शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नेरमध्ये वृक्षलागवड घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:33 IST

वृक्ष लागवडीच्या नावाखाली तालुक्यात पैशाचा चुराडा करण्यात आला आहे. लाख, दोन लाख नव्हेतर दहा लाख रुपये खर्च यासाठी करण्यात आला. प्रत्यक्षात अपवादानेच झाडे दिसत असल्याने या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याच्या बाबीला बळ मिळत आहे.

ठळक मुद्देदहा लाखांचा खर्च : ५१ ग्रामपंचायतीत केवळ २० टक्के झाडे जिवंत

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : वृक्ष लागवडीच्या नावाखाली तालुक्यात पैशाचा चुराडा करण्यात आला आहे. लाख, दोन लाख नव्हेतर दहा लाख रुपये खर्च यासाठी करण्यात आला. प्रत्यक्षात अपवादानेच झाडे दिसत असल्याने या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याच्या बाबीला बळ मिळत आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत या बाबी पुढे आल्या आहे. प्रशासनाकडून सांगितल्या जात असलेल्या झाडांपैकी केवळ २० टक्के रोपांचे अस्तित्व तेवढे दिसत आहे.पंचायत समितीमार्फत वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. ५१ ग्रामपंचायतीला प्रत्येकी ४०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. झाडे जगविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दोन मजूर लावायचे होते. ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड आणि मजुरांसाठीचा खर्च झाल्याचे दाखविले. परंतु झाडांचे अस्तित्व कुठेही नाही. २० टक्के जिवंत झाडाच्या भरवशावर वृक्षलागवडीचा फार्स केला जात आहे.अडगाव ग्रामपंचायतीने ४०० झाडे लावली. यातील २५० जिवंत असल्याचा दावा करण्यात आला. यावर ४२ हजार ३५४ रुपये ८५ पैसे एवढा खर्च करण्यात आला. याच ग्रामपंचायतीने स्मशानभूमीतही ४०० झाडे लावली असल्याचे दाखविले गेले. २१ हजार ४८५ रुपये ७४ एवढा खर्च यावर करण्यात आला. या शिवाय बोरगाव ग्रामपंचायतीने २० हजार ९०५ रुपये, ब्राह्मणवाडा पश्चिम १४ हजार ३०० रुपये ६४ पैसे, चिकणी डोमगा ४० हजार ९४० रुपये ३२ पैसे, दहीफळ ४१ हजार ३० रुपये सात पैसे, दोनद ३४ हजार ७५२ रुपये ८४ पैसे, जवळगाव ५८ हजार ६६ रुपये ९८ पैसे, कोहळा ग्रामपंचायतीने १८ हजार २७१ रुपये ८४ पैसे एवढा खर्च वृक्ष लागवडीवर दाखविला आहे. या शिवाय मोझर, पांढरी, पाथ्रड गोळे, पिंपळगाव डुब्बा, रत्नापूर, शहापूर, शिरसगाव, सिंदखेड, टाकळी सलामी, उमर्डा, वटफळी या ग्रामपंचायतींनी २० हजारावर खर्च दाखवून निधी लाटला आहे.चिखली कान्होबा, चिचगाव, पांढरी या ग्रामपंचायतींनी ४०० झाडे लावण्यासाठी येत असलेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम खर्च झाल्याचे दाखविले आहे. सर्व ५१ ग्रामपंचायतींसाठी नऊ लाख ८१ हजार खर्च दाखविण्यात आला आहे. झाडांची संख्या कमी आहे. त्यावेळी खरंच एवढा खर्च वृक्ष लागवडीवर झाला असावा याविषयी संशयाला बळ मिळत आहे.पाणी टंचाईचा बहाणा, मजुरांसाठी निधी मात्र वापरलाबहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्षलागवडीवर मोठी रक्कम खर्ची घातली आहे. झालेल्या कामाची पाहणी अधिकारीस्तरावर केली गेली. या अधिकाºयांना सर्वकाही ठिकठाक दाखविले गेले. प्रत्यक्षात झाडे दिसत नसताना अधिकाºयांनीही ‘पास’ करून टाकले. या कामांची देयके काढताना कमिशनबाजी झाल्याची शंका व्यक्त होत आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने झाडे जगतील कशी, असा प्रश्न ग्रामसेवकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र झाडांना पाणी टाकण्यासाठी मजूर उपलब्ध करू देण्यात आले. यासाठी निधीही दिला. तरीही झाडे जगविता का आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.