शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

राज्यातील वृक्षलागवड मोहीम बनली लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 20:30 IST

राज्य शासनाने हाती घेतलेली वृक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ झाली आहे. या मोहिमेबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याचे निदर्शनास येते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांनी घेतला वृक्षलागवड, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आढावायवतमाळात ‘आॅक्सीजन पार्क’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने हाती घेतलेली वृक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ झाली आहे. या मोहिमेबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याचे निदर्शनास येते. तसेच २०१८-१९ मध्ये राष्ट्रीयस्तरावर प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचे तीन लक्ष कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात महाराष्ट्राचा वाटा ५० हजार कोटी रुपयांचा राहणार आहे. या दोन्ही महत्वकांक्षी योजना आपापल्या जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने ‘वन से धन तक’ ही संकल्पना राबवावी, अशा सूचना अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात १३ कोटी वृक्षलागवड मोहीम व प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा व्हीसीद्वारे आढावा घेताना ते बोलत होते. वृक्ष लागवड मोहिमेत पारदर्शकता आवश्यक आहे, असे सांगून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, टीकाकारांना संधी देऊ नका. पारदर्शकपणे सर्व गोष्टी नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यवतमाळात ‘आॅक्सीजन पार्क’१ ते ३१ जुलैपर्यंत या उपक्रमाची अंमलबजावणी करायची आहे. त्यानंतर वृक्षांच्या संवर्धनावर भर द्या. वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान यवतमाळमध्ये साकारण्यात येणारे ‘आॅक्सीजन पार्क’ ही संकल्पना नाविण्यपूर्ण व चांगली आहे. तसेच जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत ‘एक गॅस-एक वृक्ष’ ही संकल्पना राबवावी. जिल्ह्याचा आराखडा तयार करताना वृक्षलागवडीसाठी शहराचासुद्धा आराखडा पालिकेने तयार करावा. जलयुक्त शिवारला वनयुक्त शिवारमध्ये बदलवा. स्मशानभूमीत तसेच शाळेच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वनऔषधी लावण्याचे नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा आढावा घेताना त्यांनी मुद्रा बँक जिल्हा नियोजन समन्वय समितीत अशासकीय सदस्यांनी त्वरित नेमणूक करण्याचे आदेश दिले. बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आयईसी प्लान तयार करून बँकांनी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बैठकीला सीईओ जलज शर्मा, उपवनसंरक्षक डॉ.भानुदास पिंगळे, अरविंद मुढे, अभर्णा, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी.राठोड, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन आदी उपस्थित होते.५९ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्टयवतमाळ जिल्ह्याला ५९ लाख १७ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी आतापर्यंत ५५ लाख ८८ हजार खड्डे पूर्ण करण्यात आले. राज्यात चौथ्या क्रमांकाचे हे उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी वनमंत्र्यांना दिली.

टॅग्स :Natureनिसर्गSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार