शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

नेरमध्ये वृक्षलागवड घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:33 IST

वृक्ष लागवडीच्या नावाखाली तालुक्यात पैशाचा चुराडा करण्यात आला आहे. लाख, दोन लाख नव्हेतर दहा लाख रुपये खर्च यासाठी करण्यात आला. प्रत्यक्षात अपवादानेच झाडे दिसत असल्याने या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याच्या बाबीला बळ मिळत आहे.

ठळक मुद्देदहा लाखांचा खर्च : ५१ ग्रामपंचायतीत केवळ २० टक्के झाडे जिवंत

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : वृक्ष लागवडीच्या नावाखाली तालुक्यात पैशाचा चुराडा करण्यात आला आहे. लाख, दोन लाख नव्हेतर दहा लाख रुपये खर्च यासाठी करण्यात आला. प्रत्यक्षात अपवादानेच झाडे दिसत असल्याने या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याच्या बाबीला बळ मिळत आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत या बाबी पुढे आल्या आहे. प्रशासनाकडून सांगितल्या जात असलेल्या झाडांपैकी केवळ २० टक्के रोपांचे अस्तित्व तेवढे दिसत आहे.पंचायत समितीमार्फत वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. ५१ ग्रामपंचायतीला प्रत्येकी ४०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. झाडे जगविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दोन मजूर लावायचे होते. ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड आणि मजुरांसाठीचा खर्च झाल्याचे दाखविले. परंतु झाडांचे अस्तित्व कुठेही नाही. २० टक्के जिवंत झाडाच्या भरवशावर वृक्षलागवडीचा फार्स केला जात आहे.अडगाव ग्रामपंचायतीने ४०० झाडे लावली. यातील २५० जिवंत असल्याचा दावा करण्यात आला. यावर ४२ हजार ३५४ रुपये ८५ पैसे एवढा खर्च करण्यात आला. याच ग्रामपंचायतीने स्मशानभूमीतही ४०० झाडे लावली असल्याचे दाखविले गेले. २१ हजार ४८५ रुपये ७४ एवढा खर्च यावर करण्यात आला. या शिवाय बोरगाव ग्रामपंचायतीने २० हजार ९०५ रुपये, ब्राह्मणवाडा पश्चिम १४ हजार ३०० रुपये ६४ पैसे, चिकणी डोमगा ४० हजार ९४० रुपये ३२ पैसे, दहीफळ ४१ हजार ३० रुपये सात पैसे, दोनद ३४ हजार ७५२ रुपये ८४ पैसे, जवळगाव ५८ हजार ६६ रुपये ९८ पैसे, कोहळा ग्रामपंचायतीने १८ हजार २७१ रुपये ८४ पैसे एवढा खर्च वृक्ष लागवडीवर दाखविला आहे. या शिवाय मोझर, पांढरी, पाथ्रड गोळे, पिंपळगाव डुब्बा, रत्नापूर, शहापूर, शिरसगाव, सिंदखेड, टाकळी सलामी, उमर्डा, वटफळी या ग्रामपंचायतींनी २० हजारावर खर्च दाखवून निधी लाटला आहे.चिखली कान्होबा, चिचगाव, पांढरी या ग्रामपंचायतींनी ४०० झाडे लावण्यासाठी येत असलेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम खर्च झाल्याचे दाखविले आहे. सर्व ५१ ग्रामपंचायतींसाठी नऊ लाख ८१ हजार खर्च दाखविण्यात आला आहे. झाडांची संख्या कमी आहे. त्यावेळी खरंच एवढा खर्च वृक्ष लागवडीवर झाला असावा याविषयी संशयाला बळ मिळत आहे.पाणी टंचाईचा बहाणा, मजुरांसाठी निधी मात्र वापरलाबहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्षलागवडीवर मोठी रक्कम खर्ची घातली आहे. झालेल्या कामाची पाहणी अधिकारीस्तरावर केली गेली. या अधिकाºयांना सर्वकाही ठिकठाक दाखविले गेले. प्रत्यक्षात झाडे दिसत नसताना अधिकाºयांनीही ‘पास’ करून टाकले. या कामांची देयके काढताना कमिशनबाजी झाल्याची शंका व्यक्त होत आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने झाडे जगतील कशी, असा प्रश्न ग्रामसेवकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र झाडांना पाणी टाकण्यासाठी मजूर उपलब्ध करू देण्यात आले. यासाठी निधीही दिला. तरीही झाडे जगविता का आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.