शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नेरमध्ये वृक्षलागवड घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:33 IST

वृक्ष लागवडीच्या नावाखाली तालुक्यात पैशाचा चुराडा करण्यात आला आहे. लाख, दोन लाख नव्हेतर दहा लाख रुपये खर्च यासाठी करण्यात आला. प्रत्यक्षात अपवादानेच झाडे दिसत असल्याने या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याच्या बाबीला बळ मिळत आहे.

ठळक मुद्देदहा लाखांचा खर्च : ५१ ग्रामपंचायतीत केवळ २० टक्के झाडे जिवंत

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : वृक्ष लागवडीच्या नावाखाली तालुक्यात पैशाचा चुराडा करण्यात आला आहे. लाख, दोन लाख नव्हेतर दहा लाख रुपये खर्च यासाठी करण्यात आला. प्रत्यक्षात अपवादानेच झाडे दिसत असल्याने या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याच्या बाबीला बळ मिळत आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत या बाबी पुढे आल्या आहे. प्रशासनाकडून सांगितल्या जात असलेल्या झाडांपैकी केवळ २० टक्के रोपांचे अस्तित्व तेवढे दिसत आहे.पंचायत समितीमार्फत वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. ५१ ग्रामपंचायतीला प्रत्येकी ४०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. झाडे जगविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दोन मजूर लावायचे होते. ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड आणि मजुरांसाठीचा खर्च झाल्याचे दाखविले. परंतु झाडांचे अस्तित्व कुठेही नाही. २० टक्के जिवंत झाडाच्या भरवशावर वृक्षलागवडीचा फार्स केला जात आहे.अडगाव ग्रामपंचायतीने ४०० झाडे लावली. यातील २५० जिवंत असल्याचा दावा करण्यात आला. यावर ४२ हजार ३५४ रुपये ८५ पैसे एवढा खर्च करण्यात आला. याच ग्रामपंचायतीने स्मशानभूमीतही ४०० झाडे लावली असल्याचे दाखविले गेले. २१ हजार ४८५ रुपये ७४ एवढा खर्च यावर करण्यात आला. या शिवाय बोरगाव ग्रामपंचायतीने २० हजार ९०५ रुपये, ब्राह्मणवाडा पश्चिम १४ हजार ३०० रुपये ६४ पैसे, चिकणी डोमगा ४० हजार ९४० रुपये ३२ पैसे, दहीफळ ४१ हजार ३० रुपये सात पैसे, दोनद ३४ हजार ७५२ रुपये ८४ पैसे, जवळगाव ५८ हजार ६६ रुपये ९८ पैसे, कोहळा ग्रामपंचायतीने १८ हजार २७१ रुपये ८४ पैसे एवढा खर्च वृक्ष लागवडीवर दाखविला आहे. या शिवाय मोझर, पांढरी, पाथ्रड गोळे, पिंपळगाव डुब्बा, रत्नापूर, शहापूर, शिरसगाव, सिंदखेड, टाकळी सलामी, उमर्डा, वटफळी या ग्रामपंचायतींनी २० हजारावर खर्च दाखवून निधी लाटला आहे.चिखली कान्होबा, चिचगाव, पांढरी या ग्रामपंचायतींनी ४०० झाडे लावण्यासाठी येत असलेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम खर्च झाल्याचे दाखविले आहे. सर्व ५१ ग्रामपंचायतींसाठी नऊ लाख ८१ हजार खर्च दाखविण्यात आला आहे. झाडांची संख्या कमी आहे. त्यावेळी खरंच एवढा खर्च वृक्ष लागवडीवर झाला असावा याविषयी संशयाला बळ मिळत आहे.पाणी टंचाईचा बहाणा, मजुरांसाठी निधी मात्र वापरलाबहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्षलागवडीवर मोठी रक्कम खर्ची घातली आहे. झालेल्या कामाची पाहणी अधिकारीस्तरावर केली गेली. या अधिकाºयांना सर्वकाही ठिकठाक दाखविले गेले. प्रत्यक्षात झाडे दिसत नसताना अधिकाºयांनीही ‘पास’ करून टाकले. या कामांची देयके काढताना कमिशनबाजी झाल्याची शंका व्यक्त होत आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने झाडे जगतील कशी, असा प्रश्न ग्रामसेवकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र झाडांना पाणी टाकण्यासाठी मजूर उपलब्ध करू देण्यात आले. यासाठी निधीही दिला. तरीही झाडे जगविता का आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.