शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

फुलसावंगी ते नांदेडचे प्रवास भाडे चक्क चार लाख !

By admin | Updated: January 29, 2016 05:09 IST

चोरट्यांनी फुलसावंगीतून नांदेड रेल्वे स्थानकावर सुखरुप पोहोचवून देणाऱ्या आपल्या साथीदाराला चक्क चार लाख

महागाव : चोरट्यांनी फुलसावंगीतून नांदेड रेल्वे स्थानकावर सुखरुप पोहोचवून देणाऱ्या आपल्या साथीदाराला चक्क चार लाख रुपये इंडिकाचे प्रवास भाडे दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. चोरीतील पैशाच्या या उधळपट्टीची पोलीस दलात चांगलीच चर्चा आहे.फुलसावंगी येथील कापसाचे व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्याकडे ८ जानेवारी रोजी २७ लाख रुपये रोख व दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या धाडसी चोरी मागे फुलसावंगीतीलच बाबर खॉ शाहदत खॉ (३०) याच्या टोळीचा हात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रकाशित केले होते. या प्रकरणी पोलिसांनी अयजोद्दीन उर्फ लखू अयसोद्दीन नवाब (२०) याला मुंबईच्या डोंबिवली पूर्व येथील आरेगाव भागातून एका साध्या घरात अटक केली. त्याच्याकडून चार हजार रुपये व मुंबईतील जीमखान्याची पावती जप्त करण्यात आली. तो जीमचा शौकीन असल्याचे सांगितले जाते. न्यायालयाने लखूला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या बयानाने २७ लाखांच्या या चोरीची साखळीच उघड झाली. लखूचा थेट चोरीत सहभाग नव्हता. मात्र आरोपींना आपल्या इंडिकाने सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. या गुन्ह्यात एम.एच.२९-व्ही-८३८२ क्रमांकाची इंडिका वापरली गेली. घटनेच्या रात्री लखूच्या इंडिकामधून टोळीचा सूत्रधार बाबर नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचला. या प्रवासात त्याने उमरखेडवरून एका साथीदारालाही सोबत घेतले होते. रेल्वे स्थानकावर सोडताच बाबरने चोरीतील २७ लाखांच्या रकमेतून हाती आलेले चार लाख रुपये लखूला प्रवास भाडे म्हणून दिले. लखूने ही रक्कम आपला साथीदार अशरफ खा शाहदत खा याला दिली होती. ती रक्कम त्याने आपल्या शेतातील कुटाराच्या पोत्यात लपवून ठेवली होती. यातील तीन लाख ७७ हजार रुपयांची रक्कम महागाव पोलिसांनी बुधवारी रात्री व्हीडीओ चित्रीकरणात त्या शेतातून जप्त केली. लखूने या गुन्ह्यात अशरफ खॉ शाहदत खा याचा सहभाग असल्याचे सांगितले. बाबर खॉ आणि सोहेलोद्दीन सफरोद्दीन नवाब हे यातील प्रमुख आरोपी आहे. ते अद्याप फरार आहे. पोलीस त्यांच्या मागावर आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपी अटक झाले असून इंडिका गाडी जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपी घटनेपासून एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र ते क्वॉईन बॉक्सचा वापर करीत असल्याने पोलिसांना सुरुवातीला त्यांचे औरंगाबादचे लोकेशन मिळाले होते. मात्र तेथून पथक रिकाम्या हाताने परतले होते. या टोळीचा म्होरक्या बाबर हा मुंबईतच दबा धरुन असावा असा संशय महागावचे ठाणेदार प्रकाश शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, पुसदच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रकाश शेळके, दुय्यम ठाणेदार एस.डी. गोसावी, नितीन चरडे, आनंद चंदेवाड, सुनील पंडागळे, युवराज जाधव आदींनी ही कामगिरी केली. (शहर प्रतिनिधी)