शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे शासनाकडे २० कोटींवर थकीत

By admin | Updated: March 20, 2015 02:03 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी शासनाने मदतीची घोषणा केली.

यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र त्यानंतरही २० कोटी ६७ लाख रुपये शासनाकडे शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहे. यावर्षीच्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही शासनाने अद्याप ही रक्कम दिली नाही. यवतमाळ जिल्ह्याला गत काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले. तसेच गारपिटीमुळेही शेतकरी उद्ध्वस्त झाला. या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. परंतु अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलीच नाही. २००२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेत खरडून गेले होते. त्या शेतीच्या दुरुस्तीसाठी शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र आठ लाख ५५ हजार रुपये अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाले नाही. २००५ मध्येही अशीच परिस्थिती उद्भवली होती. खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या दुरुस्तीचे दोन कोटी ६६ लाख १७ हजार रुपये अद्यापही मिळाले नाही. २०१० मध्ये दुरुस्त होणाऱ्या शेतीसाठी ५४ लाख १९ हजार रुपये तर दुरुस्त न होणाऱ्या शेतीसाठी ६० लाख आठ हजार रुपये घोषित झाले. परंतु शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. २०११ साली अतिवृष्टीत खरडून गेलेल्या शेतजमिनीचे ५३ लाख २१ हजार शेती पिकांच्या नुकसानीचे ९२ लाख ५१ हजार रुपये तर २०१२ मध्ये खरडून गेलेल्या शेतजमिनीसाठी चार कोटी ४३ लाख ४६ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेच नाही. २०१३ च्या फेब्रुवारी महिन्यात अकाली पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र ७८ लाख ५१ हजार शेतकऱ्यांना मिळालेच नाही. तर २०१३ च्या जुन, जुलै, आॅगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटी ८३ लाख ३९ हजार रुपये मंजूर झालेत. तसेच वाहून गेलेल्या जमिनीसाठी २७ लाख ७३ हजार रुपये मंजूर झाले. मात्र ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. गत १३ वर्षांपासून शेतकरी मदतीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरी मदत पोहोचली नाही. यावर्षी तर खरीप आणि रबी असे दोनही हंगाम उद्ध्वस्त झाले आहे. या शेतकऱ्यांना ही मदत मिळाल्यास सोईचे ठरणार आहे. (शहर वार्ताहर)