शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

राज्यातील वृक्षलागवड मोहीम बनली लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 20:30 IST

राज्य शासनाने हाती घेतलेली वृक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ झाली आहे. या मोहिमेबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याचे निदर्शनास येते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांनी घेतला वृक्षलागवड, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आढावायवतमाळात ‘आॅक्सीजन पार्क’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने हाती घेतलेली वृक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ झाली आहे. या मोहिमेबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याचे निदर्शनास येते. तसेच २०१८-१९ मध्ये राष्ट्रीयस्तरावर प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचे तीन लक्ष कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात महाराष्ट्राचा वाटा ५० हजार कोटी रुपयांचा राहणार आहे. या दोन्ही महत्वकांक्षी योजना आपापल्या जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने ‘वन से धन तक’ ही संकल्पना राबवावी, अशा सूचना अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात १३ कोटी वृक्षलागवड मोहीम व प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा व्हीसीद्वारे आढावा घेताना ते बोलत होते. वृक्ष लागवड मोहिमेत पारदर्शकता आवश्यक आहे, असे सांगून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, टीकाकारांना संधी देऊ नका. पारदर्शकपणे सर्व गोष्टी नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यवतमाळात ‘आॅक्सीजन पार्क’१ ते ३१ जुलैपर्यंत या उपक्रमाची अंमलबजावणी करायची आहे. त्यानंतर वृक्षांच्या संवर्धनावर भर द्या. वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान यवतमाळमध्ये साकारण्यात येणारे ‘आॅक्सीजन पार्क’ ही संकल्पना नाविण्यपूर्ण व चांगली आहे. तसेच जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत ‘एक गॅस-एक वृक्ष’ ही संकल्पना राबवावी. जिल्ह्याचा आराखडा तयार करताना वृक्षलागवडीसाठी शहराचासुद्धा आराखडा पालिकेने तयार करावा. जलयुक्त शिवारला वनयुक्त शिवारमध्ये बदलवा. स्मशानभूमीत तसेच शाळेच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वनऔषधी लावण्याचे नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा आढावा घेताना त्यांनी मुद्रा बँक जिल्हा नियोजन समन्वय समितीत अशासकीय सदस्यांनी त्वरित नेमणूक करण्याचे आदेश दिले. बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आयईसी प्लान तयार करून बँकांनी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बैठकीला सीईओ जलज शर्मा, उपवनसंरक्षक डॉ.भानुदास पिंगळे, अरविंद मुढे, अभर्णा, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी.राठोड, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन आदी उपस्थित होते.५९ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्टयवतमाळ जिल्ह्याला ५९ लाख १७ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी आतापर्यंत ५५ लाख ८८ हजार खड्डे पूर्ण करण्यात आले. राज्यात चौथ्या क्रमांकाचे हे उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी वनमंत्र्यांना दिली.

टॅग्स :Natureनिसर्गSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार