शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना बदलीचे वेध

By admin | Updated: May 17, 2017 00:48 IST

जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्या बदलीचे आदेश धडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा परिषद : दोन दिवसांत आदेश धडकणार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्या बदलीचे आदेश धडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाने ३१ मे पूर्वीच सर्व बदल्या पूर्ण करण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली. आता केवळ शिक्षकांच्या बदल्या होणे बाकी आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांपाठोपाठ अधिकाऱ्यांनाही बदलीचे वेध लागले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, वित्त व लेखा अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बदली आदेशाची प्रतीक्षा आहे. मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांची मुंबईला बदली झाल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप त्यांचे बदली आदेश धडकले नाही. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्यचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीसुद्धा बदलीस पात्र आहे. पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डीआरडीएचे प्रकल्प संचालक आदींनीही विनंती बदलीसाठी रेटा लावला आहे. डीआरडीएमध्ये नव्यानेच एक सहायक गटविकास अधिकारी बदलून येणार आहे. येथून बदलून जाणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागीही नवीन अधिकारी रुजू होणार आहे. या बदल्यांमुळे नवीन पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही नवीन राहणार आहे. यामुळे प्रशासनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रतिनियुक्त्या केल्या रद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंचायत आणि बांधकाम विभागातील प्रतिनियुक्त्या रद्द केल्या. गेले काही दिवस अनेक कर्मचारी बदली होऊनही प्रतिनियुक्तीच्या नावाखाली पंचायत आणि बांधकाममध्ये ठाण मांडून होते. काहींची बदली होऊनही त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. आता सीईओंना एका झटक्यात प्रतिनियुक्त्या रद्द करून मुक्कामी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी रवाना केले आहे. पाणी पुरवठा विभाग वाऱ्यावर जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग काही महिन्यांपासून वाऱ्यावर आहे. कार्यकारी अभियंत्यांची बदली झाल्याने प्रभारावरच उन्हाळ्यातील पाणी टंचाई निवारली जात आहे. अद्याप या विभागाला कार्यकारी अभियंता मिळालाच नाही. त्यामुळे पाणी टंचाईच्या उपाययोजनांबाबत शासन, प्रशासन गंभीर नसल्याचे स्पष्ट होते.