शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:23 IST

गत २० वर्षात शेती आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य प्रश्न उभे ठाकले आहे. या प्रश्नातून मार्ग काढीत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जात आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, ...

ठळक मुद्देमदन येरावार : कृषी महोत्सवाचे थाटात उद्घाटन, ४० हजार पदवीधर शेतकऱ्यांच्या बांधावर

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : गत २० वर्षात शेती आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य प्रश्न उभे ठाकले आहे. या प्रश्नातून मार्ग काढीत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जात आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. समता मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून सहपालकमंत्री संजय राठोड, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे, आत्माचे संचालक दत्तात्रय काळे, डॉ. प्रमोद यादगिरवार उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे आहे. आजपर्यंतच्या सर्व उणीवा दूर करण्यासाठी काम करीत आहे. तत्कालीन सरकारमधील पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाहीर केलेले पॅकेज आमच्या सरकारने पूर्ण केले. विजेचा बॅकलॉग पूर्ण करून नवीन केंद्र उभारले जात आहे. मुबलक पाणी आणि मुुबलक वीज असेल तर शेतकºयांची प्रगती थांबविता येणार नाही.त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला वीेज देण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे. साडेसहा हजार शेततळे पूर्ण केले आहेत. पुढे शेततळे निर्माण केले जाणार आहे.सहपालकमंत्री संजय राठोड म्हणाले, पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन काम करणे काळाची गरज आहे. हे तंत्रज्ञान शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहचावे यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे यांनी केले.सूत्रसंचलन कैलास राऊत यांनी केले. तर आभार प्रदर्शन कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे यांनी मानले.शेतकºयांना नवीन तंत्रज्ञान मिळावे आणि ते समजावे म्हणून कृषी पदवी घेतलेले ४० हजार पदवीधर आणि विद्यार्थी शेतकºयांच्या बांधावर पोहचतील.शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतील. त्यांना मार्गदर्शन करतील, असे सूतोवाच पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. कृषी विद्यालयाला स्टाफ देण्याची कारवाई पूर्ण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी बचतगट आणि महिला बचतगटातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.