शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारचे चार कोटी वळविले

By admin | Updated: April 6, 2016 02:28 IST

राज्याचे मुख्यमंत्री जलयुक्त शिवारबाबत गंभीर असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र ‘डीपीसी’च्या लेटलतिफ कारभारामुळे तब्बल चार कोटी रुपयांचा...

‘डीपीसी’चा लेटलतिफ कारभार : जिल्हा परिषद, वन विभागाला लाभ यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री जलयुक्त शिवारबाबत गंभीर असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र ‘डीपीसी’च्या लेटलतिफ कारभारामुळे तब्बल चार कोटी रुपयांचा निधी परत पाठविण्याची वेळ कृषी विभागावर आली आहे. अखेरच्या क्षणी सारवासारव करीत हा निधी परत जाऊ नये म्हणून जिल्हा परिषद आणि वन खात्याला वळविण्यात आला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार हे मिशन म्हणून हाती घेतले. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे सिंचन सुविधांचा अभाव हे प्रमुख कारण अनेक अभ्यास गटांच्या पाहणीत पुढे आल्यानंतर युती सरकारने सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. शेतकरी आत्महत्येमुळे जगाच्या नकाशावर झळकलेल्या यवतमाळ जिल्ह्यात हे अभियान गांभीर्याने राबविणे अपेक्षित आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारसाठी यवतमाळ जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मुख्यमंत्री गंभीर असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधी त्याबाबत तेवढी दक्षता बाळगत नसल्याचे कृषी विभागाच्या डीपीसीला परत द्याव्या लागलेल्या निधीवरून सिद्ध झाले. जिल्हा नियोजन समितीने जलयुक्त शिवारसाठी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला चार कोटी रुपये दिले. त्यातून सिमेंट नाला बांध व नाला खोलीकरण ही कामे घ्यायची होती. परंतु या कामांसाठी अनुक्रमे तीन व दोन महिन्यांचा अवधी लागत असल्याने आणि वेळ कमी असल्याने अखेर कृषी विभागाने चार कोटींचा हा निधी जिल्हा नियोजन समितीला परत करण्याचा निर्णय घेतला. या विभागाने हा निधी परत केला नसता तर कदाचित तो व्यपगत (लॅप्स) झाला असता. मुळात कृषी खात्याला हा निधी देताना विलंब झाला. जिल्हा नियोजन समितीने फेब्रुवारीमध्ये जलयुक्त शिवारसाठी कृषी खात्याला हा निधी दिला. मुळात हा निधी देतानाच बराच उशिर झाला होता. त्यानंतर निविदा प्रक्रिया तेवढ्याच विलंबाने झाली. फेरनिविदेची वेळ आली. अखेर मार्चपूर्वी कामे पूर्ण होऊन निधी खर्च करणे शक्य नसल्याचे लक्षात येताच कृषी अधीक्षक कार्यालयाने हा निधी ‘डीपीसी’ला परत केला. हा निधी परत करण्याची वेळ येण्यामागे विलंबाने झालेली स्वाक्षरी हे प्रमुख कारण शासकीय यंत्रणेतून सांगितले जात आहे. डीपीसीला परत मिळालेला निधी हा आता जिल्हा परिषद आणि वन विभागाकडे वळविण्यात आला आहे. विशेष असे या दोनही विभागाकडून निधीची कोणतीही मागणी डीपीसीकडे करण्यात आलेली नव्हती. या दोनही संस्थांना शासकीय निधी काढून ठेवण्याची तरतूद आहे. ती कृषी अधीक्षक कार्यालयाला नाही. म्हणून या कार्यालयाने निधी डीपीसीला परत देण्याची सावधगिरी बाळगली. जलयुक्त शिवारची कामे वेगाने व्हावी, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्या, शेतकरी आत्महत्या थांबाव्या हा चांगला हेतू युती सरकारचा असला तरी जिल्हा नियोजन समितीकडून निधी देण्यासच विलंब होत असल्याने जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामावर त्याचा विपरित परिणाम होताना दिसतो आहे. डीपीसीने कामाचा कालावधी आणि निविदा प्रक्रियेला लागणारा वेळ विचारात घेऊन आधीच निधी दिला असता तर चार कोटीतून अनेक तालुक्यात जलयुक्त शिवारची कामे पूर्ण होऊ शकली असती. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला असता. (जिल्हा प्रतिनिधी)