शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

झेडपी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा पोळा फुटला; पहिल्याच दिवशी सहा विभागातील ४१ जणांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 14:00 IST

मंगळवारी वित्त विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहेत.

ठळक मुद्दे११ मे पर्यंत विभागनिहाय चालणार प्रक्रिया

यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सहा विभागांतील ४१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या.

राज्य शासनाच्या आदेशानुसार, ३१ मेपूर्वी तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी विविध विभागांतील बदल्यांसाठी ९ ते ११ मे पर्यंत तारीख ठरवून दिली आहे. संबंधित तारखेला त्या विभागातील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय आणि विनंती बदली केली जाणार आहे. सर्व बदल्या समुपदेशनाने केल्या जात आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन विभागातील तीन वरिष्ठ सहायकांची प्रशासकीय, तर एकाची विनंती बदली करण्यात आली. विस्तार अधिकाऱ्यांच्या दोन विनंती बदल्या, तर कनिष्ठ सहायकांच्या १३ प्रशासकीय, तर सहाजणांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या.

सिंचन विभागातील प्रत्येकी एका कनिष्ठ अभियंत्याची प्रशासकीय व विनंती, तर महिला व बालकल्याण विभागातील चार पर्यवेक्षिकांची विनंतीनुसार बदली करण्यात आली. कृषी विस्तार अधिकाऱ्याची एक प्रशासकीय, तर दोन विनंती बदल्या करण्यात आल्या. बांधकाम विभागातील प्रत्येकी एका कनिष्ठ अभियंत्याची प्रशासकीय व विनंतीवरून, तर दोन स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची प्रशासकीय आणि तिघांची विनंतीनुसार बदली करण्यात आली. सोमवारी पाच विभागांतील २१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, तर २० कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या. मंगळवारी वित्त विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहेत.

प्रतिनियुक्तीसाठी अनेकांनी लावली फिल्डिंग

काही विभागात अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या मागील वर्षी बदल्या झाल्या; मात्र त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्तच केले नाही. खुद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोनदा त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यालाही विभागप्रमुखांनी खो दिला. सामान्य बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी यापैकी काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले; मात्र आता त्यापैकी काही कर्मचारी पुन्हा प्रतिनियुक्तीच्या नावाखाली संबंधित विभागात परत येण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत.

शिक्षक बदल्यांकडे लक्ष

गेल्या चार वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. कोरोनामुळे या बदल्या रखडल्या होत्या. आता शासनाने ३१ मे ऐवजी ३० जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास आठ हजार शिक्षकांचे बदली प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

१६ मे पासून पंचायत समिती स्तरावर प्रक्रिया

जिल्हा परिषद स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ११ मे पर्यंत केल्या जाणार आहेत. ११ मे रोजी शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यानंतर १६ मे पासून तालुकास्तरावर पंचायत समितीअंतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत.