शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

शेतकऱ्यांचे शासनाकडे २० कोटींवर थकीत

By admin | Updated: March 20, 2015 02:03 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी शासनाने मदतीची घोषणा केली.

यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र त्यानंतरही २० कोटी ६७ लाख रुपये शासनाकडे शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहे. यावर्षीच्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही शासनाने अद्याप ही रक्कम दिली नाही. यवतमाळ जिल्ह्याला गत काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले. तसेच गारपिटीमुळेही शेतकरी उद्ध्वस्त झाला. या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. परंतु अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलीच नाही. २००२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेत खरडून गेले होते. त्या शेतीच्या दुरुस्तीसाठी शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र आठ लाख ५५ हजार रुपये अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाले नाही. २००५ मध्येही अशीच परिस्थिती उद्भवली होती. खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या दुरुस्तीचे दोन कोटी ६६ लाख १७ हजार रुपये अद्यापही मिळाले नाही. २०१० मध्ये दुरुस्त होणाऱ्या शेतीसाठी ५४ लाख १९ हजार रुपये तर दुरुस्त न होणाऱ्या शेतीसाठी ६० लाख आठ हजार रुपये घोषित झाले. परंतु शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. २०११ साली अतिवृष्टीत खरडून गेलेल्या शेतजमिनीचे ५३ लाख २१ हजार शेती पिकांच्या नुकसानीचे ९२ लाख ५१ हजार रुपये तर २०१२ मध्ये खरडून गेलेल्या शेतजमिनीसाठी चार कोटी ४३ लाख ४६ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेच नाही. २०१३ च्या फेब्रुवारी महिन्यात अकाली पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र ७८ लाख ५१ हजार शेतकऱ्यांना मिळालेच नाही. तर २०१३ च्या जुन, जुलै, आॅगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटी ८३ लाख ३९ हजार रुपये मंजूर झालेत. तसेच वाहून गेलेल्या जमिनीसाठी २७ लाख ७३ हजार रुपये मंजूर झाले. मात्र ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. गत १३ वर्षांपासून शेतकरी मदतीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरी मदत पोहोचली नाही. यावर्षी तर खरीप आणि रबी असे दोनही हंगाम उद्ध्वस्त झाले आहे. या शेतकऱ्यांना ही मदत मिळाल्यास सोईचे ठरणार आहे. (शहर वार्ताहर)