शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा पोळा फुटला; पहिल्याच दिवशी सहा विभागातील ४१ जणांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 14:00 IST

मंगळवारी वित्त विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहेत.

ठळक मुद्दे११ मे पर्यंत विभागनिहाय चालणार प्रक्रिया

यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सहा विभागांतील ४१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या.

राज्य शासनाच्या आदेशानुसार, ३१ मेपूर्वी तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी विविध विभागांतील बदल्यांसाठी ९ ते ११ मे पर्यंत तारीख ठरवून दिली आहे. संबंधित तारखेला त्या विभागातील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय आणि विनंती बदली केली जाणार आहे. सर्व बदल्या समुपदेशनाने केल्या जात आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन विभागातील तीन वरिष्ठ सहायकांची प्रशासकीय, तर एकाची विनंती बदली करण्यात आली. विस्तार अधिकाऱ्यांच्या दोन विनंती बदल्या, तर कनिष्ठ सहायकांच्या १३ प्रशासकीय, तर सहाजणांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या.

सिंचन विभागातील प्रत्येकी एका कनिष्ठ अभियंत्याची प्रशासकीय व विनंती, तर महिला व बालकल्याण विभागातील चार पर्यवेक्षिकांची विनंतीनुसार बदली करण्यात आली. कृषी विस्तार अधिकाऱ्याची एक प्रशासकीय, तर दोन विनंती बदल्या करण्यात आल्या. बांधकाम विभागातील प्रत्येकी एका कनिष्ठ अभियंत्याची प्रशासकीय व विनंतीवरून, तर दोन स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची प्रशासकीय आणि तिघांची विनंतीनुसार बदली करण्यात आली. सोमवारी पाच विभागांतील २१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, तर २० कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या. मंगळवारी वित्त विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहेत.

प्रतिनियुक्तीसाठी अनेकांनी लावली फिल्डिंग

काही विभागात अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या मागील वर्षी बदल्या झाल्या; मात्र त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्तच केले नाही. खुद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोनदा त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यालाही विभागप्रमुखांनी खो दिला. सामान्य बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी यापैकी काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले; मात्र आता त्यापैकी काही कर्मचारी पुन्हा प्रतिनियुक्तीच्या नावाखाली संबंधित विभागात परत येण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत.

शिक्षक बदल्यांकडे लक्ष

गेल्या चार वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. कोरोनामुळे या बदल्या रखडल्या होत्या. आता शासनाने ३१ मे ऐवजी ३० जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास आठ हजार शिक्षकांचे बदली प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

१६ मे पासून पंचायत समिती स्तरावर प्रक्रिया

जिल्हा परिषद स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ११ मे पर्यंत केल्या जाणार आहेत. ११ मे रोजी शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यानंतर १६ मे पासून तालुकास्तरावर पंचायत समितीअंतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत.