शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

पुसद शहरात वाहतुकीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST

पुसद : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली ...

पुसद : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरामधील मुख्य बाजारपेठेमधील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नेहमीच पाहावयास मिळत आहे. शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

शहरातील वाहतुकीचे प्रमुख रस्ते असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौक, सुभाष चौक या मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतुकीस व रहदारीला अडथळा येत आहे. सामान्य नागरिक, अबालवृद्ध, महिला, शाळकरी मुली आदींना या मार्गावरून पायी चालणे, दुचाकी चालविणे अत्यंत अवघड झाले आहे. दररोज किरकोळ अपघात घडत आहे.

या रस्त्यावर नगरपरिषदेने खोदकाम व बांधकाम करून ठेवलेले आहे. त्यामुळे फुटपाथवर व्यवसाय करणारे, भाजीपाला, फळे विकणारे यांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे. वास्तविक आता एका बाजूने जाणे व एका बाजूने येणे, अशा रस्त्याचे तेथे प्रयोजन आहे. परंतु दोन्ही बाजूला भाजीपाला, फळे विकणाऱ्यांनी आपली दुकाने थाटल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या ठिकाणी नेहमीच ग्राहक, दुुचाकी, चारचाकी, सहाचाकी वाहने उभी करतात. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.

वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी संपवण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, सुभाष चौक या परिसरात कायम वाहतूक शिपायाची नेमणूक व्हावी, अशी शहरातील जनतेची मागणी आहे.