शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मार्च एन्डला तूर उसळली; हरभराही भाव खाणार!

By रूपेश उत्तरवार | Updated: March 28, 2023 14:18 IST

परराज्यात उत्पादन घटीचा परिणाम

यवतमाळ : साधारणता मार्च एंडिंगला शेतमालाचे दर प्रचंड दबावात असतात, परंतु यंदा तूर आणि हरभऱ्याच्या दरात याविषयी विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले. मार्च एंडिंग असताना तूर आणि हरभऱ्याच्या दरात मोठी सुधारणा झाली. एकाच दिवसी क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. यामुळे सारेच अवाक् झाले आहेत. याचा फायदा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या घरात तूर आणि हरभराच राहिला नाही, अशी स्थिती आहे.

गतवर्षीच्या हंगामात तुरीचे उत्पादन कमालीचे घटले. राज्यासह मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तूर व हरभरा उत्पादनाला मोठा फटका बसला. विदेशातही तुरीचे उत्पादन कमी आहे. यानंतरही देशात तुरीची आयात करण्याचा निर्णय झाला. यामुळे तुरीचे दर दबावात होते. सध्या तुरीला ६,३०० रुपये क्विंटलचे दर आहेत. खुल्या बाजारात तुरीला ८,००० ते ८,५०० रुपये क्विंटलपर्यंतचे दर होते. सोमवारी हे दर ८,५०० ते ९,००० रुपये क्विंटलपर्यंत वर चढले. मे, जून महिन्यात तुरीचे दर वाढतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. मात्र, मार्च एंडलाच दर वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

त्याचप्रमाणे, हरभऱ्याच्या उत्पादनाही राज्यासह इतर ठिकाणी उत्पादन घटले आहे. त्याचे पडसाद बाजारपेठेवर झाला आहे. ४,००० ते ४,४०० रुपये क्विंटलपर्यंत असलेला हरभरा ४,८०० रुपये ते ४,९०० रुपये क्विंटलपर्यंत वर चढले आहेत. हरभऱ्याला ५३३५ रूपये क्विंटलचा हमी दर आहे. हमी केंद्राला प्रारंभ होताच हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली. पुढील काळात हरभऱ्याच्या हमीदरापेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता व्यापारी गटातून वर्तविली जात आहे.

सरकारी धाेरणाने दर पडण्याचा धोका

ज्यावेळी शेतमालाचे दर वाढतात, त्याच वेळी त्याचे दर पाडण्यासाठी सरकारकडून प्रयत्न हाेतो. शेतमालाचे दर अचानक वाढल्याने डाळीची आयात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे वाढीव दर किती दिवस राहणार हे सांगणे अवघड आहे. तूर्त काही दिवस शेतमालाच्या दरात तेजी राहण्याची शक्यता आहे.

कापूस आणि सोयाबीन दरात घसरण

कापसाच्या दरात दिवसेंदिवस घट नोंदविली जात आहे. ७,२०० ते ७,६५० रुपये क्विंटलपर्यंत कापसाचे दर खाली आले आहेत. सोयाबीनचे दर अशाच पद्धतीने घटले आहे. ४,८०० ते ५,००० रुपये क्विंटलपर्यंत या दरात घसरण झाली आहे.

राज्यासह इतर ठिकाणी तुरीचे उत्पादन घटले आहे. याशिवाय हमी केंद्र सुरू झाले आहे. या दोन्ही घडामोडीमुळे बाजारात तूर आणि हरभऱ्याच्या दरात वाढ झाली. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

- सुधीर कोठारी, हिंगणघाट बाजार समिती.

टॅग्स :agricultureशेतीYavatmalयवतमाळ