शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स विमानापेक्षा महाग

By admin | Updated: November 2, 2015 01:48 IST

विमानापेक्षाही ट्रॅव्हल्सचे दर महाग, ऐकून धक्का बसलायना. मात्र हे सत्य आहे. यवतमाळातून पुण्याला खासगी बसने जायचे असल्यास ३२०० रुपये मोजावे लागते.

ट्रॅव्हल्सचे तिकीट ३२०० : नागपूर-मुंबई विमान प्रवास २५०० रुपये रूपेश उत्तरवार यवतमाळ विमानापेक्षाही ट्रॅव्हल्सचे दर महाग, ऐकून धक्का बसलायना. मात्र हे सत्य आहे. यवतमाळातून पुण्याला खासगी बसने जायचे असल्यास ३२०० रुपये मोजावे लागते. उलट नागपूरवरून मुंबईला विमानाने जाण्यासाठी केवळ २५०० रुपये लागतात. दिवाळी सणाच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशांची अक्षरश: पिळवणूक चालविली आहे.दिवाळीच्या पर्वात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कॅश करण्यासाठी ट्रॅव्हल्स मालकांनी आपल्या प्रवासी दरात एकपट-दुप्पट नव्हे तर पाच पट दर वाढविले आहे. साधारणत: यवतमाळ-पुणे खासगी बसचे नियमित दर ७०० ते ९०० रुपये असतात. मात्र सध्या दिवाळीची गर्दी लक्षात घेता ५ नोव्हेंबरपासून दर वाढविले जाणार आहे. पुण्याहून यवतमाळकडे दिवाळीपूर्वी येण्याचे दर आणि दिवाळीनंतर पुण्याला ज्याचे दर २५०० रुपये, तीन हजार रुपये ते ३२०० रुपयेपर्यंत पोहोचले आहे. त्यातही अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग करावी लागत आहे. विशेष म्हणजे एसटी बसचे दर ९४० रुपयावरून ७४७ रुपये करण्यात आले आहे. यवतमाळ शहरातून पुण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात बसेस सुटतात. नियमित प्रवासी मिळत असल्याने एसी आणि नॉन एसी बसेसची संख्या मोठी आहे. दिवाळीच्या काळात पुण्याला शिक्षणासाठी असलेली यवतमाळातील मंडळी शहरात येतात. रेल्वेची सुविधा असतानाही अनेक जण ट्रॅव्हल्सनेच येणे पसंत करतात. त्यामुळे या १५ ते २० दिवसात प्रवाशांची संख्या दहापटीने वाढते. त्यामुळे वाहने कमी आणि प्रवासी जास्त अशी स्थिती निर्माण होते. याचाच फायदा घेत काही वर्षांपासून ट्रॅव्हल्स मालक दिवाळीच्या काळात तिकिटांचे दर वाढवितात. मात्र गत दोन वर्षांपासून हे दर विमानालाही लाजविणारे आहे. नागपूर ते मुंबई विमानाचे दर २५०० रुपये आहे. त्या तुलनेत कमी अंतर असलेल्या यवतमाळ ते पुणेसाठी ३२०० रुपये मोजावे लागत आहे. एवढे असतानाही प्रवाशांच्या मात्र यावर उड्या पडत आहे. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभागाची असते. मात्र खासगी ट्रॅव्हल्सचे दर किती असावे हे ठरविण्याचे अधिकार परिवहन विभागाला नसल्याचे सांगत त्यांनी हात वर केले. आरटीओंची नेमकी जबाबदारी काय हाच प्रश्न या आहे. तर या विरोधात कुणी तक्रार करायला पुढे येत नाही. निमूटपणे अतिरिक्त पैसे देऊन प्रवास करताना दिसतात. ‘एसटी’ने केले पुण्याचे दर कमी, आरटीओचे हात वर दिवाळीच्या काळात वाढती गर्दी पाहून ट्रॅव्हल्स मालकांनी पाचपट तिकीट दर वाढविले आहे. उलट राज्य परिवहन महामंडळाने नियमित ९४० रुपये असणारे तिकीट या काळात जादा बससाठी ७४७ रुपये केले आहे. जादा बसेस यवतमाळ, वणी, नेर, दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा आगारातून सोडण्यात येणार आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे दर किती असावे, ही बाब प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे या प्रकारात आरटीओ काहीही करू शकत नाही. प्रवाशांनीच अशा प्रकाराला लगाम घालावा. - एस.एस.झोडउपप्रादेशिक परिवहन अधिकारी