शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पर्यटकांना खुणावतेय टिपेश्वर अभयारण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

वनविभागाच्या विभागीय प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सुरूवातीला नैसर्गिक जंगलाअंतर्गत याची देखभाल सुरू झाली.त्यानंतर ३० मार्च १९९७ ला टिपेश्वर अभयारण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पेंच नागपूर विभागीय कार्यालयाशी याला जोडण्यात आले. ३ सप्टेंबर २०१३ ला पांढरकवडा वन्यजीव विभागाची निर्मीती करून या विभागात टिपेश्वर अभयारण्य समाविष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देसंडे अँकर । वाघाचे संरक्षण व संवर्धनाच्यादृष्टीने पोषक वातावरण

प्रवीण पिन्नमवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : वाघाच्या वाढत्या संख्येने टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांना खुणावत आहे. या अभयारण्यात वाघांचे संरक्षण व संवर्धनाच्यादृष्टीने अतिशय पोषक वातावरण असल्याने भविष्यात हे अभयारण्य वाघ्रप्रकल्प म्हणून नावारूपास येणार आहे.केळापूर तालुक्यात टिपेश्वर नावाचे गाव होते. या गावात तिपाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. तिपाई देवीच्या नावावरून या अभयारण्याला टिपेश्वर असे नाव देण्यात आले. केळापूर आणि घाटंजी तालुक्यातील या अभयारण्याचा १४८.६२ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तार आहे. वाघांची संख्या लक्षात घेता, आता या क्षेत्रात वाढ होण्याची चिन्हे आहेत. पांढरकवडा शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. अभयारण्याच्या वाटेवर केळापूर येथे जगदंबा देवीचे आणि चतुर्मुखी गणेशाचे अतीप्राचीन मंदिर आहे. तसेच उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग अभयारण्याच्या जवळून जातो.टिपेश्वर अभयारण्यात वाघांच्या वास्तव्यशिवाय बिबट, हरीण, काळवीट, मोर, नीलगाय, रानडुकर याशिवाय विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. आंध्रप्रदेश तेलंगणापर्यंत या अभयारण्याची सीमा आहे. डोंगरदऱ्यांनी व्यापलेले हे अभयारण्य जैवविविधतेने नटलेले आहे.वनविभागाच्या विभागीय प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सुरूवातीला नैसर्गिक जंगलाअंतर्गत याची देखभाल सुरू झाली.त्यानंतर ३० मार्च १९९७ ला टिपेश्वर अभयारण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पेंच नागपूर विभागीय कार्यालयाशी याला जोडण्यात आले. ३ सप्टेंबर २०१३ ला पांढरकवडा वन्यजीव विभागाची निर्मीती करून या विभागात टिपेश्वर अभयारण्य समाविष्ट करण्यात आले. येत्या काही दिवसांतच टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे एका जाणकाराने ‘लोकमत’ ला सांगितले. त्यासाठी व्याघ्र गणना सुरू झाली आहे.अभयारण्यासाठी दोन गावांचे पुनर्वसन१ एप्रिल २०१४ ला पांढरकवडा येथे वन्यजीव विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. टिपेश्वर अभयारण्यातील बाधित गावांपैकी टिपेश्वर गाव व मारेगाव (वन) या दोन गावांची पुनर्वसनाची प्रक्रिया पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक कार्यालयाने ३ नोव्हेंबर २०१२ मध्ये पार पाडली. अलिकडे या अभयारण्यात वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ