाने हा निधी ‘डीपीसी’ला परत केला. हा निधी परत करण्याची वेळ येण्यामागे विलंबाने झालेली स्वाक्षरी हे प्रमुख कारण शासकीय यंत्रणेतून सांगितले जात आहे. डीपीसीला परत मिळालेला निधी हा आता जिल्हा परिषद आणि वन विभागाकडे वळविण्यात आला आहे. विशेष असे या दोनही विभागाकडून निधीची कोणतीही मागणी डीपीसीकडे करण्यात आलेली नव्हती. या दोनही संस्थांना शासकीय निधी काढून ठेवण्याची तरतूद आहे. ती कृषी अधीक्षक कार्यालयाला नाही. म्हणून या कार्यालयाने निधी डीपीसीला परत देण्याची सावधगिरी बाळगली. जलयुक्त शिवारची कामे वेगाने व्हावी, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्या, शेतकरी आत्महत्या थांबाव्या हा चांगला हेतू युती सरकारचा असला तरी जिल्हा नियोजन समितीकडून निधी देण्यासच विलंब होत असल्याने जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामावर त्याचा विपरित परिणाम होताना दिसतो आहे. डीपीसीने कामाचा कालावधी आणि निविदा प्रक्रियेला लागणारा वेळ विचारात घेऊन आधीच निधी दिला असता तर चार कोटीतून अनेक तालुक्यात जलयुक्त शिवारची कामे पूर्ण होऊ शकली असती. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला असता. (जिल्हा प्रतिनिधी)