शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

‘शांती वाघिणी’च्या डरकाळीने पेटली होती क्रांतीची मशाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

औरंगाबादमधील विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळालेच पाहिजे, अशी डरकाळी फोडणारी ती वाघीण म्हणजे, यवतमाळच्या पाटीपुऱ्यातील शांताबाई रामटेके. ही गोष्ट आहे साठच्या दशकातील. शांताबाई म्हणजे केळीच्या बागा करून टोपलीत भरून फळ विकणारी सामान्य महिला. पण तिला ध्यास लागला बाबासाहेब आंबेडकर या नावाचा.

ठळक मुद्देबाबासाहेबांच्या नावासाठी पहिला मशाल मोर्चा यवतमाळात : शांताबाई रामटेकेंच्या धडाकेबाज आंदोलनाच्या आठवणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आजन्म शिकत राहिलो तरी ज्ञानसागराच्या गुडघाभर पाण्यातच पोहोचता येईल, एवढा हा ज्ञानसागर अथांग आहे... अशा शब्दात ज्ञानाची, शिकण्याची महती गाणाऱ्या बाबासाहेबांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, म्हणून महाराष्ट्रात विचारांचा आगडोंब उसळला होता. तेव्हा यवतमाळ मात्र गाढ झोपेत होते. अखेर येथील निद्रिस्त जनतेला जागे केले ‘शांती वाघिणी’च्या डरकाळीने...काय होती ती डरकाळी? कोण होती ती वाघीण? अन् बाबासाहेबांच्या नावासाठी तिने यवतमाळात कशी घडविली क्रांती? चला, जाणून घेऊ या तो इतिहास...औरंगाबादमधील विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळालेच पाहिजे, अशी डरकाळी फोडणारी ती वाघीण म्हणजे, यवतमाळच्या पाटीपुऱ्यातील शांताबाई रामटेके. ही गोष्ट आहे साठच्या दशकातील. शांताबाई म्हणजे केळीच्या बागा करून टोपलीत भरून फळ विकणारी सामान्य महिला. पण तिला ध्यास लागला बाबासाहेब आंबेडकर या नावाचा. तेव्हा नागपूरमध्ये झालेल्या परिषदेत बाबासाहेब म्हणाले होते, महिलांनी सामाजिक चळवळींमध्ये पुढे आलेच पाहिजे... हा मंत्र कर्णोपकर्णी शांताबाईपर्यंत पोहोचला अन् त्यांचे अंतर्मन ढवळून निघाले. जोगेंद्र कवाडे यांच्या संपर्कातून ही महिला सक्रीय झालीच होती. तेवढ्यातच मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा आवाज घुमू लागला अन् महाराष्ट्र पेटू लागला. त्याच्या ज्वाळा शांताबाईपर्यंत धडकल्या अन् त्यांनी ठरविले, यवतमाळातूनही या लढाईसाठी समर्थनाची रसद पोहोचलीच पाहिजे.शांताबार्इंनी पाटीपुºयातील खंबिर महिलांची फळी तयार केली. अन् विद्यापीठ नामांतरासाठीचा महाराष्ट्रातील पहिला मशाल मोर्चा यवतमाळात काढला. शांताबाईच्या नेतृत्वात पार्वताबाई गायकवाड, सुगंधाबाई कचराबुढी, कमला गायकवाड, तुळसाबाई ढवळे हाती मशाल घेऊन मार्गक्रमण करू लागल्या. पाटीपुºयातून सुरू झालेला हा मशाल मोर्चा शारदा चौक मार्गे तहसीलकडे निघाला. मात्र विरोधक एकवटले. मोर्चा अडविण्यात आला. प्रचंड दगडफेक करण्यात आली. शेवटी या प्रकरणात महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. शेवटी अ‍ॅड. काकासाहेब चमेडिया यांनी जमानत घेऊन महिलांची सुटका केली.सुटका झाली पण संघर्षाचे बिज शांताबाईच्या मनात कायमचे रुजले. ‘शांती वाघीण’ म्हणून त्यांचे नाव सर्वांच्या तोंडवळणी पडले. फळविक्री करतानाही त्यांच्या गाण्यांमधून क्रांतीच्या ज्वाळाच धुमसत राहायच्या...वाघाच्या पिंजऱ्यात सापाला कोंडलंवाघाची भाषा त्याला येईल काय?हे शांताबाईचं गाणं आजही पाटीपुरावासीयांच्या स्मरणात आहे. अन्यायग्रस्तांसाठी भांडणे हा शांताबाईचा स्थायीभाव होता. बिडी कामगारांच्या प्रश्नांसाठी झगडणारी महाराष्ट्रातील पहिली महिला म्हणून शांताबाईचे नाव अविस्मरणीय आहे. तेंदूपत्ता कामगारांसाठी चक्क नाशिक, मुंबईपर्यंत जाऊन त्यांनी मोर्चे काढले. अशाच एका प्रसंगात यवतमाळातील पिंपळगावातील उपेक्षितांची घरे जाळण्यात आली होती. तेव्हा त्या नागरिकांच्या राहण्याची, जेवण्याची सोय करण्यासाठी शांताबाई पदर खोचून सर्वात पुढे होत्या. बाळा भोसले, अवधूत वनकर, रमाकांत वाघमारे, निळाबाई जोगळेकर, उमेश मेश्राम, शशिकांत वासनिक, कचराबाई वानखेडे आदींची साथ मिळवत त्या लढत राहिल्या. ज्याकाळी महिला पिचलेल्या होत्या तेव्हा नेतृत्व देणारी महिला म्हणून शांताबाईची ओळख संस्मरणीय आहे.चार मुली घडविल्या... वाघिणीसारख्याच!शांताबाईचे माहेर तळेगाव दशासर. शिक्षण कसेबसे चौथीपर्यंत झालेले. पण अपार कष्ट उपसत त्यांनी आपल्या चारही मुलींना वाघिणीसारखे सक्षम बनविले. प्रमोदिनी यवतमाळातल्या सामाजिक चळवळींमध्ये अग्रस्थानी आहेत. दुसरी मुलगी पल्लवी यवतमाळात नगरसेविका म्हणून कार्यरत आहे. तर तिसरी मुलगी ज्योत्स्ना सहारे कंट्रोलधारक आहे. चौथी मुलगी छायाताई कांबळे प्राचार्य आहे. समाजासाठी झगडत-झगडतच सात वर्षांपूर्वी शांताबाई रामटेके यांनी देह त्यागला. पण आईच्या आठवणी सांगताना त्यांच्या मुली थकत नाहीत. प्रमोदिनी रामटेके म्हणाल्या, आई नेहमी म्हणायची की बाबासाहेबच माझ्या पाठीशी आहे. तिचाच वारसा चालविण्याचा प्रयत्न आम्ही चारही बहिणी करीत आहोत.दगडफेकीत जेव्हा ठाणेदाराचेच प्राण वाचविले..!१९८२ सालातली ही गोष्ट. यवतमाळात तेव्हा दोन समाजात तेढ निर्माण करणाºया काही प्रवृत्ती प्रबळ झाल्या होत्या. त्यातूनच लगतच्या दोन परिसरातील नागरिकांमध्ये एका विटंबणा प्रकरणातून तुफान झगडा झाला. दोन्ही बाजूंनी गोटमार झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पोहोचले. पण त्यात खुद्द तत्कालीन ठाणेदार रामदास वºहाडे यांच्याच डोक्यात दगड लागला. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. दगडांचा मारा थांबायचे नाव घेत नव्हता. ते पाहून शांताबाई रामटेके पुढे धावल्या अन् थेट ठाणेदारांना उराशी कवटाळले. आपल्या लुगड्याचा पदर फाडून त्यांच्या जखमेला बांधला. कसाबसा ठाणेदारांचा जीव वाचला. पण या प्रकरणात ज्या शे-दीडशे लोकांना आरोपी बनविले गेले, त्यात पहिले नाव होते शांताबाई रामटेके. अनेक वर्षे केसेस चालल्या. नंतर त्या मागे घेण्यात आल्या. दरम्यानच्या काळात यवतमाळात खैरलांजी आंदोलन पेटले, तेव्हाही शांताबाई सर्वात पुढे होत्या. मोर्चा निघाला तेव्हा १४-१५ वर्षाच्या पोरीला पोलीस मारत असल्याचे पाहून शांताबाई आडव्या गेल्या. पण पोलिसांनी ‘बाजूला हो बुढे’ म्हणत त्यांनाच मारहाण केली. हाताला गंभीर दुखापत झाली. पण शांताबाईने पोलिसांना थांबवून त्या पोरीला मात्र वाचविलेच. पाटीपुरातील कोणत्याही उपेक्षितासाठी भांडणारी, अन्यायाला वाचा फोडणारी ‘शांती वाघीण’ म्हणून शांताबाई रामटेकेंचे नाव मात्र आजही कायम आहे.

टॅग्स :Socialसामाजिक