शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

बैलबाजारांना लागली उतरती कळा

By admin | Updated: July 25, 2015 02:46 IST

एकेकाळी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील बैलबाजार सध्या आपले मोल हरवून बसल्याचे दिसत आहेत.

यवतमाळ : एकेकाळी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील बैलबाजार सध्या आपले मोल हरवून बसल्याचे दिसत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या बैलजोड्या विकणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी खरेदीदारच मिळत नसल्याने हे बाजार ओस पडले आहेत.वणी, घाटंजी, पांढरकवडा आदी तालुक्याच्या ठिकाणी गेल्या काही वर्षांपर्यंत प्रचंड मोठे बैलबाजार भरत असत. त्याठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला हवी तशी बैलजोडी मिळेलच, अशी खात्री वाटायची. तर बैल विक्रीसाठी येणारे कास्तकारही आपल्याला रिकाम्या हाताने परतावे लागणार नाही, याबाबत निश्चिंत असत. मात्र, काही वर्षांपासून या बाजारांतील गर्दीही ओसरली आहे आणि तेथील विक्रीच्या प्रमाणातही घट झाली आहे.सतत तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढवत आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारे बैलच विकून पेरणी करण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे बैलजोडी विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, सारेच शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने बैलजोड्यांना खरेदीदार मिळणे कठीण झाले आहे. पूर्वी अनेक शेतकरी खरेदीदार मिळत नसल्याचे दिसताच कत्तलखान्यासाठी म्हातारे बैल विकून टाकत होते. मात्र, कत्तलखान्यांसाठी जाणारी जानावरे पकडली जात आहे. त्यामुळे या खरेदीदारांवरही मर्यादा आली आहे. त्याचवेळी बैलजोड्यांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वधारल्या आहेत. तेवढी किमत मोजून बैलजोडी विकत घेण्यापेक्षा शेजारच्या कास्तकाराची बैलजोडी भाडेतत्त्वावर घेण्याची मानसिकता तयार झाली आहे. भाडेतत्त्वावरील बैलजोडी वापरून वेळ मारून न्यायची अन् कसेबसे पीक घ्यायचे, असा प्रकार सध्या सर्वच शिवारात दिसते. त्यामुळे बैलबाजारातील उलाढाल रोडावली आहे. (प्रतिनिधी)