शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

मार्च एन्डला तूर उसळली; हरभराही भाव खाणार!

By रूपेश उत्तरवार | Updated: March 28, 2023 14:18 IST

परराज्यात उत्पादन घटीचा परिणाम

यवतमाळ : साधारणता मार्च एंडिंगला शेतमालाचे दर प्रचंड दबावात असतात, परंतु यंदा तूर आणि हरभऱ्याच्या दरात याविषयी विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले. मार्च एंडिंग असताना तूर आणि हरभऱ्याच्या दरात मोठी सुधारणा झाली. एकाच दिवसी क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. यामुळे सारेच अवाक् झाले आहेत. याचा फायदा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या घरात तूर आणि हरभराच राहिला नाही, अशी स्थिती आहे.

गतवर्षीच्या हंगामात तुरीचे उत्पादन कमालीचे घटले. राज्यासह मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तूर व हरभरा उत्पादनाला मोठा फटका बसला. विदेशातही तुरीचे उत्पादन कमी आहे. यानंतरही देशात तुरीची आयात करण्याचा निर्णय झाला. यामुळे तुरीचे दर दबावात होते. सध्या तुरीला ६,३०० रुपये क्विंटलचे दर आहेत. खुल्या बाजारात तुरीला ८,००० ते ८,५०० रुपये क्विंटलपर्यंतचे दर होते. सोमवारी हे दर ८,५०० ते ९,००० रुपये क्विंटलपर्यंत वर चढले. मे, जून महिन्यात तुरीचे दर वाढतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. मात्र, मार्च एंडलाच दर वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

त्याचप्रमाणे, हरभऱ्याच्या उत्पादनाही राज्यासह इतर ठिकाणी उत्पादन घटले आहे. त्याचे पडसाद बाजारपेठेवर झाला आहे. ४,००० ते ४,४०० रुपये क्विंटलपर्यंत असलेला हरभरा ४,८०० रुपये ते ४,९०० रुपये क्विंटलपर्यंत वर चढले आहेत. हरभऱ्याला ५३३५ रूपये क्विंटलचा हमी दर आहे. हमी केंद्राला प्रारंभ होताच हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली. पुढील काळात हरभऱ्याच्या हमीदरापेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता व्यापारी गटातून वर्तविली जात आहे.

सरकारी धाेरणाने दर पडण्याचा धोका

ज्यावेळी शेतमालाचे दर वाढतात, त्याच वेळी त्याचे दर पाडण्यासाठी सरकारकडून प्रयत्न हाेतो. शेतमालाचे दर अचानक वाढल्याने डाळीची आयात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे वाढीव दर किती दिवस राहणार हे सांगणे अवघड आहे. तूर्त काही दिवस शेतमालाच्या दरात तेजी राहण्याची शक्यता आहे.

कापूस आणि सोयाबीन दरात घसरण

कापसाच्या दरात दिवसेंदिवस घट नोंदविली जात आहे. ७,२०० ते ७,६५० रुपये क्विंटलपर्यंत कापसाचे दर खाली आले आहेत. सोयाबीनचे दर अशाच पद्धतीने घटले आहे. ४,८०० ते ५,००० रुपये क्विंटलपर्यंत या दरात घसरण झाली आहे.

राज्यासह इतर ठिकाणी तुरीचे उत्पादन घटले आहे. याशिवाय हमी केंद्र सुरू झाले आहे. या दोन्ही घडामोडीमुळे बाजारात तूर आणि हरभऱ्याच्या दरात वाढ झाली. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

- सुधीर कोठारी, हिंगणघाट बाजार समिती.

टॅग्स :agricultureशेतीYavatmalयवतमाळ