शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

लॉकडाऊनमध्येही ट्राफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी करण्यात आल्या आहे. यानंतरही शहरातील नागरिक गर्दी करताना दिसतात. शनिवारी ही गर्दी प्रकर्षाने जाणवली.

ठळक मुद्देसंचारबंदीचा फज्जा । गर्दी हटविण्यासाठी पोलीस कुमक रस्त्यावर उतरली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. असे असले तरी शनिवारी यवतमाळ शहरात संचारबंदी उठल्याचे चित्र काही तास कायम होते. शहरी भागातील ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर कुमक उतरविली. यानंतर शहरातील गर्दी नियंत्रणात आली.कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी करण्यात आल्या आहे. यानंतरही शहरातील नागरिक गर्दी करताना दिसतात. शनिवारी ही गर्दी प्रकर्षाने जाणवली. यवतमाळ शहरातील गांधी चौक, टांगा चौक, सरदार चौक, नेहरु चौक, मारवाडी चौक, दत्त चौक, आर्णी नाका या परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी सकाळी पहायला मिळाली. भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि काही दुकानदार आपली दुकाने नागरिकांसाठी खुले करीत होते. यातून शहरात संचारबंदी हटल्यासारखे चित्र पहायला मिळत होते. मारवाडी चौकात अक्षरश: वाहतूक ठप्प झाली होती. या चौकामध्ये दररोज वाहनांची प्रचंड गर्दी असते. अत्यावश्यक सेवा असल्यामुळे धान्य घेऊन येणारी वाहने आणि ग्रामीण भागात जाणाºया वाहनांची गर्दी या ठिकाणी पहायला मिळते. यासोबतच नागरिकांनीही या भागामध्ये आता गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस विभागाने सकाळपासून कंबर कसली. रस्त्यावर येणाऱ्या वाहनधारकांना कशाला, कुठे बाहेर जात आहे याची विचारणा करण्यात आली. याचे संयुक्तीक उत्तर न मिळाल्याने वाहनधारकांचे वाहन जप्त करण्यात आले. टोर्इंग वाहनाच्या मदतीने ही वाहने वाहतूक शाखेने आपल्या मुख्यालयात जमा केली. त्यावर दंड आकारला. इतकेच नव्हे तर सायंकाळपर्यंत ही वाहने न देण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या. यामुळे विनाकारण वाहनांची गर्दी करणाºया नागरिकांना चांगलाच चोप बसला. दुपारनंतर ही गर्दी ओसरली. दिवसभर वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरूच होती. नागरिक विविध कारणे पुढे करीत शहरात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांच्या चोख बंदोबस्ताने शनिवारी नागरिकांना घरीच थांबावे लागले. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविल्याची घोषणा करताच सायंकाळी पुन्हा रस्त्यावर गर्दी दिसून आली.टांगा चौकावर कुणाचेच लक्ष कसे नाही ?जीवनावश्यक वस्तूंची दुकाने टांगा चौकामध्ये आहे. गोळ्या, बिस्कीटांपासून ते गहू, तांदूळ, दाळ, साखर ठोक विक्रीची दुकाने याच परिसरात आहे. या ठिकाणावरुन अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहने दररोज ये-जा करतात. किती वाहनांना टांगा चौकात दर दिवसाला प्रवेश द्यावा, याचे कुठलेही नियोजन प्रशासनाकडे नाही. हा रस्ता अरुंद आहे. यासोबतच मोठे ट्रक सारखे ये-जा करतात. छोट्या वाहनांना जाण्यासाठी जागाच राहत नाही. अशा स्थितीत खेड्यांमधून धान्य खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांना उभे राहण्यासाठी जागाच शिल्लक नसते. मुळात या सर्व गोष्टींचे नियोजन झाले तर या ठिकाणची वाहतूक कोंडी फोडता येणार आहे. मात्र त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे सर्व वाहने एकाच वेळी, एकाच दिवसी, एकाच ठिकाणी दिसतात. यातून संचारबंदीचा बट्ट्याबोळ होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTrafficवाहतूक कोंडी