शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
3
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
4
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
5
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
6
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
7
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
8
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
9
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
10
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
11
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
12
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
13
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
14
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
15
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
16
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
17
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
18
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
19
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
20
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही ट्राफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी करण्यात आल्या आहे. यानंतरही शहरातील नागरिक गर्दी करताना दिसतात. शनिवारी ही गर्दी प्रकर्षाने जाणवली.

ठळक मुद्देसंचारबंदीचा फज्जा । गर्दी हटविण्यासाठी पोलीस कुमक रस्त्यावर उतरली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. असे असले तरी शनिवारी यवतमाळ शहरात संचारबंदी उठल्याचे चित्र काही तास कायम होते. शहरी भागातील ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर कुमक उतरविली. यानंतर शहरातील गर्दी नियंत्रणात आली.कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी करण्यात आल्या आहे. यानंतरही शहरातील नागरिक गर्दी करताना दिसतात. शनिवारी ही गर्दी प्रकर्षाने जाणवली. यवतमाळ शहरातील गांधी चौक, टांगा चौक, सरदार चौक, नेहरु चौक, मारवाडी चौक, दत्त चौक, आर्णी नाका या परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी सकाळी पहायला मिळाली. भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि काही दुकानदार आपली दुकाने नागरिकांसाठी खुले करीत होते. यातून शहरात संचारबंदी हटल्यासारखे चित्र पहायला मिळत होते. मारवाडी चौकात अक्षरश: वाहतूक ठप्प झाली होती. या चौकामध्ये दररोज वाहनांची प्रचंड गर्दी असते. अत्यावश्यक सेवा असल्यामुळे धान्य घेऊन येणारी वाहने आणि ग्रामीण भागात जाणाºया वाहनांची गर्दी या ठिकाणी पहायला मिळते. यासोबतच नागरिकांनीही या भागामध्ये आता गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस विभागाने सकाळपासून कंबर कसली. रस्त्यावर येणाऱ्या वाहनधारकांना कशाला, कुठे बाहेर जात आहे याची विचारणा करण्यात आली. याचे संयुक्तीक उत्तर न मिळाल्याने वाहनधारकांचे वाहन जप्त करण्यात आले. टोर्इंग वाहनाच्या मदतीने ही वाहने वाहतूक शाखेने आपल्या मुख्यालयात जमा केली. त्यावर दंड आकारला. इतकेच नव्हे तर सायंकाळपर्यंत ही वाहने न देण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या. यामुळे विनाकारण वाहनांची गर्दी करणाºया नागरिकांना चांगलाच चोप बसला. दुपारनंतर ही गर्दी ओसरली. दिवसभर वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरूच होती. नागरिक विविध कारणे पुढे करीत शहरात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांच्या चोख बंदोबस्ताने शनिवारी नागरिकांना घरीच थांबावे लागले. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविल्याची घोषणा करताच सायंकाळी पुन्हा रस्त्यावर गर्दी दिसून आली.टांगा चौकावर कुणाचेच लक्ष कसे नाही ?जीवनावश्यक वस्तूंची दुकाने टांगा चौकामध्ये आहे. गोळ्या, बिस्कीटांपासून ते गहू, तांदूळ, दाळ, साखर ठोक विक्रीची दुकाने याच परिसरात आहे. या ठिकाणावरुन अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहने दररोज ये-जा करतात. किती वाहनांना टांगा चौकात दर दिवसाला प्रवेश द्यावा, याचे कुठलेही नियोजन प्रशासनाकडे नाही. हा रस्ता अरुंद आहे. यासोबतच मोठे ट्रक सारखे ये-जा करतात. छोट्या वाहनांना जाण्यासाठी जागाच राहत नाही. अशा स्थितीत खेड्यांमधून धान्य खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांना उभे राहण्यासाठी जागाच शिल्लक नसते. मुळात या सर्व गोष्टींचे नियोजन झाले तर या ठिकाणची वाहतूक कोंडी फोडता येणार आहे. मात्र त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे सर्व वाहने एकाच वेळी, एकाच दिवसी, एकाच ठिकाणी दिसतात. यातून संचारबंदीचा बट्ट्याबोळ होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTrafficवाहतूक कोंडी