शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

बदल्या झाल्या, पण कार्यमुक्ती अद्याप अडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

एका विभागातील कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात विभागांतर्गत बदली करण्यात आली. या बदलीला आता १५ दिवसांचा कालावधी लोटून गेला तरी अद्याप बहुतांश कर्मचारी जुन्याच विभागात कार्यरत आहे. त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त केले नाही. बोटावर मोजण्याइतपतच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले गेले. यामागे कोणते ‘गूढ’ लपले आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : एकाच विभागात वर्षानुवर्षांपासून मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद प्रशासनाने नुकत्याच कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आला. मात्र आत्तापर्यंत केवळ मोजकेच कर्मचारी कार्यमुक्त झाले असून उर्वरितांनी अद्यापही जुन्याच विभागात मुक्काम ठोकला आहे.कोरोनामुळे यावर्षी बदल्या लांबल्या होत्या. मात्र शासन निर्देशानुसार गेल्या महिन्यात एकदाच्या बदल्या आटोपल्या. सर्वसाधारण बदल्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या करण्यात आल्या. शासनाने प्रशासकीय व विनंती अशा प्रत्येकी ७.५ टक्के बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १५ वर्षे एकाच ठिकाणी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली गेल्याचे सांगितले जाते. अनेक कर्मचाऱ्यांनीही त्याताबाबत समाधान व्यक्त केले. नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पार पाडली.याचवेळी एकाच विभागात पाच वर्षे सेवा झालेल्या लिपीकवर्गीय आणि लेखावर्गीय कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, बांधकाम, सिंचन, शिक्षण, पाणीपुरवठा, वित्त, समाजकल्याण आदी विभागात पाच वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या यात समावेश आहे. एका विभागातील कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात विभागांतर्गत बदली करण्यात आली. या बदलीला आता १५ दिवसांचा कालावधी लोटून गेला तरी अद्याप बहुतांश कर्मचारी जुन्याच विभागात कार्यरत आहे. त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त केले नाही. बोटावर मोजण्याइतपतच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले गेले. यामागे कोणते ‘गूढ’ लपले आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.काही विभाग प्रमुख आधी आपल्या विभागात बदलून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुजू होऊ द्या, नंतरच तुम्हाला कार्यमुक्त करू, असे बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना सांगत आहे. यामुळे बदली झालेले कर्मचारी कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे बदली झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना आपला जुना विभाग सोडवेनासा झाला आहे. तेथे त्यांचे हितसंबंध गुरफटलेले आहे. विशेष म्हणजे काही पदाधिकारीच बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांना विभागातून जाऊ देण्यास तयार नाही, तर काहींना त्या विभागात येऊ देण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते.सीईओंच्या भूमिकेकडे कर्मचाºयांचे लक्षबदली झालेल्या अनेक कर्मचारी नवीन विभागाच्या प्रतीक्षेत आहे. बांधकाम विभागातील मोजक्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. सामान्य प्रशासन, वित्तसह अनेक विभागातील कर्मचारी कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेतच आहे. यात नेमके कुणाचे हितसंबंध जुळले असावे, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहे. त्यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच ‘खमकी’ भूमिका घेऊन बदली झालेल्या सर्व कर्मचाºयांना तातडीने कार्यमुक्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे जवळपास ५0 कर्मचारी कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत आहे.बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. अनेक कर्मचारी कार्यमुक्त होऊन नवीन ठिकाणी रुजू झाले. तथापि सोमवार, ७ सप्टेंबरला याबाबत सर्व विभाग प्रमुखांकडून आढावा घेणार आहे.- डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, यवतमाळ

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली