शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा पोळा फुटला; पहिल्याच दिवशी सहा विभागातील ४१ जणांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 14:00 IST

मंगळवारी वित्त विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहेत.

ठळक मुद्दे११ मे पर्यंत विभागनिहाय चालणार प्रक्रिया

यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सहा विभागांतील ४१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या.

राज्य शासनाच्या आदेशानुसार, ३१ मेपूर्वी तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी विविध विभागांतील बदल्यांसाठी ९ ते ११ मे पर्यंत तारीख ठरवून दिली आहे. संबंधित तारखेला त्या विभागातील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय आणि विनंती बदली केली जाणार आहे. सर्व बदल्या समुपदेशनाने केल्या जात आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन विभागातील तीन वरिष्ठ सहायकांची प्रशासकीय, तर एकाची विनंती बदली करण्यात आली. विस्तार अधिकाऱ्यांच्या दोन विनंती बदल्या, तर कनिष्ठ सहायकांच्या १३ प्रशासकीय, तर सहाजणांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या.

सिंचन विभागातील प्रत्येकी एका कनिष्ठ अभियंत्याची प्रशासकीय व विनंती, तर महिला व बालकल्याण विभागातील चार पर्यवेक्षिकांची विनंतीनुसार बदली करण्यात आली. कृषी विस्तार अधिकाऱ्याची एक प्रशासकीय, तर दोन विनंती बदल्या करण्यात आल्या. बांधकाम विभागातील प्रत्येकी एका कनिष्ठ अभियंत्याची प्रशासकीय व विनंतीवरून, तर दोन स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची प्रशासकीय आणि तिघांची विनंतीनुसार बदली करण्यात आली. सोमवारी पाच विभागांतील २१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, तर २० कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या. मंगळवारी वित्त विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहेत.

प्रतिनियुक्तीसाठी अनेकांनी लावली फिल्डिंग

काही विभागात अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या मागील वर्षी बदल्या झाल्या; मात्र त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्तच केले नाही. खुद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोनदा त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यालाही विभागप्रमुखांनी खो दिला. सामान्य बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी यापैकी काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले; मात्र आता त्यापैकी काही कर्मचारी पुन्हा प्रतिनियुक्तीच्या नावाखाली संबंधित विभागात परत येण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत.

शिक्षक बदल्यांकडे लक्ष

गेल्या चार वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. कोरोनामुळे या बदल्या रखडल्या होत्या. आता शासनाने ३१ मे ऐवजी ३० जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास आठ हजार शिक्षकांचे बदली प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

१६ मे पासून पंचायत समिती स्तरावर प्रक्रिया

जिल्हा परिषद स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ११ मे पर्यंत केल्या जाणार आहेत. ११ मे रोजी शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यानंतर १६ मे पासून तालुकास्तरावर पंचायत समितीअंतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत.