शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

लॉकडाऊनमध्येही ट्राफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी करण्यात आल्या आहे. यानंतरही शहरातील नागरिक गर्दी करताना दिसतात. शनिवारी ही गर्दी प्रकर्षाने जाणवली.

ठळक मुद्देसंचारबंदीचा फज्जा । गर्दी हटविण्यासाठी पोलीस कुमक रस्त्यावर उतरली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. असे असले तरी शनिवारी यवतमाळ शहरात संचारबंदी उठल्याचे चित्र काही तास कायम होते. शहरी भागातील ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर कुमक उतरविली. यानंतर शहरातील गर्दी नियंत्रणात आली.कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी करण्यात आल्या आहे. यानंतरही शहरातील नागरिक गर्दी करताना दिसतात. शनिवारी ही गर्दी प्रकर्षाने जाणवली. यवतमाळ शहरातील गांधी चौक, टांगा चौक, सरदार चौक, नेहरु चौक, मारवाडी चौक, दत्त चौक, आर्णी नाका या परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी सकाळी पहायला मिळाली. भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि काही दुकानदार आपली दुकाने नागरिकांसाठी खुले करीत होते. यातून शहरात संचारबंदी हटल्यासारखे चित्र पहायला मिळत होते. मारवाडी चौकात अक्षरश: वाहतूक ठप्प झाली होती. या चौकामध्ये दररोज वाहनांची प्रचंड गर्दी असते. अत्यावश्यक सेवा असल्यामुळे धान्य घेऊन येणारी वाहने आणि ग्रामीण भागात जाणाºया वाहनांची गर्दी या ठिकाणी पहायला मिळते. यासोबतच नागरिकांनीही या भागामध्ये आता गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस विभागाने सकाळपासून कंबर कसली. रस्त्यावर येणाऱ्या वाहनधारकांना कशाला, कुठे बाहेर जात आहे याची विचारणा करण्यात आली. याचे संयुक्तीक उत्तर न मिळाल्याने वाहनधारकांचे वाहन जप्त करण्यात आले. टोर्इंग वाहनाच्या मदतीने ही वाहने वाहतूक शाखेने आपल्या मुख्यालयात जमा केली. त्यावर दंड आकारला. इतकेच नव्हे तर सायंकाळपर्यंत ही वाहने न देण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या. यामुळे विनाकारण वाहनांची गर्दी करणाºया नागरिकांना चांगलाच चोप बसला. दुपारनंतर ही गर्दी ओसरली. दिवसभर वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरूच होती. नागरिक विविध कारणे पुढे करीत शहरात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांच्या चोख बंदोबस्ताने शनिवारी नागरिकांना घरीच थांबावे लागले. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविल्याची घोषणा करताच सायंकाळी पुन्हा रस्त्यावर गर्दी दिसून आली.टांगा चौकावर कुणाचेच लक्ष कसे नाही ?जीवनावश्यक वस्तूंची दुकाने टांगा चौकामध्ये आहे. गोळ्या, बिस्कीटांपासून ते गहू, तांदूळ, दाळ, साखर ठोक विक्रीची दुकाने याच परिसरात आहे. या ठिकाणावरुन अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहने दररोज ये-जा करतात. किती वाहनांना टांगा चौकात दर दिवसाला प्रवेश द्यावा, याचे कुठलेही नियोजन प्रशासनाकडे नाही. हा रस्ता अरुंद आहे. यासोबतच मोठे ट्रक सारखे ये-जा करतात. छोट्या वाहनांना जाण्यासाठी जागाच राहत नाही. अशा स्थितीत खेड्यांमधून धान्य खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांना उभे राहण्यासाठी जागाच शिल्लक नसते. मुळात या सर्व गोष्टींचे नियोजन झाले तर या ठिकाणची वाहतूक कोंडी फोडता येणार आहे. मात्र त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे सर्व वाहने एकाच वेळी, एकाच दिवसी, एकाच ठिकाणी दिसतात. यातून संचारबंदीचा बट्ट्याबोळ होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTrafficवाहतूक कोंडी