शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पीयूसीचे तिप्पट दर, ना रेटबोर्ड, ना शिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

दिवसेंदिवस सर्वत्र प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम पर्यावरण व मानवी जीवनावर होत आहे. अवेळी पाऊस, क्षमतेपेक्षा जास्त उन्हाळा आणि हिवाळा, असे ऋतुचक्र प्रभावित होत आहे. या प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनांना नियंत्रित करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांसाठी पीयूसी सक्तीची केली.

ठळक मुद्देप्रदूषण नियंत्रणास नागरिकांचा प्रतिसाद : मात्र वाहनधारकांची खुलेआम लूट, आरटीओला जुमानत नाहीत

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिवसेंदिवस सर्वत्र प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम पर्यावरण व मानवी जीवनावर होत आहे. अवेळी पाऊस, क्षमतेपेक्षा जास्त उन्हाळा आणि हिवाळा, असे ऋतुचक्र प्रभावित होत आहे. या प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनांना नियंत्रित करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांसाठी पीयूसी सक्तीची केली. यामुळे वाहन चालकही प्रदूषनाला नियंत्रित करण्यासाठी पुढे सरसावले. मात्र या संधीचा लाभ घेत पीयूसी सेंटर चालकांनी वाहनधारकांची लूट सुरू केली आहे. निर्धारित दरापेक्षा तिप्पट दर आकारून वाहनांची पीयूसी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. यवतमाळ शहरातील काही पीयूसी संटरला भेट दिली असता हे धक्कादायक वास्तव समोर आले.उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर पीयूसी सेंटरच्या नावाखाली १० ते १२ दुकाने थाटली गेली. दररोज तेथे अनेक वाहन चालक पीयूसी काढण्यासाठी येतात. त्याकरिता या केंद्रासमोर वाहनांच्या रांगा लागतात. दररोज प्रचंड गर्दी होते. ज्या वाहन चालकांना पीयूसी काढायची असते, त्यांना आपण कुठे जाव, असा प्रश्न पडतो. पीयूसी केंद्राबाहेर कुठलेही रेटबोर्ड लावलेले नाही. एक लॅपटॉप आणि पीयूसी काढणारे यंत्र, त्याचे आरपीएम मोजणारे मशीन, अशी उपकरणे तेथे ठेवलेली असते. पीयूसी काढण्यासाठी शास्त्रीय दृष्टीने प्रक्रिया राबविली जाते. यात परवान्यासाठी आलेले वाहन प्रदूषण पसरवत आहे की नाही, याची प्रथम तपासणी केली जाते. वाहन योग्य असेल, तरच पीयूसी काढली जाते.ही साधी आणि सोपी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेसाठी शासकीय दरही ठरलेले असतात. दुचाकी, चार चाकी, तीन चाकी वाहने, पेट्रोलवर धावणारी आणि डिझलवर धावणारी वाहने, असे वाहनांचे वर्गीकरण केले जाते. त्यानुसार त्याचे दर आकारले जाणे आवश्यक आहे. मात्र केंद्रावर असे कुठलेच दर फलकक लावले गेले नाही. या ठिकाणी कुणीही शासकीय दर सांगण्यास तयार नसते. आरटीओ कार्यालयात ज्या संबंधितांकडे हा टेबल आहे, त्यांनाही पीयूसीचे दर माहिती नसल्याची धक्कादायक बाब मंगळवारी पुढे आली.या विभागात त्याची विचारणा केली, तर खालच्या कक्षातील कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडे टेबल असल्याचे सांगितले. संबधित कर्मचाºयांना विचारणा केली, तर त्या कर्मचाºयाने उलट टपाली विचारणा करत पीयूसी रेट विचारणाºयांनाच प्रश्न केला. तुम्हाला त्या केंद्रावर जे दर सांगितले आहेत, तेच दर आहे, असे म्हणत त्यांनी टोलवून लावले. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर पीयूसीसाठी जत्रा भरलेली असते. वाहनांची आणि दुकानांची तेथे दाटीवाटी आहे. त्या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नसते, एवढी चिक्कार गर्दी आहे.प्रत्येक पीयूसी केंद्राबाहेर कुठलेही रेट बोर्ड नाही. त्यांना विचारणा केली तर दुचाकीला १०० ते ११० रूपये आणि चार चाकीला २०० ते २२० रूपयांचा दर सांगितला जातो. ही प्रक्रिया तत्काळ पार पाडणारी आहे. यामुळे ग्राहक कुठलाही विचार न करता पैसे देऊन मोकळे होतात. पीयूसी दराची विचारणा केली, तर तुम्ही कुठेही विचारा हाच ‘रेट’ आहे असे सांगितले जाते. खºया दर पत्रकापासून वाहनधारकांना अनभिज्ञ ठेवले जाते. त्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी थेट उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांशी संपर्क केला, तर आणखी धक्कादायक माहिती दिली.अधिक आरपीएम, मानवासाठी अपायकारकवाहनांना नियंत्रित करण्यासाठी पीयूसीची तपासणी असते. यात २८०० आरपीएमच्यावर जर वाहनांची नोंद झाली, तर अशा वाहनांना पुन्हा फेरतपासणीसाठी आणावे लागते. यात प्रदूषण पसरविणारे घटक कमी करण्यासाठी पुन्हा गॅरेज अथवा इतर ठिकाणी वाहन न्यावे लागते. नंतर पीयूसीची तपासणी करणे बंधनकारक आहे. अनेकदा वाहनातून मोठ्या प्रमाणात धूर फेकला जातो. हा धूर मानवी आरोग्याला घातक असतो. अशा वाहनांना रस्त्यावर धावण्यापासून मज्जाव केला जातो. त्याच्या दुरूस्तीनंतरच अशा वाहनांना नव्याने धावण्यासाठी परवानगी दिली जाते.असे आहेत शासकीय दर१. दुचाकीचे शासकीय दर ३५ रुपये आहे. मात्र केंद्रावर प्रत्यक्षात १०० ते १२० रूपये उकळले जातात. चारचाकी वाहनाचे शासकीय दरही वेगळे आहे. पेट्रोल, सीएनजी, एलपीजीवरील चारचाकी वाहनांना ९० रूपये शासकीय दर आहे. डिझेलवर चालणाºया वाहनांसाठी ११० रूपये शासकीय दर आहे. प्रत्यक्षात केंद्रावर २०० ते २५० रूपये दर आकारला जातो. ट्रक चालकांना ४०० रूपये आकारले जातात. पेट्रोलवरील तीन चाकी वाहनांसाठी शासकीय दर ७० रूपये आहे. प्रत्यक्षात केंद्रावर जादा पैसे उकळले जातात.पीयूसीचे जिल्ह्यात ५५ केंद्रवाहनांची पीयूसी काढण्यासाठी यवतमाळात १० ते १२ केंद्र आहेत. उर्वरित ३८ केंद्र जिल्ह्यातील विविध भागात आहे. यवतमाळातील पीयूसी केंद्रांची ही अवस्था असेल, तर जिल्ह्यातील इतर केंद्रांची काय अवस्था असेल, हे सांगणे अवघड आहे.अतिरिक्त दर आकारणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रकरणात स्वत: लक्ष घालणार आहे. यात तक्रार दाखल करताच केंद्रांवर कारवाई होईल. एका सेंटरला बुधवारी नोटीस बजावली.- राजेंद्र वाढोकरउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ